शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
3
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
4
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
5
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
6
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
7
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
8
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
9
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
10
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
11
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
12
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
13
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
14
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
15
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
16
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
17
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
18
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
19
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
20
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...

५०० गावांवर पाणी टंचाईचे संकट

By admin | Updated: April 1, 2016 01:45 IST

गडचिरोली हा नद्यांचा जिल्हा असला तरी यावर्षी जिल्ह्यावर पाणी टंचाईचे संकट मोठ्या प्रमाणावर कोसळण्याची शक्यता आहे.

नद्या आटल्या : पाणी पुरवठा योजनांवरही थकबाकीचा भार; महावितरणाने वीज कापलीगडचिरोली : गडचिरोली हा नद्यांचा जिल्हा असला तरी यावर्षी जिल्ह्यावर पाणी टंचाईचे संकट मोठ्या प्रमाणावर कोसळण्याची शक्यता आहे. अनेक गावात हातपंप बंद पडले असून महिलांची पाण्यासाठी परिसरातील जलस्त्रोतांवर गर्दी झाली आहे. दुर्गम भागात ही परिस्थिती गंभीर स्वरूपात आहे. गडचिरोली जिल्ह्यात वैनगंगा, गोदावरी, प्राणहिता, इंद्रावती, पामुलगौतम या मोठ्या नद्यांसह १० ते १५ उपनद्या आहेत. या नद्यांच्या पाण्यावर अनेक तालुका मुख्यालय व मोठ्या गावांच्या पाणी पुरवठा योजना अवलंबून आहेत. गेल्यावर्षी गडचिरोली जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. त्यामुळे जानेवारीच्या अखेरीसच नद्या कोरड्या झाल्या. गडचिरोली शहरासह २५ गावांना वैनगंगा नदीतून पाणी पुरवठा होतो. गडचिरोली शहराच्या पाणी पुरवठ्यावरही परिणाम झाला असून तलाव गावात असतानाही अनेक विहिरींची पाणी पातळी आता खोल जाऊ लागली आहे. दुर्गम भागातही आता नागरिकांची पाण्यासाठी पायपीट सुरू आहे. ग्रामपंचायतींनी पाणीपट्टी कराचा भरणा न केल्यामुळे आलापल्लीसारख्या मोठ्या गावातील पाणी पुरवठा मागील १५ दिवसांपासून बंद आहे. अहेरी, भामरागड, एटापल्ली, धानोरा, कोरची, कुरखेडा, सिरोंचा आदी तालुक्यात अनेक गावांमध्ये बोअरवेल नादुरूस्त असल्याने त्यातून पाणी नागरिकांना मिळत नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची लांब अंतरावर पायपीट होत आहे. यावर्षी जवळपास ५०० गावांवर पाणी टंचाईचे संकट आहे. (तालुका प्रतिनिधी)आमदारांचा पाणी टंचाईवर विधानसभेत टाहोगडचिरोली जिल्ह्याच्या या गंभीर पाणी प्रश्नावर आरमोरीचे आमदार क्रिष्णा गजबे यांनी विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित केला होता. यात त्यांनी कोरची तालुक्यात कोहका, रानटोला, टवेटोला या गावांमध्ये पाणी पुरवठा करण्यासाठी कोणतीही उपाययोजना नाही. एकही विहीर व हातपंप नाही. तसेच एटजाल, बोटेझरी, नारकसा, मुंडीपार, कुणारा आदी कोरची तालुक्यातील गावांमध्ये केवळ एक-एक हातपंप आहे. काही गावांतील हातपंप नादुरूस्त आहे. तसेच सुरवाही, चिमनटोला, विहीरटोला, गडली, चितेकनार, टेकामेटा, रामसायटोला या गावांमध्येही हातपंप नादुरूस्त आहे. येथे उपाययोजना कराव्यात, अशी मागणी विधानसभेत केली होती. प्रशासनाकडून पाणी टंचाईवर मात करण्यासाठी अद्याप उपाययोजना करण्यात आलेल्या नाही.