शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

पालिकेने लावला पाणी चोरीला लगाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 00:32 IST

उन्हाळ्याच्या दिवसात नजीकच्या वैनगंगा नदीची पाणी पातळी प्रचंड खालावत असल्याने शहराच्या चढ्या भागात नळाचे पाणी येत नाही. परिणामी दरवर्षी उन्हाळ्यात गडचिरोली शहराच्या अनेक वॉर्डात पाणी टंचाईच्या प्रश्नावरून बोंब होत असते.

ठळक मुद्देदोन महिन्यातील कारवाई : आतापर्यंत ५७ टिल्लुपंप जप्त; एकही पंप सोडविला नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : उन्हाळ्याच्या दिवसात नजीकच्या वैनगंगा नदीची पाणी पातळी प्रचंड खालावत असल्याने शहराच्या चढ्या भागात नळाचे पाणी येत नाही. परिणामी दरवर्षी उन्हाळ्यात गडचिरोली शहराच्या अनेक वॉर्डात पाणी टंचाईच्या प्रश्नावरून बोंब होत असते. अशा परिस्थितीत गेल्या दोन महिन्यात टिल्लूपंपाने पाणी खेचणाऱ्या ५७ जणांवर पालिकेने कारवाई करून त्यांचे पंप जप्त केले. कारवाईच्या माध्यमातून पालिका प्रशासनाने शहरातील पाणी चोरीला लगाम लावला आहे.दरवर्षीच्या उन्हाळ्यात पाणी पुरवठ्याची समस्या निर्माण होते. आपल्याला पुरेसे पाणी मिळावे म्हणून अनेक लोक नळाला टिल्लू पंप लावून पाणी खेचतात. ही समस्या काही प्रमाणात मार्गी लावण्यासाठी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी स्वतंत्र पथक गठीत केले. सदर पथकाने एप्रिल व मे या दोन महिन्याच्या कालावधीत एकूण ५७ टिल्लुपंप जप्त केले. या कारवाईमुळे नळाला टिल्लुपंप लावून अधिकचे पाणी खेचणाऱ्यांना आळा बसला.ज्या नळधारकांचे टिल्लुपंप जप्त करण्यात आले, त्या प्रत्येक नळधारकावर दोन हजार रूपयांचा दंडही आकारण्यात आला आहे. तसेच टिल्लुपंप सोडवून घेण्यासाठी पालिकेकडे रितसर अर्ज करून दंडाची रक्कम व इतर शुल्काची रक्कम संबंधितांनी अदा करावी, असे आवाहन पालिकेचे मुख्याधिकारी कृष्णा निपाने केले. मात्र एकाही नळधारकाने टिल्लुपंप शुल्काची रक्कम भरून तो सोडविला नाही, हे विशेष.एखाद्या टिल्लुपंपधारकाला त्याचा जप्त केलेला टिल्लुपंप सोडवून परत न्यावयाचा असल्यास संबंधितांनी पालिकेकडे लेखी अर्ज करणे अनिवार्य करण्यात आले आहे. या अर्जात कोणत्या तारखेपासून टिल्लुपंप लावून किती पाण्याचा उपसा केला. याचा उल्लेख असावा, असे मुख्याधिकारी कृष्णा निपाने यांनी सूचित केले आहे. टिल्लुपंप लावून पाण्याचा अधिक उपसा केल्याचे संबंधित नळधारकाकडून या अर्जाच्या माध्यमातून कबूल केले जाते. यावरून पालिका प्रशासनाच्या वतीने संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यास सुलभ होते. अशा प्रकारच्या कारवाईच्या भितीने एकाही टिल्लुपंपधारकांनी रितसर अर्ज करून आपला टिल्लुपंप सोडविला नाही. मुख्याधिकाऱ्यांच्या कठोर धोरणामुळे टिल्लुपंपधारकांना धसका बसला असून पाणी चोरीला लगाम बसला आहे.दरवर्षी उन्हाळ्यात मार्च महिन्यापासूनच वैनगंगा नदीची पाणी पातळी खालावत असल्याने शहराच्या विविध वार्डात पाणी टंचाईची समस्या निर्माण होत होती. या नळाला टिल्लुपंप लावणे हा प्रकारही कारणीभूत होता. मात्र पालिकेचे मुख्याधिकारी निपाने व पाणी पुरवठा सभापती प्रविण वाघरे यांच्या नियोजनबध्द कारभारामुळे यंदा शहरात फारशी पाणी टंचाई नसल्याचे दिसून येत आहे.नळ पाणी पुरवठ्याचा दाब वाढलामार्च महिन्यात तसेच एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अनेक नळधारकांच्या घरी नळाद्वारे येणाऱ्या पाण्याचा दाब कमी होता. कारण शहरातील बरेचशे नळधारक नळाला टिल्लुपंप लावत होते. मात्र पालिकेने टिल्लुपंप जप्तीची कारवाई हाती घेतल्यानंतर अनेकांनी नळाला टिल्लुपंप लावणे बंद केले. परिणामी अनेकांच्या नळ पाणी पुरवठ्याचा दाब वाढला आहे. अशी प्रतिक्रियाही अनेकांनी मुख्याधिकाºयांना दिली आहे.पालिका प्रशासनाच्या वतीने टिल्लुपंप जप्त मोहीम राबविण्यात येत असून या मोहिमेला आणखी वेग देण्यात येणार आहे. नळाला टिल्लुपंप लावून पाणी खेचत असल्याचे दिसल्यास कोणालाही माफ केले जाणार नाही. शहरातील सर्व नळधारकांना समान व पुरेशा प्रमाणात पाणी मिळण्यासाठी टिल्लुपंप लावण्याचा प्रकार संबंधितांनी बंद करावा. पालिकेच्या पथकातील कर्मचारी नळ येण्याच्या वेळी सकाळी व सायंकाळी शहराच्या विविध वार्डात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून ही कारवाई करीत आहेत.- कृष्णा निपाने, मुख्याधिकारी,नगर परिषद गडचिरोलीटिल्लुपंप जप्तीच्या कारवाईमुळे नळधारकांना योग्यरित्या पाणी मिळत आहे. पालिकेची नळ योजना असलेल्या वैनगंगा नदीची पाणी पातळी खालावली असली तरी शहरात फारशी पाणी टंचाई नाही. तसेच पाणी टंचाईच्या नावावर लोकांच्या तक्रारीही नाहीत. उर्वरित उन्हाळाभर शहरात पाणी टंचाई निर्माण होऊ देणार नाही. काही दिवसांपूर्वी पाणी पातळी खालावल्याने शहरात पाणी समस्या निर्माण झाली होती. त्यानंतर आपण स्वत: नळ योजनेच्या ठिकाणी नदीवर जाऊन उचित कार्यवाही केली.- प्रविण वाघरे, पाणी पुरवठा सभापती, न.प. गडचिरोली