शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

बळीराजाला आधाराची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 06:00 IST

नुकसानभरपाई म्हणून शासनाने शेतकऱ्यांना एकरी २० हजारांची मदत ताबडतोब करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा नवनिर्वाचित आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी शासनाकडे केली आहे. यंदा परतीच्या पावसाने शेतकरी पार खचून गेला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीशिवाय दुसरे उत्पन्नाचे पर्यायी साधन नाही.

ठळक मुद्देएकरी २० हजारांची मदत द्या- धर्मरावबाबांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : यंदाच्या धान, सोयाबीन, कापसाच्या व अन्य पिकांच्या पेरणीच्या वेळी पाऊस गायब झालेल्या पावसाने नंतर जोरदार हजेरी लावल्याने अतिवृष्टी झाली. त्यातही कसेबसे पीक हाती येण्याच्या मार्गावर असताना परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या आशेवर पूर्णत: पाणी फेरले. परिणामी यंदाची शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली असून आता तत्काळ मदतीची गरज आहे. नुकसानभरपाई म्हणून शासनाने शेतकऱ्यांना एकरी २० हजारांची मदत ताबडतोब करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा नवनिर्वाचित आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी शासनाकडे केली आहे.यंदा परतीच्या पावसाने शेतकरी पार खचून गेला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीशिवाय दुसरे उत्पन्नाचे पर्यायी साधन नाही. त्यामुळे शासनाने तात्काळ मदत देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी धर्मरावबाबांनी केली आहे.बहुतांश ठिकाणी हलक्या प्रतीच्या धानाची कापणी करून त्याच ठिकाणी सुकविण्यासाठी ठेवले असताना अचानक पाऊस झाला. त्यामुळे धानाला नवीन अंकुर (कोंब) फुटत असून जड प्रतीचे धान वादळ वाऱ्याने खाली कोसळून पडले आहे. कापूस, सोयाबीन, ज्वारी आणि अन्य पिकांची हीच अवस्था झाली आहे. हाती आलेले पीक परतीच्या पावसामुळे हातातून जात असल्याने ही मदत तातडीने द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.तीन दिवसात नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. प्रशासकीय यंत्रणा कामीही लागली आहे. पण कोणीही नुकसानग्रस्त शेतकरी यातून सुटणार नाही आणि त्याला भरपाई मिळेल याची दक्षताही प्रशासनाने घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Farmerशेतकरी