शहरं
Join us  
Trending Stories
1
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
2
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
3
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
4
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
5
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
6
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
7
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
8
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
10
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
11
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
12
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
13
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
14
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
15
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
16
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
17
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
18
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
19
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
20
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं

पालिकेने लावला पाणी चोरीला लगाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 00:32 IST

उन्हाळ्याच्या दिवसात नजीकच्या वैनगंगा नदीची पाणी पातळी प्रचंड खालावत असल्याने शहराच्या चढ्या भागात नळाचे पाणी येत नाही. परिणामी दरवर्षी उन्हाळ्यात गडचिरोली शहराच्या अनेक वॉर्डात पाणी टंचाईच्या प्रश्नावरून बोंब होत असते.

ठळक मुद्देदोन महिन्यातील कारवाई : आतापर्यंत ५७ टिल्लुपंप जप्त; एकही पंप सोडविला नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : उन्हाळ्याच्या दिवसात नजीकच्या वैनगंगा नदीची पाणी पातळी प्रचंड खालावत असल्याने शहराच्या चढ्या भागात नळाचे पाणी येत नाही. परिणामी दरवर्षी उन्हाळ्यात गडचिरोली शहराच्या अनेक वॉर्डात पाणी टंचाईच्या प्रश्नावरून बोंब होत असते. अशा परिस्थितीत गेल्या दोन महिन्यात टिल्लूपंपाने पाणी खेचणाऱ्या ५७ जणांवर पालिकेने कारवाई करून त्यांचे पंप जप्त केले. कारवाईच्या माध्यमातून पालिका प्रशासनाने शहरातील पाणी चोरीला लगाम लावला आहे.दरवर्षीच्या उन्हाळ्यात पाणी पुरवठ्याची समस्या निर्माण होते. आपल्याला पुरेसे पाणी मिळावे म्हणून अनेक लोक नळाला टिल्लू पंप लावून पाणी खेचतात. ही समस्या काही प्रमाणात मार्गी लावण्यासाठी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी स्वतंत्र पथक गठीत केले. सदर पथकाने एप्रिल व मे या दोन महिन्याच्या कालावधीत एकूण ५७ टिल्लुपंप जप्त केले. या कारवाईमुळे नळाला टिल्लुपंप लावून अधिकचे पाणी खेचणाऱ्यांना आळा बसला.ज्या नळधारकांचे टिल्लुपंप जप्त करण्यात आले, त्या प्रत्येक नळधारकावर दोन हजार रूपयांचा दंडही आकारण्यात आला आहे. तसेच टिल्लुपंप सोडवून घेण्यासाठी पालिकेकडे रितसर अर्ज करून दंडाची रक्कम व इतर शुल्काची रक्कम संबंधितांनी अदा करावी, असे आवाहन पालिकेचे मुख्याधिकारी कृष्णा निपाने केले. मात्र एकाही नळधारकाने टिल्लुपंप शुल्काची रक्कम भरून तो सोडविला नाही, हे विशेष.एखाद्या टिल्लुपंपधारकाला त्याचा जप्त केलेला टिल्लुपंप सोडवून परत न्यावयाचा असल्यास संबंधितांनी पालिकेकडे लेखी अर्ज करणे अनिवार्य करण्यात आले आहे. या अर्जात कोणत्या तारखेपासून टिल्लुपंप लावून किती पाण्याचा उपसा केला. याचा उल्लेख असावा, असे मुख्याधिकारी कृष्णा निपाने यांनी सूचित केले आहे. टिल्लुपंप लावून पाण्याचा अधिक उपसा केल्याचे संबंधित नळधारकाकडून या अर्जाच्या माध्यमातून कबूल केले जाते. यावरून पालिका प्रशासनाच्या वतीने संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यास सुलभ होते. अशा प्रकारच्या कारवाईच्या भितीने एकाही टिल्लुपंपधारकांनी रितसर अर्ज करून आपला टिल्लुपंप सोडविला नाही. मुख्याधिकाऱ्यांच्या कठोर धोरणामुळे टिल्लुपंपधारकांना धसका बसला असून पाणी चोरीला लगाम बसला आहे.दरवर्षी उन्हाळ्यात मार्च महिन्यापासूनच वैनगंगा नदीची पाणी पातळी खालावत असल्याने शहराच्या विविध वार्डात पाणी टंचाईची समस्या निर्माण होत होती. या नळाला टिल्लुपंप लावणे हा प्रकारही कारणीभूत होता. मात्र पालिकेचे मुख्याधिकारी निपाने व पाणी पुरवठा सभापती प्रविण वाघरे यांच्या नियोजनबध्द कारभारामुळे यंदा शहरात फारशी पाणी टंचाई नसल्याचे दिसून येत आहे.नळ पाणी पुरवठ्याचा दाब वाढलामार्च महिन्यात तसेच एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अनेक नळधारकांच्या घरी नळाद्वारे येणाऱ्या पाण्याचा दाब कमी होता. कारण शहरातील बरेचशे नळधारक नळाला टिल्लुपंप लावत होते. मात्र पालिकेने टिल्लुपंप जप्तीची कारवाई हाती घेतल्यानंतर अनेकांनी नळाला टिल्लुपंप लावणे बंद केले. परिणामी अनेकांच्या नळ पाणी पुरवठ्याचा दाब वाढला आहे. अशी प्रतिक्रियाही अनेकांनी मुख्याधिकाºयांना दिली आहे.पालिका प्रशासनाच्या वतीने टिल्लुपंप जप्त मोहीम राबविण्यात येत असून या मोहिमेला आणखी वेग देण्यात येणार आहे. नळाला टिल्लुपंप लावून पाणी खेचत असल्याचे दिसल्यास कोणालाही माफ केले जाणार नाही. शहरातील सर्व नळधारकांना समान व पुरेशा प्रमाणात पाणी मिळण्यासाठी टिल्लुपंप लावण्याचा प्रकार संबंधितांनी बंद करावा. पालिकेच्या पथकातील कर्मचारी नळ येण्याच्या वेळी सकाळी व सायंकाळी शहराच्या विविध वार्डात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून ही कारवाई करीत आहेत.- कृष्णा निपाने, मुख्याधिकारी,नगर परिषद गडचिरोलीटिल्लुपंप जप्तीच्या कारवाईमुळे नळधारकांना योग्यरित्या पाणी मिळत आहे. पालिकेची नळ योजना असलेल्या वैनगंगा नदीची पाणी पातळी खालावली असली तरी शहरात फारशी पाणी टंचाई नाही. तसेच पाणी टंचाईच्या नावावर लोकांच्या तक्रारीही नाहीत. उर्वरित उन्हाळाभर शहरात पाणी टंचाई निर्माण होऊ देणार नाही. काही दिवसांपूर्वी पाणी पातळी खालावल्याने शहरात पाणी समस्या निर्माण झाली होती. त्यानंतर आपण स्वत: नळ योजनेच्या ठिकाणी नदीवर जाऊन उचित कार्यवाही केली.- प्रविण वाघरे, पाणी पुरवठा सभापती, न.प. गडचिरोली