शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

सिरोंचातील जलसाठे कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 00:27 IST

तालुक्यातील जलसाठे पूर्णपणे कोरडे पडले असल्याने तालुक्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मानवासह पशुपक्ष्यांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. सिरोंचा तालुक्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे ८५ टक्के क्षेत्रावर जंगल आहे.

ठळक मुद्देपाणीटंचाई तीव्र : उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाची चालढकल सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : तालुक्यातील जलसाठे पूर्णपणे कोरडे पडले असल्याने तालुक्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मानवासह पशुपक्ष्यांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.सिरोंचा तालुक्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे ८५ टक्के क्षेत्रावर जंगल आहे. जंगलातील वन्यजीव जंगलातील जलसाठ्यांवर तहान भागवतात. मात्र नैसर्गिक जलसाठे आटले आहेत. वन्यजीवांच्या पाण्याची सोय जंगलातच करण्यासाठी वनविभागाला कोट्यवधी रुपयांचा दरवर्षी निधी प्राप्त होते. मात्र वनविभाग सुद्धा सदर निधी जलसाठे निर्मितीवर खर्च करीत नाही. परस्पर या निधीची विल्हेवाट लावली जाते. जंगलातील कामांचे मूल्यमापन होत नाही. याचा गैरफायदा वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून घेतला जातो. जंगलातील जलसाठे आटल्याने वन्यजीव आता गावाकडे धाव घेऊ लागले आहेत. त्यामुळे त्यांची शिकार होण्याचे प्रमाण सुद्धा वाढले आहे.दुर्गम भागातील नागरिक हातपंप व विहिरीच्या पाण्यावर तहान भागवतात. मात्र विहीर व हातपंपानी तळ गाठला असल्याने तीव्र पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. जवळपासच्या नदीचे पाणी आणून तहान भागविली जात आहे. हातपंप बंद असतानाही पंचायत समितीमध्ये कार्यरत यांत्रिकी विभाग याकडे लक्ष देत नाही. ग्रामपंचायती सुद्धा हातपंप बंद असल्याबाबत यांत्रिक विभागाकडे तक्रार करीत नसल्याचे दिसून येते.गावातील एखाद्या हातपंपाला पाणी असल्यास त्या हातपंपावर महिलांची गर्दी दिसून येते. पाणी मिळावे, यासाठी रात्रीच पाणी भरावे लागत आहे. सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मात्र तक्रारी होत नसल्याने प्रशासनातील अधिकारी सुद्धा लक्ष देत नाही.तलावांचे खोलीकरण रखडलेसिरोंचा तालुक्यात धानाची शेती केली जाते. धानाला सिंचन देण्यासाठी प्रत्येक गावात मामा तलाव आहेत. मात्र या तलावांमध्ये गाळ साचल्याने तलावांची पाणीसाठवण क्षमता कमी झाली आहे. तलावांचे खोलीकरण करणे आवश्यक आहे. मात्र खोलीकरण झाले नसल्याने मार्च महिन्यातच तलाव कोरडे पडतात.जंगलातील जलसाठे आटल्यानंतर वन्यजीव गावाजवळच्या तलावात पाणी पिण्यासाठी येतात. मात्र हे तलाव सुद्धा कोरडे पडले असल्याने वन्यजीवांची मोठी पंचाईत झाली आहे. पाण्याअभावी कित्येक वन्यजीवांना आपला जीव गमवावा लागत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई