शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

सरकारी कार्यालयाच्या खोल्या झाल्या गुदाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:38 IST

जिल्हाभरातील नागरिक ग्रहण करत असलेल्या सार्वजनिक ठिकाणच्या अन्नापासून तर ते घेत असलेल्या औषधींच्या तपासणीपर्यंतची महत्त्वाची जबाबदारी या विभागाला सांभाळावी ...

जिल्हाभरातील नागरिक ग्रहण करत असलेल्या सार्वजनिक ठिकाणच्या अन्नापासून तर ते घेत असलेल्या औषधींच्या तपासणीपर्यंतची महत्त्वाची जबाबदारी या विभागाला सांभाळावी लागते. मात्र अनेक वर्षांपासून या विभागात अधिकाऱ्यांची कमतरता आहे. औषध प्रशासन विभाग तर पूर्णपणे वाऱ्यावरच सोडला आहे. त्यात एकही पूर्णवेळ अधिकारी नाही. अन्न विभागात नागपूर येथील सहायक आयुक्तांकडे येथील प्रभार आहे. एका अन्न निरीक्षकाला जिल्हाभरातील कामकाज सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तरीही ते जिल्हाभरात फिरून तपासण्या करत मिळेल तिथे कारवाई करत असतात. मात्र विभागाने त्यांना पुरेशा सोयी आणि मनुष्यबळ दिल्यास त्यांच्या तपासण्यांचा वेग वाढू शकतो.

एप्रिल २०२० ते मार्च २०२१ यादरम्यान जप्त सुगंधित तंबाखू

महिना किंमत

एप्रिल १,२४,७८५

जून ७९,२३०

जुलै ५५,४०८

ऑक्टोबर १,६२,९५०

डिसेंबर २,०५,३४५

जानेवारी २७,१८०

फेब्रुवारी ७९,३८०

मार्च १,०३,५४५

(बॉक्स)

वर्षभरात ३८.८३ लाखांचा तंबाखू साठा जप्त

- जिल्ह्यात खर्रा खाणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. साध्या तंबाखूसोबत सुगंधित तंबाखू टाकून बनविलेल्या खर्ऱ्याला सर्वाधिक मागणी आहे. सुगंधित तंबाखूचे डबे नागपूर, तेलंगणा, छत्तीसगडमार्गे जिल्ह्यात आणणे सहज शक्य असल्यामुळे त्यांना रोखणे जवळजवळ अशक्य असते. त्यामुळे त्याचा प्रत्यक्ष वापर करणाऱ्यांवर कारवाई करणे हाच महत्त्वाचा सोपा मार्ग असतो.

- वर्षभरातील कारवायांवर नजर टाकल्यास अन्न निरीक्षक एस.पी. तोरेम यांनी २३ कारवायांमध्ये ३८ लाख ८३ हजारांचा सुगंधित तंबाखू साठा जप्त केला आहे. यातील काही कारवाया साठेबाजी करणाऱ्यांवर तर काही विक्रेत्यांवरील आहेत. मनुष्यबळ मिळाल्यास सदर कारवाया वाढू शकतात.

(बॉक्स)

जप्त केलेला माल ठेवायचा कुठे?

- जप्त केलेला तंबाखू किंवा अन्य कोणताही माल ठेवण्यासाठी या विभागाकडे जागाच नाही. दीड वर्षापूर्वी परिवहन विभागाचे कार्यालय त्यांच्या नवीन इमारतीत स्थानांतरित झाल्यानंतर त्यांच्या रिकाम्या झालेल्या चार खोल्यांच्या कार्यालयाला अन्न प्रशासन विभागाने जिल्हा प्रशासनाकडून मागून आपले गुदाम बनविले.

- प्रकरण न्यायप्रविष्ठ असेपर्यंत जप्त माल सुरक्षित ठेवावा लागतो. प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार तो माल नष्ट केला जातो. विशेष म्हणजे राज्यात प्रयोगशाळाही मर्यादित असल्यामुळे जप्त मालाचा रिपोर्ट येण्यासाठी २ ते ३ महिने लागतात.

जिल्ह्यात खर्ऱ्यासाठी लागणाऱ्या सुगंधित तंबाखूला आळा घालणे हे उद्दिष्ट.