शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

शेतीसाठी ट्रॅक्टर पोसणारे विसोरा गाव

By admin | Updated: April 5, 2017 01:34 IST

शेती व्यवसायाला पारंपरिकतेची जोड देऊन बैैलबंडी, बैैलजोडीच्या साह्याने ऐरवी शेती केली जाते. हे सर्वत्र परिचित आहे.

गावात १२७ ट्रॅक्टर : १९५६ ला पोहोचले पहिले ट्रॅक्टर अतुल बुराडे   देसाईगंज शेती व्यवसायाला पारंपरिकतेची जोड देऊन बैैलबंडी, बैैलजोडीच्या साह्याने ऐरवी शेती केली जाते. हे सर्वत्र परिचित आहे. परंतु एखाद्या गावात बैैलजोडीपेक्षा यंत्राचा वापर शेती कसण्यासाठी अधिक होत असेल तर नवलच. परंतु ही नवलाई घडविली आहे गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील विसोरा गावाने. ४ हजार ६०४ लोकसंख्या असलेल्या या गावात सध्या तब्बल १२७ ट्रॅक्टर आहेत. बैलजोडीप्रमाणे ट्रॅक्टर पोसून येथील शेतकरी पारंपरिकतेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन शेती व्यवसाय करीत आहेत. मागास समजल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात एका छोट्याशा गावात १९५६ ला पहिले ट्रॅक्टर पोहोचणे म्हणजे नवलच होय. जिल्ह्यातील औद्योगिक शहर म्हणून ओळख असलेल्या देसाईगंजपासून सहा किमी अंतरावर विसोरा हे छोटेशे गाव. या गावातील शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करीत होते. परंतु पारंपरिक शेतीला यांत्रिकतेची जोड मिळावी या हेतूने शेतकरी वासुदेव नाकाडे यांनी १९५६ मध्ये केवळ ७ हजार रूपयांत गावात जर्मन कंपनीचा बुलडॉग लाँज नावाचा पहिला ट्रॅक्टर आणला. त्यानंतर गावातील शेतीत तंत्रज्ञानाचा वापर वाढण्याची जणूकाही होडच लागली. दरवर्षी शेतकरी नवनवीन कंपनीच्या ट्रॅक्टर आणू लागले. १९६० पासून गावात नवीन ट्रॅक्टर आणण्याची रिघ लागली. ती आजतागायत सुरू आहे. गावात आजघडीला तब्बल १२७ ट्रॅक्टर असून शेतकरी शेती व्यवसाय तंत्रज्ञानासह करीत आहेत. १९५० च्या दशकात ट्रॅक्टर म्हणजे काय, हे ऐकायलाच नवलाचेच होते. परंतु या काळात विसोरासारख्या छोट्या गावात १९५६ ला ट्रॅक्टर आल्याने ट्रॅक्टर बघण्यासाठी पंचक्रोशितील लोक गोळा व्हायचे. ट्रॅक्टरच्या मागे धावायचे. साधी सायकल सुद्धा या काळात नवलाची होती. त्यात तर ट्रॅक्टरसारखे मोठे यंत्र म्हणजे नवलाचेच होते. त्यानंतर दुसऱ्याच वर्षी म्हणजे १९५७ साली रामचंद्र नाकाडे, रेशीम नाकाडे या दोघांनी रशियन ट्रॅक्टर घेतला. वासुदेव पाटील नाकाडे यांनीच १९६०-६२ च्या दरम्यान जॉन डियर लाँज टॅ्रक्टर विकत घेतला. कमी हॉर्स पॉंवरमुळे त्याचे ‘बोदबोद्या’ हे नाव पडले. त्यामुळे हे ट्रॅक्टर सर्वात जास्त काळ लक्षात राहिले. १९६५ साली झेटर तर १८ मार्च १९७५ या दिवशी आयशर टॅ्रक्टर आत्माराम नाकाडे यांनी खरेदी केले. ६० च्या दशकात दळणवळणाच्या सुविधाच नसल्याने बाल गोपालांसह वयस्कांनाही वाहनांबद्दल एक वेगळेच आकर्षण होते. रस्त्यावरून ट्रॅक्टर धावू लागताच नागरिकांची ट्रॅक्टर पाहण्यासाठी गर्दी उसळायची. अनेक जणांकडे तीन ते चार ट्रॅक्टर विसोरा गावात १ हजार १२४ कुटुंब आहेत. गावात एकूण पाच वॉर्ड असून येथे अनेक शेतकऱ्यांकडे दोन ते तीन ट्रॅक्टर आहेत. शेतकरी अशोक बुद्धे, ज्ञानदेव परशुरामकर, भाष्कर नाकाडे, राजकुमार नाकाडे यांच्याकडे प्रत्येकी तीन ट्रॅक्टर आहेत. तर सतीश नाकाडे, भैय्याजी नाकाडे, लुनकरण नाकाडे, राजू धर्मा नाकाडे, नामदेव नाकाडे, केवळराम नाकाडे, गंगाधर सुंदरकर, प्रेमचंद तलमले, हर्षवर्धन नाकाडे, महेंद्र नाकाडे यांच्याकडे प्रत्येकी दोन ट्रॅक्टर असून एक ट्रॅक्टर असणारे शेतकरी ९० च्या आसपास आहेत.