शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
2
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
3
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
4
घर खरेदीदारांसाठी मोठी बातमी! घर बांधणे आणि खरेदी करणे स्वस्त होणार? कोणाला होणार सर्वाधिक फायदा?
5
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: पवार-ठाकरेंशी फोनवर काय बोलणे झाले? CM फडणवीसांनी सगळेच सांगितले
6
नवऱ्याच्या हत्येचा कट रचला, बॉयफ्रेंडही सामील झाला; पण 'त्या' WhatsApp मेसेजमुळे पत्नीचा डाव उघड झाला!
7
"त्यांना लीड भूमिका केलेल्याच मुली हव्या असतात...", अमृता देशमुखने सांगितलं टीव्ही मालिकांचं कटू सत्य
8
श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना अटक; सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप
9
“RSS बंदी असलेली संघटना आहे का?”; CM फडणवीसांचे सुनेत्रा पवारांवरील टीकेला प्रत्युत्तर
10
Dream 11 लव्हर्सचा 'गेम ओव्हर'! टीम इंडियाच्या जर्सीवरुनही 'गायब' होणार नाव? जाणून घ्या सविस्तर
11
Airtel नं आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये केला मोठा बदल; पूर्वीपेक्षा कमी मिळणार डेटा, पाहा डिटेल्स
12
Kim Jong Un: मुलांना जवळ घेतलं, सैनिकांना दिला धीर, हुकुमशाह किम जोंग उन यांचे डोळे का पाणावले?
13
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
14
Shani Amavasya 2025: देवघरात शनि देवाची मूर्ति किंवा प्रतिमा न ठेवण्यामागे काय आहे कारण?
15
बापरे! रात्रभर बेडवर नागाजवळ झोपला, सकाळी डोळं उघडताच धक्का बसला, घडलं असं...
16
Hero ने फक्त १ लाख रुपयांना लॉन्च केली दमदार बाईक, जाणून घ्या फिचर्स...
17
"चावण्याचं कारण केवळ..."; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?
18
आधी लोकांची फसवणूक केली, नंतर तुरुंगात जायला लागू नये म्हणून महिलेनं काय शक्कल लढवली वाचाच!
19
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
20
Asia Cup 2025 : MS धोनीनं करुन दाखवलं ते सूर्याला जमणार का? रोहितही ठरलाय फेल! जाणून घ्या खास रेकॉर्ड

पाण्यासाठी जनावरांची आबाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2016 03:50 IST

गडचिरोली जिल्ह्यात यंदा नद्या, नाले आटून गेले आहेत. त्यामुळे मार्च, एप्रिल महिन्यातच दुर्गम भागात अनेक गावात पाणी टंचाईची समस्या जाणवू लागली आहे.

प्रशासन उदासीन : मर्देहूर गावात नागरिक स्त्रोतातून पाणी काढून पाजत आहेतभामरागड : गडचिरोली जिल्ह्यात यंदा नद्या, नाले आटून गेले आहेत. त्यामुळे मार्च, एप्रिल महिन्यातच दुर्गम भागात अनेक गावात पाणी टंचाईची समस्या जाणवू लागली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची पायपीट सुरू आहे. तर भामरागड तालुक्यात अनेक दुर्गम गावात पाळीव व जंगली जनावरांना पिण्यासाठी परिसरात पाणी राहिलेले नसल्याने परिस्थिती आणखीणच कठीण झाली आहे. भामरागड तालुक्याच्या अनेक दुर्गम गावात लोकमत प्रतिनिधीने फेरफटका मारला असता, विदारक परिस्थिती दिसून आली. तालुक्यातील मर्देहूर अरण्य परिसरातील गाव आहे. येथे जनावरांना पिण्यासाठी पाणी नागरिकांना दूर अंतरावरून आणून त्यांना पाणी पाजावे लागत आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर स्थितीत आहे. गावाजवळ कुठेही पाण्याचे जलस्त्रोत नाहीत. गावातील हातपंपाचे पाणी काढून त्याची साठवणूक करावी लागत आहे व त्यातून पाणी जनावरांना पिण्यासाठी वापरावे लागत आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासूनच तापमान वाढवू लागले असल्याने जंगलातील पाणवठे व जलस्त्रोत आटलेत. दुसरी कुठलीही व्यवस्था जनावरांच्या पाण्यासाठी नाही. गावातील बोअरवेलजवळच नागरिकांनी लाकूड टाकून जनावरांच्या पिण्यासाठी पाणवठा तयार केला आहे व पाणवठ्यात गावकरी दररोज पाणी भरून ठेवतात. त्यातून जनावरांची सोय झाली आहे. सदर गावात गाव तलाव मंजूर करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे केली आहे. भामरागड तालुक्याच्या १२८ पैकी साधारणत: ७० ते ८० गावात अशी स्थिती असून एप्रिल व मे महिन्यात पाणी टंचाईची परिस्थिती भीषण होण्याची स्थिती आहे. मात्र प्रशासनाकडून अद्यापही कोणत्याही हालचाली पाणी टंचाई समस्या सोडवणुकीसाठी करण्यात आलेल्या नाही. (तालुका प्रतिनिधी)