शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण नागरिक मोहफुलांच्या वेचणीत व्यस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 16:08 IST

कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे शहरी भागातील नागरिकांच्या जीवनावर परिणाम झाला आहे. मात्र भामरागडसारख्या अतिदुर्गम भागातील नागरिकांच्या जीवनावर याचा फारसा परिणाम पडला नाही. ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिक मोहफूल वेचणीच्या कामात व्यस्त आहेत.

ठळक मुद्देलॉकडाऊनचा परिणाम नाहीतेंदू हंगाम लांबणीवर पडल्याने मजुराचे आर्थिक बजेट कोलमडणार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे शहरी भागातील नागरिकांच्या जीवनावर परिणाम झाला आहे. मात्र भामरागडसारख्या अतिदुर्गम भागातील नागरिकांच्या जीवनावर याचा फारसा परिणाम पडला नाही. ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिक मोहफूल वेचणीच्या कामात व्यस्त आहेत.कोरोना व्हायरसचा संसर्ग गडचिरोली जिल्ह्यात होऊ नये, यासाठी प्रशासन खबरदारी घेत आहे. केंद्र व राज्य शासनाने सुद्धा लॉकडाऊनची मुदत वाढविली आहे. कोरोनाच्या संचारबंदीमुळे जिल्ह्यातील तेंदू संकलन हंगाम लांबणीवर पडला आहे. परिणामी यावर्षी मजुराचा रोजगार हिरावला आहे. कोरोनाच्या संचारबंदीमुळे मोहफूल वेचणीच्या कामावर कोणताही परिणाम झाला नाही. मात्र तेंदू घटकाच्या लिलावाची प्रक्रिया कोरोनामुळे रखडून पडल्याने प्रत्यक्ष संकलनाचे काम केव्हा सुरू होणार, असा प्रश्न भामरागड तालुक्याच्या आदिवासी नागरिकांसमोर निर्माण झाला आहे.भामरागड तालुक्यातील आदिवासी व बिगर आदिवासी नागरिक गावात उपलब्ध झालेल्या भाजीपाला व घरात शिल्लक असलेल्या अन्नधान्यावर उदरनिर्वाह करीत आहेत. या भागात आदिवासी समाजातर्फे पारंपरिक पंडूम पोलवा सण मोठ्या उत्साहात पार पाडला जातो. मात्र यावर्षी कोरोनाच्या संचारबंदीने पारंपरिक पंडूम पोलवा सण बऱ्याच गावात पुढे ढकलण्यात आला आहे. भामरागड तालुक्यातील मजुरांचे शेकडो कुटुंब तेंदूपत्ता संकलनाच्या कामातून वर्षभराच्या खचार्ची मिळकत प्राप्त करीत असतात. तेंदू संकलनाचे काम न मिळाल्यास या भागातील आदिवासी नागरिकांचे वर्षभराचे आर्थिक नियोजन कोलमडणार आहे.गौण वनोपज संकलनातून अनेकांना रोजगारभामरागड तालुक्यासह अहेरी उपविभागात जंगलाचे प्रमाण मोठे आहे. घनदाट जंगल असून येथून विविध प्रकारचे वनोपज आदिवासी समाजाच्या नागरिकांना उपलब्ध होत असतात. कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये सुद्धा भामरागड तालुक्याच्या दुर्गम भागातील अनेक नागरिक तसेच महिला जंगलामध्ये जाऊन चारोळी व टेंभर संकलीत करीत असल्याचे दिसून येत आहे. सदर वनोपजासाठी सध्या लॉकडाऊनमुळे विक्रीची व्यवस्था नाही. त्यामुळे सदर वनोपज वाढवून त्याची साठवणूक केली जात आहे.कोरोनाची संचारबंदी संपल्यानंतर भामरागड तालुक्यातून शहरी भागातील बाजारपेठेत चारोळी व टेंभर विक्रीसाठी आणण्यात येणार आहे. शहरी भागातील नागरिकांना या वनोपजाची विशेष आवड आहे. शहरातील लोक ते चवीने खात असतात. गडचिरोली, देसाईगंज, चामोर्शी व धानोरा तालुका मुख्यालयाच्या बाजारपेठेत एप्रिल अखेरीस व मे महिन्यात सदर वनोपज विकताना अनेक महिला दिसून येतात. यातून आदिवासी भागातील नागरिकांना आर्थिक मिळकत उपलब्ध होऊन रोजगार प्राप्त होतो.

टॅग्स :forestजंगल