शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
2
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
3
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
4
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
5
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
6
IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी
7
कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली...
8
1 डिसेंबरपासून मोबाइल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार, 199 रुपयांचा पॅक किती रुपयांना होणार? मोठा दावा
9
हृदयद्रावक! बॉलिंगनंतर पाणी प्यायला, उलटी होताच बेशुद्ध होऊन खाली पडला, मैदानावरच मृत्यू
10
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
11
Lenskart IPO: लिस्टिंग गेन मिळेल का, केव्हा होणार शेअरचं अलॉटमेंट? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं
12
"या नाटकाचा अविभाज्य घटक असलेली तू...", प्रिया मराठेच्या आठवणीत पुष्कर श्रोत्रीची भावुक पोस्ट
13
भारत इलेक्ट्रॉनिक्स ते पॉलीकॅब... 'या' ५ स्टॉक्सवर ब्रोकरेज 'बुलिश'; आगामी काळात तगडा परतावा देणार?
14
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
15
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
16
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
17
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
18
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
19
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
20
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

८९ टक्के जंगलावर गावकऱ्यांचे स्वामित्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 06:00 IST

औद्योगिकरण, शेती, रस्ते, जलसिंचन प्रकल्प यासाठी मोठ्या प्रमाणात जंगलाची तोड झाली. त्यामुळे मागील ३० वर्षात झपाट्याने जंगल घटले. याचा पर्यावरणावर मोठा दुष्परिणाम झाला. त्यामुळे शिल्लक आहे ते जंगल वाचविण्याची गरज भासू लागली. ज्या आदिवासी नागरिकांनी जंगल वाचविले. त्यांना जंगलापासून फायदा काय, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला होता. त्यावर शासनाने पेसा कायदा केला.

ठळक मुद्देपेसा कायदा : गौण वनोपजावरील अधिकाराने ग्रामसभा मालामाल

दिगांबर जवादे।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात एकूण १२ लाख ८१ हजार ५३२ हेक्टर क्षेत्रावर जंगल आहे. त्यापैकी ११ लाख ३८ हजार ९३ हेक्टर क्षेत्रावर पेसा कायद्यांतर्गत गावकऱ्यांना सामित्व प्रदान करण्यात आले आहे. पेसाविरहित क्षेत्रात केवळ ११ टक्के, म्हणजेच १ लाख ४३ हजार ५१९ हेक्टर जंगल शिल्लक राहिले आहे. गौण वनोपजावरील या अधिकाराने ग्रामसभा मालामाल झाल्या असल्या तरी त्या निधीतून अनेक गावांचा पाहीजे तसा विकास झालेला नाही.औद्योगिकरण, शेती, रस्ते, जलसिंचन प्रकल्प यासाठी मोठ्या प्रमाणात जंगलाची तोड झाली. त्यामुळे मागील ३० वर्षात झपाट्याने जंगल घटले. याचा पर्यावरणावर मोठा दुष्परिणाम झाला. त्यामुळे शिल्लक आहे ते जंगल वाचविण्याची गरज भासू लागली. ज्या आदिवासी नागरिकांनी जंगल वाचविले. त्यांना जंगलापासून फायदा काय, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला होता. त्यावर शासनाने पेसा कायदा केला. या कायद्यांतर्गत आदिवासी बहुल गावाच्या परिसरातील जंगलातून गौण वनोपज गोळा करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात एकूण १२ लाख ८१ हजार ५३२ हेक्टर क्षेत्रावर जंगल व्यापले आहे. पेसा कायद्यांतर्गत सुमारे ८९ टक्के जंगलातील वनोपज गोळा करण्याचे अधिकार दिले आहेत.गडचिरोली जिल्ह्यातील जंगलात प्रामुख्याने मोहफूल, तेंदूपत्ता, बांबू हे वनोपज आढळून येतात. तेंदूपत्ता व बांबू हे व्यावसायिक मूल्य असलेले गौणवनोपज आहे. यापूर्वी तेंदूपत्ता व बांबूची विक्री वन विभागामार्फत केली जात होती. आता बहुतांश तेंदूपत्ता व बांबू पेसा अंतर्गतच्या जमिनीत असल्याने त्यावर आता ग्रामसभांना अधिकार प्राप्त झाले आहेत.वनोपज गोळा केल्यानंतरही गावांची स्थिती ‘जैसे थे’च?जंगल संरक्षणात स्थानिक नागरिकांची मदत मिळावी, यासाठी केंद्र शासनाने पेसा कायदा करून गाव परिसरातून जंगलातून वनोपज गोळा करण्याचे अधिकार ग्रामसभांना दिले आहेत. तेंदूपत्ता व बांबू हे मुख्य गौणवनोपज आहेत. यातील बांबूपासून दोन ते तीन वर्षानंतर उत्पन्न मिळते. तर तेंदूपत्त्याच्या माध्यमातून दरवर्षी दरवर्षी लाखो रुपयांचे उत्पन्न प्राप्त होते. सदर ग्रामसभांना प्राप्त झालेले उत्पन्न त्याच गावाच्या विकासावर खर्च करायचे आहेत. कोणत्या बाबीवर खर्च करायचे, याचे पूर्ण स्वातंत्र्य संबंधित ग्रामसभेला दिले आहेत. दरवर्षी लाखो रुपयांचा निधी मिळाल्यानंतर यातून गावाचे स्वरूप पालटता आले असते. गाव कोट्यधीश झाले असते. मात्र प्राप्त झालेल्या निधीच्या खर्चाचे ग्रामसभा योग्य नियोजन करीत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गावे आहे त्या स्थितीतच अजुनही दिसून येतात. वनोपजातून गोळा होणाºया निधीचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग