सिरोंचा पोलिसांचे केले कौतुक : बचाव कार्यात दाखविली तत्परतासिरोंचा : महाराष्ट्र तेलंगाना सीमांना जोडणाऱ्या गोदावरी नदीवरील निर्माणाधिन पुलाच्या कामाजवळ नाव बुडून सहा नागरिक बेपत्ता झाले. या घटनास्थळाला सोमवारी अहेरीचे माजी आमदार दीपक आत्राम यांनी भेट देऊन पोलीस पथकामार्फत सुरू असलेल्या बचाव कामाची पाहणी केली. सिरोंचा पोलिसांनी तत्परतेने बुडालेल्यांना वाचविण्यासाठी मदतकार्य सुरू केले. याबद्दल त्यांनी सिरोंचाचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी पवार, पोलीस निरीक्षक लुकडे, पोलीस उपनिरीक्षक कदम यांचे कौतुक केले. रविवारी घटनेनंतर लगेच बचावकार्य सुरू झाल्यामुळे मोठी जीवितहानी टळली, असेही यावेळी दीपक आत्राम म्हणाले.यावेळी दीपक आत्राम यांच्या समावेत आविसचे सल्लागार मंदाशंकर आविसचे तालुका अध्यक्ष बानय्या जनगम आविसचे सल्लागार रवी सल्लम, रवी बोगोनी, जानकी शीनू, ओम ताटीकोंडावार, उपसरपंच कुमरी सडवल्ली व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पोलीस प्रशासन बचावकार्य युध्दपातळीवर सोमवारी दिवसभर सुरू होते. मात्र त्यांना बेपत्ता लोक शोधण्यात यश आले नाही. (शहर प्रतिनिधी)
माजी आमदाराची घटनास्थळाला भेट
By admin | Updated: February 24, 2016 01:17 IST