शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
2
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
3
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

VIDEO: आदिवासींनो, नक्षलवर भरोसा नाय का...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2017 16:56 IST

गडचिरोली, दि. 29 - सध्या प्रत्येकाच्या मोबाईलवर फिरत असलेले ‘..भरोसा नाय का?’ हे गाणे चांगलेच हिट झाले आहे. मूळ ...

गडचिरोली, दि. 29 - सध्या प्रत्येकाच्या मोबाईलवर फिरत असलेले ‘..भरोसा नाय का?’ हे गाणे चांगलेच हिट झाले आहे. मूळ गाण्याची चाल आणि ठेका कायम ठेवत त्यात राजकारणापासून ते सामाजिक समस्यांवर विडंबन केले जात आहे. नक्षलवादाने होरपळून निघत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातही या गाण्याचा उपयोग नक्षलवाद्यांविरूद्ध आदिवासी लोकांना जागरूक करण्यासाठी केला जात आहे. विशेष म्हणजे युवा वर्गात त्याचा सकारात्मक परिणामही दिसून येत आहे.

‘आदिवासींनो, तुमचा नक्षलवर भरोसा नाय का?’ या धृवपदासह नक्षलवाद आदिवासींच्या विकासात कसा बाधक ठरत आहे, त्यांच्यामुळे शैक्षणिक व भौतिक सुविधांमध्ये कशा बाधा येतात, पोलीस दल आदिवासींसाठी कसे मित्र आणि हितचिंतक आहेत हे या गाण्यातून पटवून देण्यात आले आहे. नक्षल कारवायांच्या बाबतीत अतिसंवेदनशील असलेल्या भामरागड तालुक्यातील नारगुंडा सशस्त्र पोलीस चौकीत तैनात असलेले पोलीस उपनिरीक्षक संदीप मिश्र व त्यांच्या सहकारी कर्मचा:यांनी या गाण्याची शब्दरचना केली आहे. एवढेच नाही तर ते गाणो ‘..भरोसा नाय का?’ या जिकडे-तिकडे व्हायरल होत असलेल्या गाण्याच्या स्टाईलने गाऊन नक्षलग्रस्त नागरिकांना विचार करण्यास भाग पाडत आहे.

28 जुलै ते 3 ऑगस्टदरम्यान नक्षलवाद्यांकडून सर्वत्र शहीद सप्ताह पाळला जात आहे. यादरम्यान नागरिकांनी सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन नक्षलवाद्यांकडून केले जाते. मात्र ऐन शेतीच्या कामाच्या दिवसात आठवडाभर सर्व व्यवहार बंद ठेवणो परवडणारे नसते. इतरही विकासात्मक कामांना नक्षलवाद्यांमुळे अडथळे येतात. पोलिसांनी तयार केलेल्या या गाण्यामुळे आदिवासी समाजातील युवा वर्गासह सर्वामध्येच जागृती येत आहे. नक्षल सप्ताहादरम्यान नागरिकांनी दहशतीत न वावरता सर्व व्यवहार सुरू ठेवावे म्हणून पोलीस ठिकठिकाणी शांती मार्च काढून त्यांच्यासमोर हे गाणेही सादर करीत आहे.

पोलिसांच्या जनजागृतीचा परिणाम म्हणून यावर्षी अनेक ठिकाणी नागरिकांकडून नक्षलवाद्यांना पाहीजे त्या प्रमाणात प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. नक्षल्यांनी लावलेले बॅनर जाळण्यापासून तर त्यांच्या आवाहनाला विरोध दर्शविणारे दुसरे बॅनर लावण्यार्पयतच्या घटना अनेक ठिकाणी झाल्या आहेत. 

एवढेच नाही तर पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत काही गावातील लोकांनी त्यांच्याकडील भरमार बंदुका पोलिसांकडे सुपूर्द करून विकास कामांना विरोध करणा:या नक्षलवादाला खतपाणी घालणार नाही, असा निर्धार व्यक्त केला आहे.