शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: आदिवासींनो, नक्षलवर भरोसा नाय का...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2017 16:56 IST

गडचिरोली, दि. 29 - सध्या प्रत्येकाच्या मोबाईलवर फिरत असलेले ‘..भरोसा नाय का?’ हे गाणे चांगलेच हिट झाले आहे. मूळ ...

गडचिरोली, दि. 29 - सध्या प्रत्येकाच्या मोबाईलवर फिरत असलेले ‘..भरोसा नाय का?’ हे गाणे चांगलेच हिट झाले आहे. मूळ गाण्याची चाल आणि ठेका कायम ठेवत त्यात राजकारणापासून ते सामाजिक समस्यांवर विडंबन केले जात आहे. नक्षलवादाने होरपळून निघत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातही या गाण्याचा उपयोग नक्षलवाद्यांविरूद्ध आदिवासी लोकांना जागरूक करण्यासाठी केला जात आहे. विशेष म्हणजे युवा वर्गात त्याचा सकारात्मक परिणामही दिसून येत आहे.

‘आदिवासींनो, तुमचा नक्षलवर भरोसा नाय का?’ या धृवपदासह नक्षलवाद आदिवासींच्या विकासात कसा बाधक ठरत आहे, त्यांच्यामुळे शैक्षणिक व भौतिक सुविधांमध्ये कशा बाधा येतात, पोलीस दल आदिवासींसाठी कसे मित्र आणि हितचिंतक आहेत हे या गाण्यातून पटवून देण्यात आले आहे. नक्षल कारवायांच्या बाबतीत अतिसंवेदनशील असलेल्या भामरागड तालुक्यातील नारगुंडा सशस्त्र पोलीस चौकीत तैनात असलेले पोलीस उपनिरीक्षक संदीप मिश्र व त्यांच्या सहकारी कर्मचा:यांनी या गाण्याची शब्दरचना केली आहे. एवढेच नाही तर ते गाणो ‘..भरोसा नाय का?’ या जिकडे-तिकडे व्हायरल होत असलेल्या गाण्याच्या स्टाईलने गाऊन नक्षलग्रस्त नागरिकांना विचार करण्यास भाग पाडत आहे.

28 जुलै ते 3 ऑगस्टदरम्यान नक्षलवाद्यांकडून सर्वत्र शहीद सप्ताह पाळला जात आहे. यादरम्यान नागरिकांनी सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन नक्षलवाद्यांकडून केले जाते. मात्र ऐन शेतीच्या कामाच्या दिवसात आठवडाभर सर्व व्यवहार बंद ठेवणो परवडणारे नसते. इतरही विकासात्मक कामांना नक्षलवाद्यांमुळे अडथळे येतात. पोलिसांनी तयार केलेल्या या गाण्यामुळे आदिवासी समाजातील युवा वर्गासह सर्वामध्येच जागृती येत आहे. नक्षल सप्ताहादरम्यान नागरिकांनी दहशतीत न वावरता सर्व व्यवहार सुरू ठेवावे म्हणून पोलीस ठिकठिकाणी शांती मार्च काढून त्यांच्यासमोर हे गाणेही सादर करीत आहे.

पोलिसांच्या जनजागृतीचा परिणाम म्हणून यावर्षी अनेक ठिकाणी नागरिकांकडून नक्षलवाद्यांना पाहीजे त्या प्रमाणात प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. नक्षल्यांनी लावलेले बॅनर जाळण्यापासून तर त्यांच्या आवाहनाला विरोध दर्शविणारे दुसरे बॅनर लावण्यार्पयतच्या घटना अनेक ठिकाणी झाल्या आहेत. 

एवढेच नाही तर पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत काही गावातील लोकांनी त्यांच्याकडील भरमार बंदुका पोलिसांकडे सुपूर्द करून विकास कामांना विरोध करणा:या नक्षलवादाला खतपाणी घालणार नाही, असा निर्धार व्यक्त केला आहे.