शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

जलाशये तहाणलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 22:03 IST

सरारसरी पावसाच्या तुलनेत यावर्षी २६ टक्के पाऊस कमी पडला आहे. त्यातही एटापल्ली व भामरागड हे दोन तालुके वगळले तर काही तालुक्यांमध्ये ६० ते ७० टक्के दरम्यान पाऊस झाला आहे.

ठळक मुद्देसरासरीच्या ७४ टक्के पाऊस : तलावांमध्ये निम्म्यापेक्षाही कमी पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सरारसरी पावसाच्या तुलनेत यावर्षी २६ टक्के पाऊस कमी पडला आहे. त्यातही एटापल्ली व भामरागड हे दोन तालुके वगळले तर काही तालुक्यांमध्ये ६० ते ७० टक्के दरम्यान पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्हाभरातील अनेक जलाशये कोरडी आहेत. धानाचे पीक निघण्यास आणखी दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. यापुढचे दोन महिने पुरेसा पाऊस न झाल्यास धान पीक धोक्यात येऊन दुष्काळग्रस्त स्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.गडचिरोली जिल्ह्यात धान पिकाचे मुख्य उत्पादन घेतले जाते. जवळपास दीड लाख हेक्टरवर धान पिकाची लागवड केली जाते. धान पिकाला धानाच्या रोवणीपासून तर शेवटपर्यंत पावसाची गरज भासते. धानाला शेवटपर्यंत पाणी देण्यासाठी मामा तलाव, गाव तलाव, बोड्या बांधण्यात आल्या आहेत. पावसाचे पाणी या तलावांमध्ये साचविले जाते. सप्टेंबरनंतर पावसाचे प्रमाण कमी होते. कडक ऊन पडण्यास सुरूवात होत असल्याने शेतकरी धान पिकासाठी तलावातील पाण्याचा उपयोग करतात. त्यामुळे धानाचे पीक निघण्यासाठी तलाव भरले असणे आवश्यक आहे. मात्र यावर्षी पुरेशा प्रमाणात पाऊस झाला नाही. मध्यंतरी पावसाअभावी रोवणीचे कामे थांबली होती. त्यावेळी शेतकºयांनी तलाव फोडून रोवणी केली होती. त्यामुळे तलावात साचलेला जलसाठा आणखी कमी झाला. काही तलाव आता ३० ते ४० टक्केच भरली आहेत. एवढ्या पाण्याच्या भरवशावर शेवटपर्यंत धान पिकाला पाणी पुरविणे अशक्य असल्याने शेतकरी चिंताग्रस्त असल्याचे दिसून येत आहे.यावर्षी पावसाने अगदी सुरूवातीपासून हुलकावणी देण्यास सुरूवात केली. त्यामुळे धानाच्या रोवणीची कामे आॅगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत चालली. धानाचे पºहे टाकल्यानंतर ३० दिवसांच्या आत रोवणी झाल्यास धानाची वाढ होण्यास पुरेसा कालावधी उपलब्ध होतो व उत्पादन मिळते. मात्र यावर्षी पावसाने दगा दिल्याने धानाच्या रोवणीची कामे लांबली आहेत. परिणामी धानाच्या उत्पादनातही कमालीची घट येण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्यात पाऊस झाला नाही तर तलावातील पाणी संपून धान पीक करपण्याचा धोका आहे. त्यामुळे धान उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त असल्याचे दिसून येत आहे.रेगडी तलावात ६१ टक्केच जलसाठाचामोर्शी तालुक्यातील रेगडी येथील तलाव हा गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठा तलाव आहे. या तलावाच्या माध्यमातून जवळपास ४० किमी अंतरावरील शेतीला जल सिंचनाची सुविधा उपलब्ध होते. त्यामुळे चामोर्शी तालुक्यातील शेतकºयांचे लक्ष या तलावाकडे लागून राहते. हा तलाव दिना नदीवर बांधण्यात आला असल्याने पावसाळ्यात लवकरच भरतो. असा दरवर्षीचा अनुभव आहे. मात्र यावर्षी हा तलाव आॅगस्ट महिना उलटला तरी अजूनपर्यंत भरला नाही.१ सप्टेंबरपर्यंत या तलावात केवळ ६१ टक्के जलसाठा आहे. मागील वर्षी १ सप्टेंबरला हा तलाव १०० टक्के भरला होता. रेगडी तलावाच्या अंतर्गत धान पिकाची शेती आहे. त्यामुळे जवळपास दोन महिने आणखी पाणी पुरवावे लागणार आहे. १०० टक्के तलाव भरला असला तरच दोन महिने पाणी पुरणार आहे. तलावाचा नहर सोडण्यात आला आहे. त्यामुळे तलावातील पाणी कमी होत आहे. सप्टेंबर महिन्यात पाऊस पडणे आवश्यक आहे.सोयाबिन, कापूस पीक जोमातचामोर्शी, मुलचेरा, सिरोंचा, अहेरी या तालुक्यांमध्ये सोयाबिन, कापूस पिकाचेही उत्पादन घेतले जाते. यावर्षी पाऊस कमी पडला. त्यामुळे सोयाबिन, कापूस पीक जोमात असल्याचे दिसून येत आहे. कापसाला डवरणी करण्याचे काम नुकतेच पार पडले आहे.