शहरं
Join us  
Trending Stories
1
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
2
२० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा...
3
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
4
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली
5
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
6
'माझ्या बायकोला तू पळवून लावलंस!'; रागाच्या भरात भावाने बहिणीची केली निर्घृण हत्या
7
"लग्न नाही, फॅमिली नाही विचार करा...", फुकटचा सल्ला देणाऱ्या चाहत्याला जुईचं सडेतोड उत्तर, म्हणाली- "अशा माणसांची..."
8
नवरात्रीतील विनायक चतुर्थी २०२५: 'या' ८ राशींसाठी जुळून आले ३ महाशुभ योग; मिळेल विशेष धनलाभ!
9
मुलाला तुरुंगवास, धक्का बसलेल्या वडिलांनी संपवलं जीवन, अंत्यसंस्कारावेळी घडलं असं काही, ७ पोलीस निलंबित
10
पाकिस्तान युद्धात सैनिक लढला होता, नंतर पेन्शनशिवाय काढून टाकले; पत्नीला ५७ वर्षांनंतर मिळाला न्याय
11
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
12
Ultraviolette ने कमाल केली, X47 Crossover मोटरसायकल भारतात आली: 2.74 लाख रुपयांपासून किंमत सुरु!
13
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
14
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
15
एकाच वेळी पाच-सहा मराठी सिनेमे रिलीज, कसं व्हायचं? प्रसिद्ध गायकाने मांडलं मत, इंडस्ट्रीबद्दल म्हणाला...
16
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
17
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
18
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
19
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
20
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू

दामरंचा परिसरातील गावे अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 00:57 IST

दामरंचा परिसरात आसा, नैनगुडम, मोदुमडगू, वेलगूर, भंगारामपेठा, कोयागुडम, चिटवेली, चिंतारेव, रूमलकसा, मांड्रा, कोळसेपल्ली, कोरेपल्ली, कवठाराम, कपेवंचा, मडगू, तोंडेर आदी गावांचा समावेश आहे. या परिसरात भामरागड तालुक्यातील हेमलकसापासून वीज पुरवठा केला जातो.

ठळक मुद्देमहिनाभरापासून समस्या । परिसरातील वीज ग्राहकांमध्ये महावितरणविषयी रोष

लोकमत न्यूज नेटवर्ककमलापूर : अहेरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये अद्यापही विद्युत पोहोचली नाही. काही ठिकाणी केवळ वीज खांब व तारा लावण्यात आल्या आहेत. ही स्थिती असतानाच दामरंचा परिसरातील अनेक गावे महिनाभरापासून अंधारात आहेत. तरी सुद्धा या भागातील वीज पुरवठा सुरळीत करण्याकडे महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र रोष आहे.दामरंचा परिसरात आसा, नैनगुडम, मोदुमडगू, वेलगूर, भंगारामपेठा, कोयागुडम, चिटवेली, चिंतारेव, रूमलकसा, मांड्रा, कोळसेपल्ली, कोरेपल्ली, कवठाराम, कपेवंचा, मडगू, तोंडेर आदी गावांचा समावेश आहे. या परिसरात भामरागड तालुक्यातील हेमलकसापासून वीज पुरवठा केला जातो. हेमलकसा-ताडगाव-मन्नेराजाराम या वीज लाईनमार्फत वीज पुरवठा करण्यात आला आहे. परंतु सदर परिसर जंगल व्याप्त अतिदुर्गम आहे. पावसाळा व हिवाळ्यात परिसरात नेहमीच विजेचा लपंडाव असतो. विशेष म्हणजे या परिसरात एकही लाईनमन मुख्यालयी राहत नाही. रात्रीच्या सुमारास वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर दुसºया दिवशी वीज पुरवठा सुरळीत होईल, याचीही शाश्वती नसते. परिणामी नागरिकांना अनेक रात्री अंधारात काढाव्या लागतात.सध्या पावसाळ्याचे दिवस असून सुद्धा तब्बल एक महिन्यापासून परिसरातील वीज पुरवठा खंडित आहे. परिणामी नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. रात्रीच्या सुमारास रस्त्यावरून सरपटणाºया विषारी प्राण्यांचा वावर असतो. अशा स्थितीत गावातील नागरिक अंधारामुळे रस्त्याने आवागमन करू शकत नाही. दुर्गम भागात वीज समस्येचा सामना नेहमीच करावा लागतो. तरी सुद्धा ही समस्या सोडविण्याकडे महावितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करतात. दामरंचा परिसरात हेमलकसा-मन्नेराजाराम ही विद्युत लाईन आहे. सदर परिसर जंगलव्याप्त व अतिदुर्गम असल्याने काही बिघाड आल्यास वीज वितरण कंपनीचे कर्मचारी वेळीच पोहोचत नाही. त्यांनाही भामरागड गाठण्यासाठी अनेक अडचणी येतात. परिणामी नागरिकांना वीज समस्येचा सामना करावा लागतो.केंद्र शासनाच्या वतीने ‘प्रधानमंत्री सहज बिजली’ यासारख्या योजनांचा अंमल केला जात आहे. परंतु दामरंचा परिसरात ही योजना व उपक्रम कुचकामी ठरत असल्याचे दिसून येत आहे. या परिसरातील लोकप्रतिनिधीही येथील वीज समस्येबाबत उदासीन आहेत. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून नागरिकांना या समस्येचा सामना करावा लागत आहे.सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.३३ के व्ही उपकेंद्राची मागणी धूळ खातकमलापूर येथे ३३ के व्ही उपकेंद्र निर्माण करण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. या उपकेंद्रातून दामरंचा परिसरात वीज पुरवठा केल्यास या परिसरातील वीज समस्या सुटू शकते. याबाबत परिसरातील नागरिकांच्या वतीने अनेकदा लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनातील अधिकाºयांना निवेदने देण्यात आली. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष झाले. कमलापूर येथे ३३ के व्ही उपकेंद्र निर्माण झाल्यास परिसरातील वीज समस्या सुटण्यास मदत होऊ शकते.

टॅग्स :electricityवीजmahavitaranमहावितरण