शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
4
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
5
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
6
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
7
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
8
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
9
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
10
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
11
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
12
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
13
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
14
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
15
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
16
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
17
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
18
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
19
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
20
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत

मतदारांनी नक्षलवाद्यांना जुमानले नाही

By admin | Updated: October 18, 2014 01:29 IST

तालुक्यातील ६० मतदान केंद्रावर १५ आॅक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पार पडली.

एटापल्ली : तालुक्यातील ६० मतदान केंद्रावर १५ आॅक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पार पडली. एटापल्ली तालुक्यात पुरूष २३ हजार १३६ व महिला २१ हजार ६९५ असे एकूण ४४ हजार ८३१ मतदारांची संख्या आहे. यापैकी १४ हजार ५९४ पुरूष व ११ हजार १२८ महिला असे एकूण २५ हजार ७२२ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजाविला. एटापल्ली तालुक्यातील नागरिकांनी नक्षलवाद्यांच्या आवाहनाला न जुमानता उत्स्फूर्त मतदान केल्याने या तालुक्यात ५७.०४ टक्के मतदान झाले आहे. भारतीय निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाल्यानंतर सुरूवातीपासूनच नक्षलवाद्यांनी तालुक्यातील दुर्गम भागातील गावात बॅनर बांधून तसेच पत्रक टाकून विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. याशिवाय नक्षल्यांनी निवडणुकीच्या काळात हिंसक कारवाया सुरूच ठेवल्या होत्या. नक्षलवाद्यांच्या विरोधाला तसेच भीतीला न जुमानता एटापल्ली तालुक्यातीन नागरिकांनी या विधानसभा निवडणुकीत उत्स्फूर्तपणे मतदान केले. एप्रिल महिन्यात झालेले लोकसभा निवडणुकीत एटापल्ली तालुक्यातील मतदारांनी मोठ्या उत्साहात मतदान केले होते. त्यामुळे या तालुक्यातील मतदानाची टक्केवारी ६२ होती. पावसामुळे बांडीया नदीला भरपूर पाणी असल्यामुळे नदीपलिकडे असलेले दोलंदा, भापळा, सोहगाव आदी गावातील तीन केंद्र जारावंडी येथे हलविण्यात आले होते. तसेच बांडीया नदीपलीकडील कचरेल, बुर्गी, कुदरी या गावातील तीन मतदान केंद्र हालेवारा येथे हलविण्यात आले होते. या तीनही गावातील नागरिकांनी नदी पार करून जारावंडी येथील मतदान केंद्रावर येऊन मतदान केले. दोलंदा मतदान केंद्रावर ३८.६३ टक्के, भापडा ५३.२४ टक्के व सोहगाव येथे ३९.१८ टक्के मतदान झाले आहे. पोलीस विभागाच्यावतीने मतदारांना मतदान केंद्रावर पोहोचविण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. (तालुका प्रतिनिधी)