शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

VIDEO: आदिवासींनो, नक्षलवर भरोसा नाय का...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2017 16:56 IST

गडचिरोली, दि. 29 - सध्या प्रत्येकाच्या मोबाईलवर फिरत असलेले ‘..भरोसा नाय का?’ हे गाणे चांगलेच हिट झाले आहे. मूळ ...

गडचिरोली, दि. 29 - सध्या प्रत्येकाच्या मोबाईलवर फिरत असलेले ‘..भरोसा नाय का?’ हे गाणे चांगलेच हिट झाले आहे. मूळ गाण्याची चाल आणि ठेका कायम ठेवत त्यात राजकारणापासून ते सामाजिक समस्यांवर विडंबन केले जात आहे. नक्षलवादाने होरपळून निघत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातही या गाण्याचा उपयोग नक्षलवाद्यांविरूद्ध आदिवासी लोकांना जागरूक करण्यासाठी केला जात आहे. विशेष म्हणजे युवा वर्गात त्याचा सकारात्मक परिणामही दिसून येत आहे.

‘आदिवासींनो, तुमचा नक्षलवर भरोसा नाय का?’ या धृवपदासह नक्षलवाद आदिवासींच्या विकासात कसा बाधक ठरत आहे, त्यांच्यामुळे शैक्षणिक व भौतिक सुविधांमध्ये कशा बाधा येतात, पोलीस दल आदिवासींसाठी कसे मित्र आणि हितचिंतक आहेत हे या गाण्यातून पटवून देण्यात आले आहे. नक्षल कारवायांच्या बाबतीत अतिसंवेदनशील असलेल्या भामरागड तालुक्यातील नारगुंडा सशस्त्र पोलीस चौकीत तैनात असलेले पोलीस उपनिरीक्षक संदीप मिश्र व त्यांच्या सहकारी कर्मचा:यांनी या गाण्याची शब्दरचना केली आहे. एवढेच नाही तर ते गाणो ‘..भरोसा नाय का?’ या जिकडे-तिकडे व्हायरल होत असलेल्या गाण्याच्या स्टाईलने गाऊन नक्षलग्रस्त नागरिकांना विचार करण्यास भाग पाडत आहे.

28 जुलै ते 3 ऑगस्टदरम्यान नक्षलवाद्यांकडून सर्वत्र शहीद सप्ताह पाळला जात आहे. यादरम्यान नागरिकांनी सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन नक्षलवाद्यांकडून केले जाते. मात्र ऐन शेतीच्या कामाच्या दिवसात आठवडाभर सर्व व्यवहार बंद ठेवणो परवडणारे नसते. इतरही विकासात्मक कामांना नक्षलवाद्यांमुळे अडथळे येतात. पोलिसांनी तयार केलेल्या या गाण्यामुळे आदिवासी समाजातील युवा वर्गासह सर्वामध्येच जागृती येत आहे. नक्षल सप्ताहादरम्यान नागरिकांनी दहशतीत न वावरता सर्व व्यवहार सुरू ठेवावे म्हणून पोलीस ठिकठिकाणी शांती मार्च काढून त्यांच्यासमोर हे गाणेही सादर करीत आहे.

पोलिसांच्या जनजागृतीचा परिणाम म्हणून यावर्षी अनेक ठिकाणी नागरिकांकडून नक्षलवाद्यांना पाहीजे त्या प्रमाणात प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. नक्षल्यांनी लावलेले बॅनर जाळण्यापासून तर त्यांच्या आवाहनाला विरोध दर्शविणारे दुसरे बॅनर लावण्यार्पयतच्या घटना अनेक ठिकाणी झाल्या आहेत. 

एवढेच नाही तर पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत काही गावातील लोकांनी त्यांच्याकडील भरमार बंदुका पोलिसांकडे सुपूर्द करून विकास कामांना विरोध करणा:या नक्षलवादाला खतपाणी घालणार नाही, असा निर्धार व्यक्त केला आहे.