शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी जनावरांची आबाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2016 03:50 IST

गडचिरोली जिल्ह्यात यंदा नद्या, नाले आटून गेले आहेत. त्यामुळे मार्च, एप्रिल महिन्यातच दुर्गम भागात अनेक गावात पाणी टंचाईची समस्या जाणवू लागली आहे.

प्रशासन उदासीन : मर्देहूर गावात नागरिक स्त्रोतातून पाणी काढून पाजत आहेतभामरागड : गडचिरोली जिल्ह्यात यंदा नद्या, नाले आटून गेले आहेत. त्यामुळे मार्च, एप्रिल महिन्यातच दुर्गम भागात अनेक गावात पाणी टंचाईची समस्या जाणवू लागली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची पायपीट सुरू आहे. तर भामरागड तालुक्यात अनेक दुर्गम गावात पाळीव व जंगली जनावरांना पिण्यासाठी परिसरात पाणी राहिलेले नसल्याने परिस्थिती आणखीणच कठीण झाली आहे. भामरागड तालुक्याच्या अनेक दुर्गम गावात लोकमत प्रतिनिधीने फेरफटका मारला असता, विदारक परिस्थिती दिसून आली. तालुक्यातील मर्देहूर अरण्य परिसरातील गाव आहे. येथे जनावरांना पिण्यासाठी पाणी नागरिकांना दूर अंतरावरून आणून त्यांना पाणी पाजावे लागत आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर स्थितीत आहे. गावाजवळ कुठेही पाण्याचे जलस्त्रोत नाहीत. गावातील हातपंपाचे पाणी काढून त्याची साठवणूक करावी लागत आहे व त्यातून पाणी जनावरांना पिण्यासाठी वापरावे लागत आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासूनच तापमान वाढवू लागले असल्याने जंगलातील पाणवठे व जलस्त्रोत आटलेत. दुसरी कुठलीही व्यवस्था जनावरांच्या पाण्यासाठी नाही. गावातील बोअरवेलजवळच नागरिकांनी लाकूड टाकून जनावरांच्या पिण्यासाठी पाणवठा तयार केला आहे व पाणवठ्यात गावकरी दररोज पाणी भरून ठेवतात. त्यातून जनावरांची सोय झाली आहे. सदर गावात गाव तलाव मंजूर करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे केली आहे. भामरागड तालुक्याच्या १२८ पैकी साधारणत: ७० ते ८० गावात अशी स्थिती असून एप्रिल व मे महिन्यात पाणी टंचाईची परिस्थिती भीषण होण्याची स्थिती आहे. मात्र प्रशासनाकडून अद्यापही कोणत्याही हालचाली पाणी टंचाई समस्या सोडवणुकीसाठी करण्यात आलेल्या नाही. (तालुका प्रतिनिधी)