शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

५०० गावांवर पाणी टंचाईचे संकट

By admin | Updated: April 1, 2016 01:45 IST

गडचिरोली हा नद्यांचा जिल्हा असला तरी यावर्षी जिल्ह्यावर पाणी टंचाईचे संकट मोठ्या प्रमाणावर कोसळण्याची शक्यता आहे.

नद्या आटल्या : पाणी पुरवठा योजनांवरही थकबाकीचा भार; महावितरणाने वीज कापलीगडचिरोली : गडचिरोली हा नद्यांचा जिल्हा असला तरी यावर्षी जिल्ह्यावर पाणी टंचाईचे संकट मोठ्या प्रमाणावर कोसळण्याची शक्यता आहे. अनेक गावात हातपंप बंद पडले असून महिलांची पाण्यासाठी परिसरातील जलस्त्रोतांवर गर्दी झाली आहे. दुर्गम भागात ही परिस्थिती गंभीर स्वरूपात आहे. गडचिरोली जिल्ह्यात वैनगंगा, गोदावरी, प्राणहिता, इंद्रावती, पामुलगौतम या मोठ्या नद्यांसह १० ते १५ उपनद्या आहेत. या नद्यांच्या पाण्यावर अनेक तालुका मुख्यालय व मोठ्या गावांच्या पाणी पुरवठा योजना अवलंबून आहेत. गेल्यावर्षी गडचिरोली जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. त्यामुळे जानेवारीच्या अखेरीसच नद्या कोरड्या झाल्या. गडचिरोली शहरासह २५ गावांना वैनगंगा नदीतून पाणी पुरवठा होतो. गडचिरोली शहराच्या पाणी पुरवठ्यावरही परिणाम झाला असून तलाव गावात असतानाही अनेक विहिरींची पाणी पातळी आता खोल जाऊ लागली आहे. दुर्गम भागातही आता नागरिकांची पाण्यासाठी पायपीट सुरू आहे. ग्रामपंचायतींनी पाणीपट्टी कराचा भरणा न केल्यामुळे आलापल्लीसारख्या मोठ्या गावातील पाणी पुरवठा मागील १५ दिवसांपासून बंद आहे. अहेरी, भामरागड, एटापल्ली, धानोरा, कोरची, कुरखेडा, सिरोंचा आदी तालुक्यात अनेक गावांमध्ये बोअरवेल नादुरूस्त असल्याने त्यातून पाणी नागरिकांना मिळत नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची लांब अंतरावर पायपीट होत आहे. यावर्षी जवळपास ५०० गावांवर पाणी टंचाईचे संकट आहे. (तालुका प्रतिनिधी)आमदारांचा पाणी टंचाईवर विधानसभेत टाहोगडचिरोली जिल्ह्याच्या या गंभीर पाणी प्रश्नावर आरमोरीचे आमदार क्रिष्णा गजबे यांनी विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित केला होता. यात त्यांनी कोरची तालुक्यात कोहका, रानटोला, टवेटोला या गावांमध्ये पाणी पुरवठा करण्यासाठी कोणतीही उपाययोजना नाही. एकही विहीर व हातपंप नाही. तसेच एटजाल, बोटेझरी, नारकसा, मुंडीपार, कुणारा आदी कोरची तालुक्यातील गावांमध्ये केवळ एक-एक हातपंप आहे. काही गावांतील हातपंप नादुरूस्त आहे. तसेच सुरवाही, चिमनटोला, विहीरटोला, गडली, चितेकनार, टेकामेटा, रामसायटोला या गावांमध्येही हातपंप नादुरूस्त आहे. येथे उपाययोजना कराव्यात, अशी मागणी विधानसभेत केली होती. प्रशासनाकडून पाणी टंचाईवर मात करण्यासाठी अद्याप उपाययोजना करण्यात आलेल्या नाही.