शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाभरातील जलसाठे कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 00:57 IST

गतवर्षीच्या तुलनेत यंदा देसाईगंज तालुक्याच्या विसोरा परिसरासह जिल्हाभरातील नदी, नाले, बोड्या तलाव, वन तलाव कोरडे पडले आहेत.

ठळक मुद्देग्रामीण भागात जलसंकट तीव्र होणार : यंदा लवकरच पाणी पातळी घटली

ऑनलाईन लोकमतविसोरा : गतवर्षीच्या तुलनेत यंदा देसाईगंज तालुक्याच्या विसोरा परिसरासह जिल्हाभरातील नदी, नाले, बोड्या तलाव, वन तलाव कोरडे पडले आहेत. त्यामुळे मार्च महिन्याच्या अखेरीस संपूर्ण जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जलसंकट तीव्र होण्याची शक्यता आहे.गडचिरोली जिल्हा हा अतिपावसाचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. मात्र यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात अल्प पाऊस बरसला. तसेच गडचिरोली जिल्ह्यात पाणी साठवून ठेवण्यासाठी बंधारे व इतर व्यवस्था नाही. त्यामुळे पावसाचे नदीत पडलेले पाणी वाहून जाते.गोंदिया जिल्ह्यातून वाहत येणारी व पुढे गडचिरोली जिल्ह्यातील आष्टीनजीकच्या शिवणी येथे प्राणहिता नदीला भेटणारी गाढवी नदी देसाईगंज तालुक्यासाठी कृषी क्षेत्राची संजीवनी म्हणून काम करते. मात्र यंदा या नदीचे पात्र कोरडे झाल्याने जलसंकट उभे ठाकले आहे. गोंदिया जिल्ह्याच्या इटिया धरण यंदा अल्प प्रमाणात भरले. याचा परिणामी नदीच्या प्रवाहावर निघाला. त्यामुळे गाढवी नदी किनाऱ्याच्या दोन्ही बाजुला असलेल्या हजारो हेक्टरवरील शेतीवर परिणाम झाला. शिवाय गाय, बैल, म्हैस, शेळी आदी पाळीव प्राणी, वन्यप्राणी, पक्षी, जलचर प्राणी व वनस्पतीवर प्रतिकूल परिणाम पडत आहे. यंदा पाऊस कमी पडल्याने नदीला अत्यल्प पाणी आहे. अशा स्थितीत नदी पात्रात पाणी अडविण्यासाठी मोठमोठे खड्डे खोदण्यात आले. शिवाय रेतीचे बंधारे बांधण्यात आले. नदीचे पाणी जागोजागी साचून राहत आहे. शेतकºयांनी सिंचनाच्या हेतूपोटी नदी पाणी प्रवाह बंद होतील, असे अनेक प्रयत्न केले. त्यामुळे नदीचे पात्र कोरडे झाले आहे.रेती व लाकडे शिल्लकगाढवी नदीवरील पुलाच्या खाली व दोन्ही बाजुचे नदी पात्र पूर्णत: कोरडे झाले आहे. आता मृतदेह जाळल्यानंतरचे जळलेल्या अवस्थेतील लाकडे व रेती शिल्लक असल्याचे दिसून येते. यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने इटिया डोहाचा कालवा व गाढवी नदीच्या पाण्यावर उन्हाळी धान फसल नसल्याचे दिसून येते.