शहरं
Join us  
Trending Stories
1
१२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
2
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
3
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
4
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
5
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
6
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
7
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
8
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
9
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
10
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
11
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
12
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
13
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
14
Jasprit Bumrah: आयपीएलदरम्यान जसप्रीत बुमराहनं पत्नी संजनाला नेलं डेटवर, शेअर केला खास फोटो
15
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
16
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
17
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
19
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
20
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...

पाण्यासाठी जनावरांची आबाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2016 03:50 IST

गडचिरोली जिल्ह्यात यंदा नद्या, नाले आटून गेले आहेत. त्यामुळे मार्च, एप्रिल महिन्यातच दुर्गम भागात अनेक गावात पाणी टंचाईची समस्या जाणवू लागली आहे.

प्रशासन उदासीन : मर्देहूर गावात नागरिक स्त्रोतातून पाणी काढून पाजत आहेतभामरागड : गडचिरोली जिल्ह्यात यंदा नद्या, नाले आटून गेले आहेत. त्यामुळे मार्च, एप्रिल महिन्यातच दुर्गम भागात अनेक गावात पाणी टंचाईची समस्या जाणवू लागली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची पायपीट सुरू आहे. तर भामरागड तालुक्यात अनेक दुर्गम गावात पाळीव व जंगली जनावरांना पिण्यासाठी परिसरात पाणी राहिलेले नसल्याने परिस्थिती आणखीणच कठीण झाली आहे. भामरागड तालुक्याच्या अनेक दुर्गम गावात लोकमत प्रतिनिधीने फेरफटका मारला असता, विदारक परिस्थिती दिसून आली. तालुक्यातील मर्देहूर अरण्य परिसरातील गाव आहे. येथे जनावरांना पिण्यासाठी पाणी नागरिकांना दूर अंतरावरून आणून त्यांना पाणी पाजावे लागत आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर स्थितीत आहे. गावाजवळ कुठेही पाण्याचे जलस्त्रोत नाहीत. गावातील हातपंपाचे पाणी काढून त्याची साठवणूक करावी लागत आहे व त्यातून पाणी जनावरांना पिण्यासाठी वापरावे लागत आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासूनच तापमान वाढवू लागले असल्याने जंगलातील पाणवठे व जलस्त्रोत आटलेत. दुसरी कुठलीही व्यवस्था जनावरांच्या पाण्यासाठी नाही. गावातील बोअरवेलजवळच नागरिकांनी लाकूड टाकून जनावरांच्या पिण्यासाठी पाणवठा तयार केला आहे व पाणवठ्यात गावकरी दररोज पाणी भरून ठेवतात. त्यातून जनावरांची सोय झाली आहे. सदर गावात गाव तलाव मंजूर करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे केली आहे. भामरागड तालुक्याच्या १२८ पैकी साधारणत: ७० ते ८० गावात अशी स्थिती असून एप्रिल व मे महिन्यात पाणी टंचाईची परिस्थिती भीषण होण्याची स्थिती आहे. मात्र प्रशासनाकडून अद्यापही कोणत्याही हालचाली पाणी टंचाई समस्या सोडवणुकीसाठी करण्यात आलेल्या नाही. (तालुका प्रतिनिधी)