शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

बळीराजाला आधाराची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 06:00 IST

नुकसानभरपाई म्हणून शासनाने शेतकऱ्यांना एकरी २० हजारांची मदत ताबडतोब करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा नवनिर्वाचित आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी शासनाकडे केली आहे. यंदा परतीच्या पावसाने शेतकरी पार खचून गेला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीशिवाय दुसरे उत्पन्नाचे पर्यायी साधन नाही.

ठळक मुद्देएकरी २० हजारांची मदत द्या- धर्मरावबाबांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : यंदाच्या धान, सोयाबीन, कापसाच्या व अन्य पिकांच्या पेरणीच्या वेळी पाऊस गायब झालेल्या पावसाने नंतर जोरदार हजेरी लावल्याने अतिवृष्टी झाली. त्यातही कसेबसे पीक हाती येण्याच्या मार्गावर असताना परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या आशेवर पूर्णत: पाणी फेरले. परिणामी यंदाची शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली असून आता तत्काळ मदतीची गरज आहे. नुकसानभरपाई म्हणून शासनाने शेतकऱ्यांना एकरी २० हजारांची मदत ताबडतोब करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा नवनिर्वाचित आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी शासनाकडे केली आहे.यंदा परतीच्या पावसाने शेतकरी पार खचून गेला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीशिवाय दुसरे उत्पन्नाचे पर्यायी साधन नाही. त्यामुळे शासनाने तात्काळ मदत देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी धर्मरावबाबांनी केली आहे.बहुतांश ठिकाणी हलक्या प्रतीच्या धानाची कापणी करून त्याच ठिकाणी सुकविण्यासाठी ठेवले असताना अचानक पाऊस झाला. त्यामुळे धानाला नवीन अंकुर (कोंब) फुटत असून जड प्रतीचे धान वादळ वाऱ्याने खाली कोसळून पडले आहे. कापूस, सोयाबीन, ज्वारी आणि अन्य पिकांची हीच अवस्था झाली आहे. हाती आलेले पीक परतीच्या पावसामुळे हातातून जात असल्याने ही मदत तातडीने द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.तीन दिवसात नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. प्रशासकीय यंत्रणा कामीही लागली आहे. पण कोणीही नुकसानग्रस्त शेतकरी यातून सुटणार नाही आणि त्याला भरपाई मिळेल याची दक्षताही प्रशासनाने घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Farmerशेतकरी