शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
3
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
4
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
5
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
6
सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा
7
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
8
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
9
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
10
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
11
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
12
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
13
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
14
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
15
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
16
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
17
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
18
लेख : मेट्रोच्या डब्यात वाढदिवस, लग्ने साजरी होतात, तेव्हा...
19
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
20
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले

वैनगंगेचा प्रवाह तोडतोय दम, तीव्र जलसंकटाची चाहूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 22:59 IST

वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी प्रचंड प्रमाणात कमी झाली आहे. याचा फटका गडचिरोली शहराला बसण्यास सुरूवात झाली असून भविष्यात जलसंकट तीव्र होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देजॅकवेलचा दोनपैकी एक पाईप पाण्याच्या बाहेर : पाण्याचा जपून वापर करण्याचे नगरपरिषदेतर्फे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी प्रचंड प्रमाणात कमी झाली आहे. याचा फटका गडचिरोली शहराला बसण्यास सुरूवात झाली असून भविष्यात जलसंकट तीव्र होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.गडचिरोली शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी वैनगंगा नदी पात्रात इनटेकवेल खोदण्यात आली आहे. या विहिरीला पाणी येण्यासाठी दोन पाईप बसविण्यात आले आहेत. त्यापैकी एक पाईप पाण्यात पडून आहे. तर दुसरा पाईप पूर्णपणे पाण्याच्या बाहेर पडला आहे. त्यामुळे पंपाला पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होत नसल्याने मागील दहा दिवसांपासून गडचिरोली शहराला अपुरा पाणी पुरवठा होत आहे. एक महिन्यापूर्वी जेसीबीच्या सहाय्याने नगर परिषदेने इनटेकवेलजवळ बंधारा बांधला. २०० फूट अंतरापर्यंत रेती उपसून नदीची पूर्ण धार विहिरीच्या बाजुला वळविली आहे. एक महिन्यापूर्वी दुसरा पाईप अर्धा पाण्यात बुडून होता. मात्र मागील १५ दिवसांपासून पाणी पातळी प्रचंड खाली गेली आहे. पाईप पूर्णपणे वर आला आहे. एप्रिल महिन्याच्या सुरूवातीला ही स्थिती आहे. जून महिन्यापर्यंत जवळपास अडीच महिने पुन्हा उन्हाळा शेकणार आहे. या कालावधीत जलसंकट तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जलशुध्दीकरण केंद्राला पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा होत नसल्याने या ठिकाणचे पंप जवळपास एक तास बंद ठेवावे लागत आहेत. त्यामुळे पाण्याच्या टाक्या पूर्ण भरत नाही. त्यातच उन्हाळा लागल्याने पाण्याचा वापर वाढला आहे. पाण्याची मागणी व पुरवठा यामध्ये असमतोल निर्माण झाला असल्याने पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.दर दिवशी ६४ लाख लिटर पाणी पुरवठागडचिरोली शहराला दर दिवशी ६४ लाख लिटर पाणी पुरवठा केला जातो. शहराची लोकसंख्या जवळपास ५० हजार आहे. म्हणजेच प्रत्येक नागरिकाला दिवसाला १२८ लिटर पाणी पुरवठा होतो. शासनाच्या नियमानुसार प्रती व्यक्ती १३५ लिटर पाणी लागते. यावरून नगर परिषद प्रत्येक व्यक्तीला आवश्यक तेवढा पाणी पुरवठा करते. भावी जलसंकट लक्षात घेऊन नागरिकांनीही पाण्याचा जपून वापर करणे आवश्यक आहे.गोसेखुर्दमध्ये केवळ १० टक्के उपयुक्त जलसाठावैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढण्यासाठी गोसेखुर्द धरणावर आशा अवलंबून आहेत. मात्र या धरणातही केवळ १०.०३ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. एवढे पाणी पुन्हा अडीच महिने वापरावे लागणार आहे. त्यामुळे गोसेखुर्द प्रशासनाकडे जरी पाणी सोडण्याची मागणी केली तरी नियमाप्रमाणेच पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे.शहरातील सर्व वार्डांना पाणी पुरवठा व्हावा, यासाठी नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने नियोजन केले आहे. सद्य:स्थितीत वृध्दाश्रमाजवळील टाकीमधून ज्या वार्डांना पाणी पुरवठा होतो, त्या वार्डांना एकच वेळ पाणी पुरवठा केला जात आहे. सकाळी विवेकानंदनगर, कन्नमवार नगर, कॅम्पएरिया, शिवाजी नगर, रामनगर, स्नेहनगर, लांझेडा या वार्डांना पाणी पुरवठा होत आहे. तर गोकुलनगर, गणेश नगर, चनकाई नगर व पोस्ट कार्यालयाच्या मागील बाजूस सायंकाळी एकदाच पाणी पुरवठा सुरू आहे. नदीची पाणी पातळी कमी झाल्यास इतरही वार्डांना एकच वेळच्या पाण्यावर भागवावे लागणार आहे.