शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
2
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
3
ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
4
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
5
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
6
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
7
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
8
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
9
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
10
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
11
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
12
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
13
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
14
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव
15
GST कपातीचा परिणाम; ऑक्टोबरमध्ये महागाई दर 10 वर्षांतील नीचांकी पातळीवर
16
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
17
Delhi Blast: PM मोदी ॲक्शन मोडवर, थोड्याच वेळात हायलेव्हल बैठक; जयशंकर, डोवाल यांच्यासह... 
18
थरारक! लग्नातच नवरदेवावर चाकूने जीवघेणा हल्ला; ड्रोनद्वारे आरोपीचा २ किमी पाठलाग केला, मग...
19
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
20
Astro Tips: दर गुरुवारी औदुंबराला पाणी घालण्याचे आध्यात्मिक आणि वैद्यकीय लाभ वाचून चकित व्हाल!

पालिकेने लावला पाणी चोरीला लगाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 00:32 IST

उन्हाळ्याच्या दिवसात नजीकच्या वैनगंगा नदीची पाणी पातळी प्रचंड खालावत असल्याने शहराच्या चढ्या भागात नळाचे पाणी येत नाही. परिणामी दरवर्षी उन्हाळ्यात गडचिरोली शहराच्या अनेक वॉर्डात पाणी टंचाईच्या प्रश्नावरून बोंब होत असते.

ठळक मुद्देदोन महिन्यातील कारवाई : आतापर्यंत ५७ टिल्लुपंप जप्त; एकही पंप सोडविला नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : उन्हाळ्याच्या दिवसात नजीकच्या वैनगंगा नदीची पाणी पातळी प्रचंड खालावत असल्याने शहराच्या चढ्या भागात नळाचे पाणी येत नाही. परिणामी दरवर्षी उन्हाळ्यात गडचिरोली शहराच्या अनेक वॉर्डात पाणी टंचाईच्या प्रश्नावरून बोंब होत असते. अशा परिस्थितीत गेल्या दोन महिन्यात टिल्लूपंपाने पाणी खेचणाऱ्या ५७ जणांवर पालिकेने कारवाई करून त्यांचे पंप जप्त केले. कारवाईच्या माध्यमातून पालिका प्रशासनाने शहरातील पाणी चोरीला लगाम लावला आहे.दरवर्षीच्या उन्हाळ्यात पाणी पुरवठ्याची समस्या निर्माण होते. आपल्याला पुरेसे पाणी मिळावे म्हणून अनेक लोक नळाला टिल्लू पंप लावून पाणी खेचतात. ही समस्या काही प्रमाणात मार्गी लावण्यासाठी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी स्वतंत्र पथक गठीत केले. सदर पथकाने एप्रिल व मे या दोन महिन्याच्या कालावधीत एकूण ५७ टिल्लुपंप जप्त केले. या कारवाईमुळे नळाला टिल्लुपंप लावून अधिकचे पाणी खेचणाऱ्यांना आळा बसला.ज्या नळधारकांचे टिल्लुपंप जप्त करण्यात आले, त्या प्रत्येक नळधारकावर दोन हजार रूपयांचा दंडही आकारण्यात आला आहे. तसेच टिल्लुपंप सोडवून घेण्यासाठी पालिकेकडे रितसर अर्ज करून दंडाची रक्कम व इतर शुल्काची रक्कम संबंधितांनी अदा करावी, असे आवाहन पालिकेचे मुख्याधिकारी कृष्णा निपाने केले. मात्र एकाही नळधारकाने टिल्लुपंप शुल्काची रक्कम भरून तो सोडविला नाही, हे विशेष.एखाद्या टिल्लुपंपधारकाला त्याचा जप्त केलेला टिल्लुपंप सोडवून परत न्यावयाचा असल्यास संबंधितांनी पालिकेकडे लेखी अर्ज करणे अनिवार्य करण्यात आले आहे. या अर्जात कोणत्या तारखेपासून टिल्लुपंप लावून किती पाण्याचा उपसा केला. याचा उल्लेख असावा, असे मुख्याधिकारी कृष्णा निपाने यांनी सूचित केले आहे. टिल्लुपंप लावून पाण्याचा अधिक उपसा केल्याचे संबंधित नळधारकाकडून या अर्जाच्या माध्यमातून कबूल केले जाते. यावरून पालिका प्रशासनाच्या वतीने संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यास सुलभ होते. अशा प्रकारच्या कारवाईच्या भितीने एकाही टिल्लुपंपधारकांनी रितसर अर्ज करून आपला टिल्लुपंप सोडविला नाही. मुख्याधिकाऱ्यांच्या कठोर धोरणामुळे टिल्लुपंपधारकांना धसका बसला असून पाणी चोरीला लगाम बसला आहे.दरवर्षी उन्हाळ्यात मार्च महिन्यापासूनच वैनगंगा नदीची पाणी पातळी खालावत असल्याने शहराच्या विविध वार्डात पाणी टंचाईची समस्या निर्माण होत होती. या नळाला टिल्लुपंप लावणे हा प्रकारही कारणीभूत होता. मात्र पालिकेचे मुख्याधिकारी निपाने व पाणी पुरवठा सभापती प्रविण वाघरे यांच्या नियोजनबध्द कारभारामुळे यंदा शहरात फारशी पाणी टंचाई नसल्याचे दिसून येत आहे.नळ पाणी पुरवठ्याचा दाब वाढलामार्च महिन्यात तसेच एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अनेक नळधारकांच्या घरी नळाद्वारे येणाऱ्या पाण्याचा दाब कमी होता. कारण शहरातील बरेचशे नळधारक नळाला टिल्लुपंप लावत होते. मात्र पालिकेने टिल्लुपंप जप्तीची कारवाई हाती घेतल्यानंतर अनेकांनी नळाला टिल्लुपंप लावणे बंद केले. परिणामी अनेकांच्या नळ पाणी पुरवठ्याचा दाब वाढला आहे. अशी प्रतिक्रियाही अनेकांनी मुख्याधिकाºयांना दिली आहे.पालिका प्रशासनाच्या वतीने टिल्लुपंप जप्त मोहीम राबविण्यात येत असून या मोहिमेला आणखी वेग देण्यात येणार आहे. नळाला टिल्लुपंप लावून पाणी खेचत असल्याचे दिसल्यास कोणालाही माफ केले जाणार नाही. शहरातील सर्व नळधारकांना समान व पुरेशा प्रमाणात पाणी मिळण्यासाठी टिल्लुपंप लावण्याचा प्रकार संबंधितांनी बंद करावा. पालिकेच्या पथकातील कर्मचारी नळ येण्याच्या वेळी सकाळी व सायंकाळी शहराच्या विविध वार्डात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून ही कारवाई करीत आहेत.- कृष्णा निपाने, मुख्याधिकारी,नगर परिषद गडचिरोलीटिल्लुपंप जप्तीच्या कारवाईमुळे नळधारकांना योग्यरित्या पाणी मिळत आहे. पालिकेची नळ योजना असलेल्या वैनगंगा नदीची पाणी पातळी खालावली असली तरी शहरात फारशी पाणी टंचाई नाही. तसेच पाणी टंचाईच्या नावावर लोकांच्या तक्रारीही नाहीत. उर्वरित उन्हाळाभर शहरात पाणी टंचाई निर्माण होऊ देणार नाही. काही दिवसांपूर्वी पाणी पातळी खालावल्याने शहरात पाणी समस्या निर्माण झाली होती. त्यानंतर आपण स्वत: नळ योजनेच्या ठिकाणी नदीवर जाऊन उचित कार्यवाही केली.- प्रविण वाघरे, पाणी पुरवठा सभापती, न.प. गडचिरोली