शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
3
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
4
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
5
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
6
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
7
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
8
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
9
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
10
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
11
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
12
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
13
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
14
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
15
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
16
Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
17
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
18
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
19
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
20
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...

वैनगंगेचा प्रवाह तोडतोय दम, तीव्र जलसंकटाची चाहूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 22:59 IST

वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी प्रचंड प्रमाणात कमी झाली आहे. याचा फटका गडचिरोली शहराला बसण्यास सुरूवात झाली असून भविष्यात जलसंकट तीव्र होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देजॅकवेलचा दोनपैकी एक पाईप पाण्याच्या बाहेर : पाण्याचा जपून वापर करण्याचे नगरपरिषदेतर्फे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी प्रचंड प्रमाणात कमी झाली आहे. याचा फटका गडचिरोली शहराला बसण्यास सुरूवात झाली असून भविष्यात जलसंकट तीव्र होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.गडचिरोली शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी वैनगंगा नदी पात्रात इनटेकवेल खोदण्यात आली आहे. या विहिरीला पाणी येण्यासाठी दोन पाईप बसविण्यात आले आहेत. त्यापैकी एक पाईप पाण्यात पडून आहे. तर दुसरा पाईप पूर्णपणे पाण्याच्या बाहेर पडला आहे. त्यामुळे पंपाला पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होत नसल्याने मागील दहा दिवसांपासून गडचिरोली शहराला अपुरा पाणी पुरवठा होत आहे. एक महिन्यापूर्वी जेसीबीच्या सहाय्याने नगर परिषदेने इनटेकवेलजवळ बंधारा बांधला. २०० फूट अंतरापर्यंत रेती उपसून नदीची पूर्ण धार विहिरीच्या बाजुला वळविली आहे. एक महिन्यापूर्वी दुसरा पाईप अर्धा पाण्यात बुडून होता. मात्र मागील १५ दिवसांपासून पाणी पातळी प्रचंड खाली गेली आहे. पाईप पूर्णपणे वर आला आहे. एप्रिल महिन्याच्या सुरूवातीला ही स्थिती आहे. जून महिन्यापर्यंत जवळपास अडीच महिने पुन्हा उन्हाळा शेकणार आहे. या कालावधीत जलसंकट तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जलशुध्दीकरण केंद्राला पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा होत नसल्याने या ठिकाणचे पंप जवळपास एक तास बंद ठेवावे लागत आहेत. त्यामुळे पाण्याच्या टाक्या पूर्ण भरत नाही. त्यातच उन्हाळा लागल्याने पाण्याचा वापर वाढला आहे. पाण्याची मागणी व पुरवठा यामध्ये असमतोल निर्माण झाला असल्याने पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.दर दिवशी ६४ लाख लिटर पाणी पुरवठागडचिरोली शहराला दर दिवशी ६४ लाख लिटर पाणी पुरवठा केला जातो. शहराची लोकसंख्या जवळपास ५० हजार आहे. म्हणजेच प्रत्येक नागरिकाला दिवसाला १२८ लिटर पाणी पुरवठा होतो. शासनाच्या नियमानुसार प्रती व्यक्ती १३५ लिटर पाणी लागते. यावरून नगर परिषद प्रत्येक व्यक्तीला आवश्यक तेवढा पाणी पुरवठा करते. भावी जलसंकट लक्षात घेऊन नागरिकांनीही पाण्याचा जपून वापर करणे आवश्यक आहे.गोसेखुर्दमध्ये केवळ १० टक्के उपयुक्त जलसाठावैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढण्यासाठी गोसेखुर्द धरणावर आशा अवलंबून आहेत. मात्र या धरणातही केवळ १०.०३ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. एवढे पाणी पुन्हा अडीच महिने वापरावे लागणार आहे. त्यामुळे गोसेखुर्द प्रशासनाकडे जरी पाणी सोडण्याची मागणी केली तरी नियमाप्रमाणेच पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे.शहरातील सर्व वार्डांना पाणी पुरवठा व्हावा, यासाठी नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने नियोजन केले आहे. सद्य:स्थितीत वृध्दाश्रमाजवळील टाकीमधून ज्या वार्डांना पाणी पुरवठा होतो, त्या वार्डांना एकच वेळ पाणी पुरवठा केला जात आहे. सकाळी विवेकानंदनगर, कन्नमवार नगर, कॅम्पएरिया, शिवाजी नगर, रामनगर, स्नेहनगर, लांझेडा या वार्डांना पाणी पुरवठा होत आहे. तर गोकुलनगर, गणेश नगर, चनकाई नगर व पोस्ट कार्यालयाच्या मागील बाजूस सायंकाळी एकदाच पाणी पुरवठा सुरू आहे. नदीची पाणी पातळी कमी झाल्यास इतरही वार्डांना एकच वेळच्या पाण्यावर भागवावे लागणार आहे.