शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
2
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
3
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
4
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
5
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
6
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
7
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
8
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
9
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
10
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
11
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
12
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
13
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
14
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
15
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
16
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
17
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
18
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
19
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
20
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 

पालिकेने लावला पाणी चोरीला लगाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 00:32 IST

उन्हाळ्याच्या दिवसात नजीकच्या वैनगंगा नदीची पाणी पातळी प्रचंड खालावत असल्याने शहराच्या चढ्या भागात नळाचे पाणी येत नाही. परिणामी दरवर्षी उन्हाळ्यात गडचिरोली शहराच्या अनेक वॉर्डात पाणी टंचाईच्या प्रश्नावरून बोंब होत असते.

ठळक मुद्देदोन महिन्यातील कारवाई : आतापर्यंत ५७ टिल्लुपंप जप्त; एकही पंप सोडविला नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : उन्हाळ्याच्या दिवसात नजीकच्या वैनगंगा नदीची पाणी पातळी प्रचंड खालावत असल्याने शहराच्या चढ्या भागात नळाचे पाणी येत नाही. परिणामी दरवर्षी उन्हाळ्यात गडचिरोली शहराच्या अनेक वॉर्डात पाणी टंचाईच्या प्रश्नावरून बोंब होत असते. अशा परिस्थितीत गेल्या दोन महिन्यात टिल्लूपंपाने पाणी खेचणाऱ्या ५७ जणांवर पालिकेने कारवाई करून त्यांचे पंप जप्त केले. कारवाईच्या माध्यमातून पालिका प्रशासनाने शहरातील पाणी चोरीला लगाम लावला आहे.दरवर्षीच्या उन्हाळ्यात पाणी पुरवठ्याची समस्या निर्माण होते. आपल्याला पुरेसे पाणी मिळावे म्हणून अनेक लोक नळाला टिल्लू पंप लावून पाणी खेचतात. ही समस्या काही प्रमाणात मार्गी लावण्यासाठी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी स्वतंत्र पथक गठीत केले. सदर पथकाने एप्रिल व मे या दोन महिन्याच्या कालावधीत एकूण ५७ टिल्लुपंप जप्त केले. या कारवाईमुळे नळाला टिल्लुपंप लावून अधिकचे पाणी खेचणाऱ्यांना आळा बसला.ज्या नळधारकांचे टिल्लुपंप जप्त करण्यात आले, त्या प्रत्येक नळधारकावर दोन हजार रूपयांचा दंडही आकारण्यात आला आहे. तसेच टिल्लुपंप सोडवून घेण्यासाठी पालिकेकडे रितसर अर्ज करून दंडाची रक्कम व इतर शुल्काची रक्कम संबंधितांनी अदा करावी, असे आवाहन पालिकेचे मुख्याधिकारी कृष्णा निपाने केले. मात्र एकाही नळधारकाने टिल्लुपंप शुल्काची रक्कम भरून तो सोडविला नाही, हे विशेष.एखाद्या टिल्लुपंपधारकाला त्याचा जप्त केलेला टिल्लुपंप सोडवून परत न्यावयाचा असल्यास संबंधितांनी पालिकेकडे लेखी अर्ज करणे अनिवार्य करण्यात आले आहे. या अर्जात कोणत्या तारखेपासून टिल्लुपंप लावून किती पाण्याचा उपसा केला. याचा उल्लेख असावा, असे मुख्याधिकारी कृष्णा निपाने यांनी सूचित केले आहे. टिल्लुपंप लावून पाण्याचा अधिक उपसा केल्याचे संबंधित नळधारकाकडून या अर्जाच्या माध्यमातून कबूल केले जाते. यावरून पालिका प्रशासनाच्या वतीने संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यास सुलभ होते. अशा प्रकारच्या कारवाईच्या भितीने एकाही टिल्लुपंपधारकांनी रितसर अर्ज करून आपला टिल्लुपंप सोडविला नाही. मुख्याधिकाऱ्यांच्या कठोर धोरणामुळे टिल्लुपंपधारकांना धसका बसला असून पाणी चोरीला लगाम बसला आहे.दरवर्षी उन्हाळ्यात मार्च महिन्यापासूनच वैनगंगा नदीची पाणी पातळी खालावत असल्याने शहराच्या विविध वार्डात पाणी टंचाईची समस्या निर्माण होत होती. या नळाला टिल्लुपंप लावणे हा प्रकारही कारणीभूत होता. मात्र पालिकेचे मुख्याधिकारी निपाने व पाणी पुरवठा सभापती प्रविण वाघरे यांच्या नियोजनबध्द कारभारामुळे यंदा शहरात फारशी पाणी टंचाई नसल्याचे दिसून येत आहे.नळ पाणी पुरवठ्याचा दाब वाढलामार्च महिन्यात तसेच एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अनेक नळधारकांच्या घरी नळाद्वारे येणाऱ्या पाण्याचा दाब कमी होता. कारण शहरातील बरेचशे नळधारक नळाला टिल्लुपंप लावत होते. मात्र पालिकेने टिल्लुपंप जप्तीची कारवाई हाती घेतल्यानंतर अनेकांनी नळाला टिल्लुपंप लावणे बंद केले. परिणामी अनेकांच्या नळ पाणी पुरवठ्याचा दाब वाढला आहे. अशी प्रतिक्रियाही अनेकांनी मुख्याधिकाºयांना दिली आहे.पालिका प्रशासनाच्या वतीने टिल्लुपंप जप्त मोहीम राबविण्यात येत असून या मोहिमेला आणखी वेग देण्यात येणार आहे. नळाला टिल्लुपंप लावून पाणी खेचत असल्याचे दिसल्यास कोणालाही माफ केले जाणार नाही. शहरातील सर्व नळधारकांना समान व पुरेशा प्रमाणात पाणी मिळण्यासाठी टिल्लुपंप लावण्याचा प्रकार संबंधितांनी बंद करावा. पालिकेच्या पथकातील कर्मचारी नळ येण्याच्या वेळी सकाळी व सायंकाळी शहराच्या विविध वार्डात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून ही कारवाई करीत आहेत.- कृष्णा निपाने, मुख्याधिकारी,नगर परिषद गडचिरोलीटिल्लुपंप जप्तीच्या कारवाईमुळे नळधारकांना योग्यरित्या पाणी मिळत आहे. पालिकेची नळ योजना असलेल्या वैनगंगा नदीची पाणी पातळी खालावली असली तरी शहरात फारशी पाणी टंचाई नाही. तसेच पाणी टंचाईच्या नावावर लोकांच्या तक्रारीही नाहीत. उर्वरित उन्हाळाभर शहरात पाणी टंचाई निर्माण होऊ देणार नाही. काही दिवसांपूर्वी पाणी पातळी खालावल्याने शहरात पाणी समस्या निर्माण झाली होती. त्यानंतर आपण स्वत: नळ योजनेच्या ठिकाणी नदीवर जाऊन उचित कार्यवाही केली.- प्रविण वाघरे, पाणी पुरवठा सभापती, न.प. गडचिरोली