शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पर्लकोटा नदीवर उंच पुलाची प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 00:11 IST

भामरागड तालुका मुख्यालयाला लागून असलेल्या पर्लकोटा नदीवर उंच पुलाचे बांधकाम करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने दरवर्षी पावसाळ्यात भामरागडचा संपर्क तुटून नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.

ठळक मुद्देमागणीकडे दुर्लक्ष : पावसाळ्यात वारंवार तुटतो भामरागडचा संपर्क

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : भामरागड तालुका मुख्यालयाला लागून असलेल्या पर्लकोटा नदीवर उंच पुलाचे बांधकाम करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने दरवर्षी पावसाळ्यात भामरागडचा संपर्क तुटून नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.भामरागड तालुका मुख्यालयालयाला लागूनच पर्लकोटा नदी आहे. या नदीलगतच त्रिवेणी संगम आहे. त्यामुळे पावसाळ्यात तिन्ही नद्या भरल्यानंतर पर्लकोटा नदीला मोठ्या प्रमाणावर दाब येतो. या नद्यातील पूर ओसरल्याशिवाय पर्लकोटा नदीतील पाण्याची पातळी कमी होत नाही. परिणामी अनेकदा दोन ते तीन दिवस वाहतूक ठप्प होते. कमी उंचीचा पूल असल्याने ही समस्या दरवर्षी निर्माण होते. या नदीवर उंच पुलाचे बांधकाम करावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. अनेक विभागाचे मंत्री भामरागड येथे दौरे करून पुलाची उंची वाढविण्याचे आश्वासन देतात. परंतु मागणीकडे दुर्लक्ष होते. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या नदीवर उंच पुलाचे बांधकाम करण्याचे आश्वासन पाच ते सहा वर्षांपूर्वी दिले होते. परंतु आश्वासन पूर्ण झाले नाही.पावसाळ्यात भामरागड तालुक्यातील १५० गावांचा संपर्क तुटतो. परिणामी अनेक गावातील स्वस्त धान्य दुकानांना दोन ते तीन महिन्यांचे धान्य पावसाळ्यात सुरू होण्यापूर्वीच पुरविले जाते. पावसाळ्यात अनेक गावांमध्ये पक्क्या रस्त्याअभावी जात येत नाही. त्यामुळे नागरिक जून, जुलै महिन्यातच दैनंदिन गरजेच्या वस्तूंची सोय करून ठेवतात. पावसाळ्यात रुग्णांना जिल्हास्तरावर उपचारार्थ भरती करताना अनेक अडचणी येतात. त्यामुळे पर्लकोटा नदीवर उंच पुलाचे बांधकाम करावे, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :riverनदी