शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

सिरोंचातील जलसाठे कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 00:27 IST

तालुक्यातील जलसाठे पूर्णपणे कोरडे पडले असल्याने तालुक्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मानवासह पशुपक्ष्यांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. सिरोंचा तालुक्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे ८५ टक्के क्षेत्रावर जंगल आहे.

ठळक मुद्देपाणीटंचाई तीव्र : उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाची चालढकल सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : तालुक्यातील जलसाठे पूर्णपणे कोरडे पडले असल्याने तालुक्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मानवासह पशुपक्ष्यांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.सिरोंचा तालुक्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे ८५ टक्के क्षेत्रावर जंगल आहे. जंगलातील वन्यजीव जंगलातील जलसाठ्यांवर तहान भागवतात. मात्र नैसर्गिक जलसाठे आटले आहेत. वन्यजीवांच्या पाण्याची सोय जंगलातच करण्यासाठी वनविभागाला कोट्यवधी रुपयांचा दरवर्षी निधी प्राप्त होते. मात्र वनविभाग सुद्धा सदर निधी जलसाठे निर्मितीवर खर्च करीत नाही. परस्पर या निधीची विल्हेवाट लावली जाते. जंगलातील कामांचे मूल्यमापन होत नाही. याचा गैरफायदा वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून घेतला जातो. जंगलातील जलसाठे आटल्याने वन्यजीव आता गावाकडे धाव घेऊ लागले आहेत. त्यामुळे त्यांची शिकार होण्याचे प्रमाण सुद्धा वाढले आहे.दुर्गम भागातील नागरिक हातपंप व विहिरीच्या पाण्यावर तहान भागवतात. मात्र विहीर व हातपंपानी तळ गाठला असल्याने तीव्र पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. जवळपासच्या नदीचे पाणी आणून तहान भागविली जात आहे. हातपंप बंद असतानाही पंचायत समितीमध्ये कार्यरत यांत्रिकी विभाग याकडे लक्ष देत नाही. ग्रामपंचायती सुद्धा हातपंप बंद असल्याबाबत यांत्रिक विभागाकडे तक्रार करीत नसल्याचे दिसून येते.गावातील एखाद्या हातपंपाला पाणी असल्यास त्या हातपंपावर महिलांची गर्दी दिसून येते. पाणी मिळावे, यासाठी रात्रीच पाणी भरावे लागत आहे. सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मात्र तक्रारी होत नसल्याने प्रशासनातील अधिकारी सुद्धा लक्ष देत नाही.तलावांचे खोलीकरण रखडलेसिरोंचा तालुक्यात धानाची शेती केली जाते. धानाला सिंचन देण्यासाठी प्रत्येक गावात मामा तलाव आहेत. मात्र या तलावांमध्ये गाळ साचल्याने तलावांची पाणीसाठवण क्षमता कमी झाली आहे. तलावांचे खोलीकरण करणे आवश्यक आहे. मात्र खोलीकरण झाले नसल्याने मार्च महिन्यातच तलाव कोरडे पडतात.जंगलातील जलसाठे आटल्यानंतर वन्यजीव गावाजवळच्या तलावात पाणी पिण्यासाठी येतात. मात्र हे तलाव सुद्धा कोरडे पडले असल्याने वन्यजीवांची मोठी पंचाईत झाली आहे. पाण्याअभावी कित्येक वन्यजीवांना आपला जीव गमवावा लागत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई