शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

सिरोंचातील जलसाठे कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 00:27 IST

तालुक्यातील जलसाठे पूर्णपणे कोरडे पडले असल्याने तालुक्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मानवासह पशुपक्ष्यांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. सिरोंचा तालुक्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे ८५ टक्के क्षेत्रावर जंगल आहे.

ठळक मुद्देपाणीटंचाई तीव्र : उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाची चालढकल सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : तालुक्यातील जलसाठे पूर्णपणे कोरडे पडले असल्याने तालुक्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मानवासह पशुपक्ष्यांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.सिरोंचा तालुक्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे ८५ टक्के क्षेत्रावर जंगल आहे. जंगलातील वन्यजीव जंगलातील जलसाठ्यांवर तहान भागवतात. मात्र नैसर्गिक जलसाठे आटले आहेत. वन्यजीवांच्या पाण्याची सोय जंगलातच करण्यासाठी वनविभागाला कोट्यवधी रुपयांचा दरवर्षी निधी प्राप्त होते. मात्र वनविभाग सुद्धा सदर निधी जलसाठे निर्मितीवर खर्च करीत नाही. परस्पर या निधीची विल्हेवाट लावली जाते. जंगलातील कामांचे मूल्यमापन होत नाही. याचा गैरफायदा वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून घेतला जातो. जंगलातील जलसाठे आटल्याने वन्यजीव आता गावाकडे धाव घेऊ लागले आहेत. त्यामुळे त्यांची शिकार होण्याचे प्रमाण सुद्धा वाढले आहे.दुर्गम भागातील नागरिक हातपंप व विहिरीच्या पाण्यावर तहान भागवतात. मात्र विहीर व हातपंपानी तळ गाठला असल्याने तीव्र पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. जवळपासच्या नदीचे पाणी आणून तहान भागविली जात आहे. हातपंप बंद असतानाही पंचायत समितीमध्ये कार्यरत यांत्रिकी विभाग याकडे लक्ष देत नाही. ग्रामपंचायती सुद्धा हातपंप बंद असल्याबाबत यांत्रिक विभागाकडे तक्रार करीत नसल्याचे दिसून येते.गावातील एखाद्या हातपंपाला पाणी असल्यास त्या हातपंपावर महिलांची गर्दी दिसून येते. पाणी मिळावे, यासाठी रात्रीच पाणी भरावे लागत आहे. सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मात्र तक्रारी होत नसल्याने प्रशासनातील अधिकारी सुद्धा लक्ष देत नाही.तलावांचे खोलीकरण रखडलेसिरोंचा तालुक्यात धानाची शेती केली जाते. धानाला सिंचन देण्यासाठी प्रत्येक गावात मामा तलाव आहेत. मात्र या तलावांमध्ये गाळ साचल्याने तलावांची पाणीसाठवण क्षमता कमी झाली आहे. तलावांचे खोलीकरण करणे आवश्यक आहे. मात्र खोलीकरण झाले नसल्याने मार्च महिन्यातच तलाव कोरडे पडतात.जंगलातील जलसाठे आटल्यानंतर वन्यजीव गावाजवळच्या तलावात पाणी पिण्यासाठी येतात. मात्र हे तलाव सुद्धा कोरडे पडले असल्याने वन्यजीवांची मोठी पंचाईत झाली आहे. पाण्याअभावी कित्येक वन्यजीवांना आपला जीव गमवावा लागत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई