शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

दामरंचा परिसरातील गावे अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 00:57 IST

दामरंचा परिसरात आसा, नैनगुडम, मोदुमडगू, वेलगूर, भंगारामपेठा, कोयागुडम, चिटवेली, चिंतारेव, रूमलकसा, मांड्रा, कोळसेपल्ली, कोरेपल्ली, कवठाराम, कपेवंचा, मडगू, तोंडेर आदी गावांचा समावेश आहे. या परिसरात भामरागड तालुक्यातील हेमलकसापासून वीज पुरवठा केला जातो.

ठळक मुद्देमहिनाभरापासून समस्या । परिसरातील वीज ग्राहकांमध्ये महावितरणविषयी रोष

लोकमत न्यूज नेटवर्ककमलापूर : अहेरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये अद्यापही विद्युत पोहोचली नाही. काही ठिकाणी केवळ वीज खांब व तारा लावण्यात आल्या आहेत. ही स्थिती असतानाच दामरंचा परिसरातील अनेक गावे महिनाभरापासून अंधारात आहेत. तरी सुद्धा या भागातील वीज पुरवठा सुरळीत करण्याकडे महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र रोष आहे.दामरंचा परिसरात आसा, नैनगुडम, मोदुमडगू, वेलगूर, भंगारामपेठा, कोयागुडम, चिटवेली, चिंतारेव, रूमलकसा, मांड्रा, कोळसेपल्ली, कोरेपल्ली, कवठाराम, कपेवंचा, मडगू, तोंडेर आदी गावांचा समावेश आहे. या परिसरात भामरागड तालुक्यातील हेमलकसापासून वीज पुरवठा केला जातो. हेमलकसा-ताडगाव-मन्नेराजाराम या वीज लाईनमार्फत वीज पुरवठा करण्यात आला आहे. परंतु सदर परिसर जंगल व्याप्त अतिदुर्गम आहे. पावसाळा व हिवाळ्यात परिसरात नेहमीच विजेचा लपंडाव असतो. विशेष म्हणजे या परिसरात एकही लाईनमन मुख्यालयी राहत नाही. रात्रीच्या सुमारास वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर दुसºया दिवशी वीज पुरवठा सुरळीत होईल, याचीही शाश्वती नसते. परिणामी नागरिकांना अनेक रात्री अंधारात काढाव्या लागतात.सध्या पावसाळ्याचे दिवस असून सुद्धा तब्बल एक महिन्यापासून परिसरातील वीज पुरवठा खंडित आहे. परिणामी नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. रात्रीच्या सुमारास रस्त्यावरून सरपटणाºया विषारी प्राण्यांचा वावर असतो. अशा स्थितीत गावातील नागरिक अंधारामुळे रस्त्याने आवागमन करू शकत नाही. दुर्गम भागात वीज समस्येचा सामना नेहमीच करावा लागतो. तरी सुद्धा ही समस्या सोडविण्याकडे महावितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करतात. दामरंचा परिसरात हेमलकसा-मन्नेराजाराम ही विद्युत लाईन आहे. सदर परिसर जंगलव्याप्त व अतिदुर्गम असल्याने काही बिघाड आल्यास वीज वितरण कंपनीचे कर्मचारी वेळीच पोहोचत नाही. त्यांनाही भामरागड गाठण्यासाठी अनेक अडचणी येतात. परिणामी नागरिकांना वीज समस्येचा सामना करावा लागतो.केंद्र शासनाच्या वतीने ‘प्रधानमंत्री सहज बिजली’ यासारख्या योजनांचा अंमल केला जात आहे. परंतु दामरंचा परिसरात ही योजना व उपक्रम कुचकामी ठरत असल्याचे दिसून येत आहे. या परिसरातील लोकप्रतिनिधीही येथील वीज समस्येबाबत उदासीन आहेत. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून नागरिकांना या समस्येचा सामना करावा लागत आहे.सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.३३ के व्ही उपकेंद्राची मागणी धूळ खातकमलापूर येथे ३३ के व्ही उपकेंद्र निर्माण करण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. या उपकेंद्रातून दामरंचा परिसरात वीज पुरवठा केल्यास या परिसरातील वीज समस्या सुटू शकते. याबाबत परिसरातील नागरिकांच्या वतीने अनेकदा लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनातील अधिकाºयांना निवेदने देण्यात आली. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष झाले. कमलापूर येथे ३३ के व्ही उपकेंद्र निर्माण झाल्यास परिसरातील वीज समस्या सुटण्यास मदत होऊ शकते.

टॅग्स :electricityवीजmahavitaranमहावितरण