शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! तुफान गर्दी, प्रचंड उत्साह, वरळी डोममध्ये काय घडतंय?
2
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
3
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
4
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
5
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
6
"मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
7
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
8
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
9
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला भक्तिरंगात न्हाऊन निघा; प्रियजनांना पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश!
10
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
11
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
12
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
13
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
14
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
15
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
16
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
17
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
18
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
19
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
20
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!

तेंदूपत्ता बोनसची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 01:08 IST

तालुक्यातील जवेली परिसराच्या पाच गावातील नागरिकांनी २०१५ च्या उन्हाळ्यात तेंदूपत्ता संकलन केले. या मजुरांना मजुरी मिळाली. परंतु तीन वर्ष उलटूनही अद्यापही तेंदू बोनस मिळाला नाही. तेंदू बोनस का मिळाला नाही, याबाबत मजुरांनी शंका उपस्थित केली आहे.

ठळक मुद्देतीन वर्ष उलटले : एटापल्ली तालुक्यातील मजूर वंचित

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : तालुक्यातील जवेली परिसराच्या पाच गावातील नागरिकांनी २०१५ च्या उन्हाळ्यात तेंदूपत्ता संकलन केले. या मजुरांना मजुरी मिळाली. परंतु तीन वर्ष उलटूनही अद्यापही तेंदू बोनस मिळाला नाही. तेंदू बोनस का मिळाला नाही, याबाबत मजुरांनी शंका उपस्थित केली आहे. यासंदर्भात मजुरांनी तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, एटापल्ली तालुक्यातील जवेली खुर्द, हालेओला, रेकानमेटा, खरगी, मारकागुडम आदी पाच गावातील नागरिकांनी २०१५ च्या उन्हाळ्यात तेंदूपत्ता संकलन केले. या हंगामातील मजुरी मिळाली. परंतु बोनस रक्कम मिळाली नाही. याविषयी मागील तीन वर्षांपासून गावातील मजुरांनी प्रशासनाकडे वेळोवेळी विनंती अर्ज करून थकीत बोनस मिळवून देण्याची मागणी केली. परंतु काहीच उपयोग झाला नाही. मजुरांनी तेंदू हंगामात हालअपेष्टा सहन करून तेंदू संकलन केले. परंतु त्यांच्या श्रमाचा पैसा गेला कुठे, असा सवाल मजुरांनी उपस्थित केला आहे. तेंदूपत्ता बोनसची रक्कम अप्राप्त असल्याने आर्थिक व मानसिक पिळवणूक केली जात आहे, असा आरोपही मजुरांनी केला आहे. त्यामुळे लवकर बोनसची रक्कम अदा करावी, अशी मागणी मजुरांच्या वतीने करण्यात आली. जि.प. सदस्य संजय चरडुके यांच्या नेतृत्वात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना बंटी जुनघरे, उलगे तिम्मा, चंद्रा तुमरेटी, झुरू दुर्वा, गोसू कोरसा, संतोष नरोटे, अशोक तिम्मा, सोनू हेडो, प्रभू गोटा, शिवाजी दुर्वा, संजय कोरसा उपस्थित होते.तीव्र आंदोलन करणार२०१५ च्या उन्हाळ्यात तेंदूपत्ता संकलन केल्यानंतर त्याचवर्षी दिवाळीपर्यंत तेंदू बोनस मिळणे मजुरांना अपेक्षित होते. परंतु असे झाले नाही. बोनस मिळण्यासाठी अनेकदा प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. परंतु याकडे दुर्लक्ष झाले. मागील तीन वर्षापासून प्रलंबित असलेले बोनस न दिल्यास आंदोलन छेडू, असा इशारा पाच गावातील मजुरांनी तालुका व जिल्हा प्रशासनाला दिला आहे.