शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
5
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
6
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
7
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
8
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
9
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
10
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
11
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
12
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
13
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
14
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
15
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
16
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
17
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
18
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
19
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
20
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी

जिल्हाभरातील जलसाठे कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 00:57 IST

गतवर्षीच्या तुलनेत यंदा देसाईगंज तालुक्याच्या विसोरा परिसरासह जिल्हाभरातील नदी, नाले, बोड्या तलाव, वन तलाव कोरडे पडले आहेत.

ठळक मुद्देग्रामीण भागात जलसंकट तीव्र होणार : यंदा लवकरच पाणी पातळी घटली

ऑनलाईन लोकमतविसोरा : गतवर्षीच्या तुलनेत यंदा देसाईगंज तालुक्याच्या विसोरा परिसरासह जिल्हाभरातील नदी, नाले, बोड्या तलाव, वन तलाव कोरडे पडले आहेत. त्यामुळे मार्च महिन्याच्या अखेरीस संपूर्ण जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जलसंकट तीव्र होण्याची शक्यता आहे.गडचिरोली जिल्हा हा अतिपावसाचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. मात्र यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात अल्प पाऊस बरसला. तसेच गडचिरोली जिल्ह्यात पाणी साठवून ठेवण्यासाठी बंधारे व इतर व्यवस्था नाही. त्यामुळे पावसाचे नदीत पडलेले पाणी वाहून जाते.गोंदिया जिल्ह्यातून वाहत येणारी व पुढे गडचिरोली जिल्ह्यातील आष्टीनजीकच्या शिवणी येथे प्राणहिता नदीला भेटणारी गाढवी नदी देसाईगंज तालुक्यासाठी कृषी क्षेत्राची संजीवनी म्हणून काम करते. मात्र यंदा या नदीचे पात्र कोरडे झाल्याने जलसंकट उभे ठाकले आहे. गोंदिया जिल्ह्याच्या इटिया धरण यंदा अल्प प्रमाणात भरले. याचा परिणामी नदीच्या प्रवाहावर निघाला. त्यामुळे गाढवी नदी किनाऱ्याच्या दोन्ही बाजुला असलेल्या हजारो हेक्टरवरील शेतीवर परिणाम झाला. शिवाय गाय, बैल, म्हैस, शेळी आदी पाळीव प्राणी, वन्यप्राणी, पक्षी, जलचर प्राणी व वनस्पतीवर प्रतिकूल परिणाम पडत आहे. यंदा पाऊस कमी पडल्याने नदीला अत्यल्प पाणी आहे. अशा स्थितीत नदी पात्रात पाणी अडविण्यासाठी मोठमोठे खड्डे खोदण्यात आले. शिवाय रेतीचे बंधारे बांधण्यात आले. नदीचे पाणी जागोजागी साचून राहत आहे. शेतकºयांनी सिंचनाच्या हेतूपोटी नदी पाणी प्रवाह बंद होतील, असे अनेक प्रयत्न केले. त्यामुळे नदीचे पात्र कोरडे झाले आहे.रेती व लाकडे शिल्लकगाढवी नदीवरील पुलाच्या खाली व दोन्ही बाजुचे नदी पात्र पूर्णत: कोरडे झाले आहे. आता मृतदेह जाळल्यानंतरचे जळलेल्या अवस्थेतील लाकडे व रेती शिल्लक असल्याचे दिसून येते. यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने इटिया डोहाचा कालवा व गाढवी नदीच्या पाण्यावर उन्हाळी धान फसल नसल्याचे दिसून येते.