शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
3
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
4
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
5
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
6
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
7
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
8
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
9
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
10
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
11
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
13
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
14
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
15
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
16
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
17
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
18
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
19
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
20
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  

१० हजार कर्जासाठी प्रतीक्षा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2017 00:48 IST

बहुप्रतीक्षित कर्जमाफीसंदर्भातील आणि १० हजार तातडीचे कर्जवाटप करण्यासंदर्भातील शासन निर्णय बुधवारी ...

खऱ्या शेतकऱ्यांनाच मिळणार : नेतेमंडळी, कर्मचारी, आयकर भरणारे शेतकरी अपात्रलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : बहुप्रतीक्षित कर्जमाफीसंदर्भातील आणि १० हजार तातडीचे कर्जवाटप करण्यासंदर्भातील शासन निर्णय बुधवारी (दि.१४) जारी करण्यात आला आहे. मात्र त्यातील काही अटी बँकेच्या अधिकाऱ्यांना संभ्रमात टाकणाऱ्या असल्यामुळे तातडीचे १० हजार कर्ज मिळण्यासाठीही शेतकऱ्यांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.प्रत्यक्षात कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना मिळण्यासाठी काही महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे खरीप हंगामासाठी बी-बियाणे खरेदी व इतर खर्चासाठी शेतकऱ्यांना ॅ१० हजार रुपयांची मदत देऊन ती पुढील कर्जात समाविष्ठ करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे ही रक्कम शासनाकडून मिळणारी स्वतंत्र मदत नसून शेतकऱ्यांना पीक कर्जरूपानेच ती रक्कम दिली जाणार आहे. शासनाच्या हमीवर नव्याने १० हजार मर्यादेपर्यंतचे पीककर्ज मिळण्यासाठी जोडधंदा म्हणून शेती करणाऱ्या अनेकांना अपात्र ठरविण्यात आले आहे. त्यात आजी-माजी मंत्री, आजी-माजी खासदार व आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषदेचे सदस्य, सर्व शासकीय-निमशासकीय कर्मचारी, अनुदानित शाळा-कॉलेजचे शिक्षक-कर्मचारी, निवृत्तीवेतन घेणाऱ्या व्यक्ती, अर्थसहाय्यित संस्थांचे कर्मचारी, डॉक्टर, वकील, अभियंता, नोंदणीकृत कंत्राटदार, कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर चार चाकी वाहन असलेले शेतकरी, दुकानदार आणि आयकर भरणारे शेतकरी यासाठी अपात्र ठरणार आहेत. त्यामुळे प्रस्तावित कर्जमाफीतूनही या सर्वांना वगळले जाण्याची दाट शक्यता आहे.‘त्या’ शेतकऱ्यांना मिळेल १० हजारापेक्षाही कमी३० जून २०१६ रोजी थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना हे १० हजार रुपये मर्यादेपर्यंतचे कर्ज शासनाच्या हमीवर बँकांनी मंजूर करायचे आहे. ती रक्कम शासनाकडून प्राप्त होणाऱ्या कर्जमाफीच्या रकमेतून समायोजित केली जाणार आहे. त्यामुळे जर शेतकऱ्याकडे जून २०१६ रोजी १० हजार रुपयांपेक्षा कमी थकबाकी असेल तर शासनाच्या हमीनुसार तेवढीच (कमी) रक्कम पुन्हा कर्जरूपाने मिळण्याची शक्यता बँकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.यामुळे लागू शकतो विलंबशासनाच्या जीआरमध्ये एकीकडे १० हजार पर्यंतचे कर्जवाटप तातडीने करण्याचे निर्देश दिले, तर दुसरीकडे व्यापारी बँकांनी या कर्जाचे प्रस्ताव राज्यस्तरीय बँकर्स समितीमार्फत आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी शेतकऱ्यांची यादी व कर्जाचे प्रस्ताव राज्य सहकारी बँकेमार्फत शासनाला सादर करण्याचे निर्देश दिले आहे. या सर्व प्रक्रियेसाठी काही वेळ लागून कर्जवाटप रखडण्याची शक्यता निर्माण होणार आहे.