शहरं
Join us  
Trending Stories
1
'नोबेल समितीने शांती निवडण्याऐवजी राजकारण केलं', ट्रम्प यांना डावलताच 'व्हाईट हाऊस'चा थयथयाट
2
'भोसले घराण्यामुळे शिवरायांची प्रेरणा रुजली, म्हणूनच नागपुरच्या मातीतून संघाचा जन्म झाला', सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान
3
चीनचं अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर; चिनी जहाजांवर शुल्क लादताच उचललं मोठं पाऊल!
4
NZ W vs BAN W: अखेर वर्ल्ड चॅम्पियन न्यूझीलंडनं भोपळा फोडला! बांगलादेशचा १०० धावांनी उडवला धुव्वा
5
केबिनमध्ये बोलावलं अन्...; दारूच्या नशेत डॉक्टराचे नात्यातील महिलेसोबत संतापजनक कृत्य
6
आशिया कपची ट्रॉफी भारताला मिळूच देणार नाही, मोहसीन नक्वींनी आता खेळली अशी चाल 
7
‘मला तुझ्याकडे बोलावून घे’, विरहाने व्याकूळ झालेल्या शेफाली जरीवालाच्या पतीची भावूक पोस्ट, चाहते चिंतित  
8
नवी मुंबई विमानतळाला आरएसएसच्या नेत्याचे नाव देण्याची तयारी; रोहित पवारांचा भाजपवर आरोप
9
आरोग्य सचिवांच्या दौऱ्यापूर्वीच दहा डॉक्टरांचे राजीनामास्त्र, सावंतवाडीतील आरोग्य क्षेत्रात खळबळ
10
Royal Enfield: आता घरबसल्या बूक करा रॉयल एनफील्ड, 'हे' मॉडेल्स ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध!
11
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
12
प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी कपलने सीमा ओलांडून भारतात केला प्रवेश, 'अशी' झाली पोलखोल
13
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
14
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
15
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?
16
आठ युद्धं थांबवली तरी पुरस्कार समितीने डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल का नाकारला? समोर येताहेत ही कारणं
17
"मुंबईतील भूखंड उद्योगपतींना कवडीमोल दराने देण्याचा महायुती सरकारचा सपाटा, तर सर्वसामन्यांच्या घरांकडे दुर्लक्ष’’, काँग्रेसचा आरोप
18
सात युद्धं थांबवल्याच्या 'बढाया' मारणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना ठेंगा; 'शांततेचं नोबेल' लोकशाहीवादी मारिया मचाडो यांना
19
IND vs WI 2nd Test Day 1 Stumps: 'ओपनिंग डे'ला टीम इंडियाचा 'यशस्वी' शो! साई सुदर्शनही चमकला; पण...
20
'बदला घेणारच'; भैय्या गायकवाडची शिवीगाळ करत धमकी, टोलनाक्यावर बेदम मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल

वसंतपूर चार दिवसांपासून अंधारात

By admin | Updated: May 9, 2016 01:35 IST

तालुक्यातील वसंतपूर येथे मंगळवारच्या मध्यरात्री वादळी वाऱ्यासह तुरळक पाऊस झाला.

वादळामुळे वीज खांब तुटले : महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थ त्रस्तचामोर्शी : तालुक्यातील वसंतपूर येथे मंगळवारच्या मध्यरात्री वादळी वाऱ्यासह तुरळक पाऊस झाला. परंतु वादळाच्या प्रचंड वेगाने येथील सिमेंटचे वीज खांब तुटून पडले. वीज ताराही अस्ताव्यस्त झाल्या. त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला. परंतु मंगळवारनंतर चार दिवसांचा कालावधी उलटूनही अद्यापही गावातील वीज पुरवठा सुरळीत झाला नाही. याबाबीकडे वीज वितरण कंपनीचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थांना चार दिवसांपासून अंधारात राहावे लागत आहे. चामोर्शी तालुक्यातील वसंतपूर येथे मंगळवारी आलेल्या जोरदार वादळामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेकांचे छतही उडून गेले. शिवाय झोपड्या व इतर ठिकाणचे गवतही अस्ताव्यस्त झाले. परिसरातील अनेक झाडे तुटून पडली. परिणामी अनेक वीज तारांवर फांद्याही पडल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या भागातील वीज पुरवठा खंडित झाला. दुसऱ्या दिवशी सदर वीज पुरवठा पूर्ववत करण्याकरिता नवीन वीज खांब लावून तारांची जुळवाजुळव करणे गरजेचे होते. परंतु या सर्व बाबीकडे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. परिणामी दमट व उष्ण वातावरणात नागरिकांना अंधारातच राहावे लागत आहे. परिणामी ग्रामस्थांमध्ये वीज वितरण कंपनीच्या कारभाराविषयी तीव्र रोष व्यक्त होत आहे. गावातील वीज पुरवठा खंडित होऊन चार दिवसांचा कालावधी उलटला. सर्वत्र अस्ताव्यस्त वस्तू पडलेल्या आहेत. मात्र वीज गावातील वीज पुरवठा सुरळीत करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे. (शहर प्रतिनिधी)आष्टी कार्यालयाकडून उपाययोजना नाहीवसंतपूर येथे मंगळवारी आलेल्या वादळामुळे वीज खांब तुटून वीज पुरवठा खंडित झाला, याची माहिती गावातील सरपंचांनी भ्रमणध्वनीवर आष्टी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला दिली. परंतु येथून कोणताही कर्मचारी गावात वीज दुरूस्तीसाठी आला नाही. गावात पिठ गिरणी, मोटारपंप, संगणकावर विविध कामे केली जातात. परंतु वीज पुरवठा खंडित असल्याने नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. गावात सिमेंटच्या वीज खांबऐवजी लोखंडी वीज खांब बसवावे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. गावातील अनेक आंबेही गळून पडले. त्यामुळे नुकसान झाले. वीज पुरवठा पूर्ववत न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.