शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

VIDEO: आदिवासींनो, नक्षलवर भरोसा नाय का...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2017 16:56 IST

गडचिरोली, दि. 29 - सध्या प्रत्येकाच्या मोबाईलवर फिरत असलेले ‘..भरोसा नाय का?’ हे गाणे चांगलेच हिट झाले आहे. मूळ ...

गडचिरोली, दि. 29 - सध्या प्रत्येकाच्या मोबाईलवर फिरत असलेले ‘..भरोसा नाय का?’ हे गाणे चांगलेच हिट झाले आहे. मूळ गाण्याची चाल आणि ठेका कायम ठेवत त्यात राजकारणापासून ते सामाजिक समस्यांवर विडंबन केले जात आहे. नक्षलवादाने होरपळून निघत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातही या गाण्याचा उपयोग नक्षलवाद्यांविरूद्ध आदिवासी लोकांना जागरूक करण्यासाठी केला जात आहे. विशेष म्हणजे युवा वर्गात त्याचा सकारात्मक परिणामही दिसून येत आहे.

‘आदिवासींनो, तुमचा नक्षलवर भरोसा नाय का?’ या धृवपदासह नक्षलवाद आदिवासींच्या विकासात कसा बाधक ठरत आहे, त्यांच्यामुळे शैक्षणिक व भौतिक सुविधांमध्ये कशा बाधा येतात, पोलीस दल आदिवासींसाठी कसे मित्र आणि हितचिंतक आहेत हे या गाण्यातून पटवून देण्यात आले आहे. नक्षल कारवायांच्या बाबतीत अतिसंवेदनशील असलेल्या भामरागड तालुक्यातील नारगुंडा सशस्त्र पोलीस चौकीत तैनात असलेले पोलीस उपनिरीक्षक संदीप मिश्र व त्यांच्या सहकारी कर्मचा:यांनी या गाण्याची शब्दरचना केली आहे. एवढेच नाही तर ते गाणो ‘..भरोसा नाय का?’ या जिकडे-तिकडे व्हायरल होत असलेल्या गाण्याच्या स्टाईलने गाऊन नक्षलग्रस्त नागरिकांना विचार करण्यास भाग पाडत आहे.

28 जुलै ते 3 ऑगस्टदरम्यान नक्षलवाद्यांकडून सर्वत्र शहीद सप्ताह पाळला जात आहे. यादरम्यान नागरिकांनी सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन नक्षलवाद्यांकडून केले जाते. मात्र ऐन शेतीच्या कामाच्या दिवसात आठवडाभर सर्व व्यवहार बंद ठेवणो परवडणारे नसते. इतरही विकासात्मक कामांना नक्षलवाद्यांमुळे अडथळे येतात. पोलिसांनी तयार केलेल्या या गाण्यामुळे आदिवासी समाजातील युवा वर्गासह सर्वामध्येच जागृती येत आहे. नक्षल सप्ताहादरम्यान नागरिकांनी दहशतीत न वावरता सर्व व्यवहार सुरू ठेवावे म्हणून पोलीस ठिकठिकाणी शांती मार्च काढून त्यांच्यासमोर हे गाणेही सादर करीत आहे.

पोलिसांच्या जनजागृतीचा परिणाम म्हणून यावर्षी अनेक ठिकाणी नागरिकांकडून नक्षलवाद्यांना पाहीजे त्या प्रमाणात प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. नक्षल्यांनी लावलेले बॅनर जाळण्यापासून तर त्यांच्या आवाहनाला विरोध दर्शविणारे दुसरे बॅनर लावण्यार्पयतच्या घटना अनेक ठिकाणी झाल्या आहेत. 

एवढेच नाही तर पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत काही गावातील लोकांनी त्यांच्याकडील भरमार बंदुका पोलिसांकडे सुपूर्द करून विकास कामांना विरोध करणा:या नक्षलवादाला खतपाणी घालणार नाही, असा निर्धार व्यक्त केला आहे.