शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी कार्यालयाच्या खोल्या झाल्या गुदाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:38 IST

जिल्हाभरातील नागरिक ग्रहण करत असलेल्या सार्वजनिक ठिकाणच्या अन्नापासून तर ते घेत असलेल्या औषधींच्या तपासणीपर्यंतची महत्त्वाची जबाबदारी या विभागाला सांभाळावी ...

जिल्हाभरातील नागरिक ग्रहण करत असलेल्या सार्वजनिक ठिकाणच्या अन्नापासून तर ते घेत असलेल्या औषधींच्या तपासणीपर्यंतची महत्त्वाची जबाबदारी या विभागाला सांभाळावी लागते. मात्र अनेक वर्षांपासून या विभागात अधिकाऱ्यांची कमतरता आहे. औषध प्रशासन विभाग तर पूर्णपणे वाऱ्यावरच सोडला आहे. त्यात एकही पूर्णवेळ अधिकारी नाही. अन्न विभागात नागपूर येथील सहायक आयुक्तांकडे येथील प्रभार आहे. एका अन्न निरीक्षकाला जिल्हाभरातील कामकाज सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तरीही ते जिल्हाभरात फिरून तपासण्या करत मिळेल तिथे कारवाई करत असतात. मात्र विभागाने त्यांना पुरेशा सोयी आणि मनुष्यबळ दिल्यास त्यांच्या तपासण्यांचा वेग वाढू शकतो.

एप्रिल २०२० ते मार्च २०२१ यादरम्यान जप्त सुगंधित तंबाखू

महिना किंमत

एप्रिल १,२४,७८५

जून ७९,२३०

जुलै ५५,४०८

ऑक्टोबर १,६२,९५०

डिसेंबर २,०५,३४५

जानेवारी २७,१८०

फेब्रुवारी ७९,३८०

मार्च १,०३,५४५

(बॉक्स)

वर्षभरात ३८.८३ लाखांचा तंबाखू साठा जप्त

- जिल्ह्यात खर्रा खाणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. साध्या तंबाखूसोबत सुगंधित तंबाखू टाकून बनविलेल्या खर्ऱ्याला सर्वाधिक मागणी आहे. सुगंधित तंबाखूचे डबे नागपूर, तेलंगणा, छत्तीसगडमार्गे जिल्ह्यात आणणे सहज शक्य असल्यामुळे त्यांना रोखणे जवळजवळ अशक्य असते. त्यामुळे त्याचा प्रत्यक्ष वापर करणाऱ्यांवर कारवाई करणे हाच महत्त्वाचा सोपा मार्ग असतो.

- वर्षभरातील कारवायांवर नजर टाकल्यास अन्न निरीक्षक एस.पी. तोरेम यांनी २३ कारवायांमध्ये ३८ लाख ८३ हजारांचा सुगंधित तंबाखू साठा जप्त केला आहे. यातील काही कारवाया साठेबाजी करणाऱ्यांवर तर काही विक्रेत्यांवरील आहेत. मनुष्यबळ मिळाल्यास सदर कारवाया वाढू शकतात.

(बॉक्स)

जप्त केलेला माल ठेवायचा कुठे?

- जप्त केलेला तंबाखू किंवा अन्य कोणताही माल ठेवण्यासाठी या विभागाकडे जागाच नाही. दीड वर्षापूर्वी परिवहन विभागाचे कार्यालय त्यांच्या नवीन इमारतीत स्थानांतरित झाल्यानंतर त्यांच्या रिकाम्या झालेल्या चार खोल्यांच्या कार्यालयाला अन्न प्रशासन विभागाने जिल्हा प्रशासनाकडून मागून आपले गुदाम बनविले.

- प्रकरण न्यायप्रविष्ठ असेपर्यंत जप्त माल सुरक्षित ठेवावा लागतो. प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार तो माल नष्ट केला जातो. विशेष म्हणजे राज्यात प्रयोगशाळाही मर्यादित असल्यामुळे जप्त मालाचा रिपोर्ट येण्यासाठी २ ते ३ महिने लागतात.

जिल्ह्यात खर्ऱ्यासाठी लागणाऱ्या सुगंधित तंबाखूला आळा घालणे हे उद्दिष्ट.