शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

नैनपुरा येथे धान पिकात मत्स्य शेतीचा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 00:40 IST

निसर्गाचा लहरीपणा, रोगांचा प्रादुर्भाव, धानाला असलेला कमी बाजाभाव यामुळे आजच्या घटकेला धानाची शेती परवडणारी नाही, अशी सर्वत्र शेतकऱ्यांची ओरड असतांनाच देसाईगंज तालुक्यातील नैनपूर येथील भाग्यश्री सेंद्रिय शेतकरी गटाच्या शेतकऱ्यांनी धान शेतीमध्येच मत्स्य शेतीचा नाविण्यपूर्ण प्रयोग केला आहे.

ठळक मुद्देआत्माचे मार्गदर्शन : शेतकरी बचत गटाचा नावीन्यपूर्ण प्रयोग; अनेक शेतकऱ्यांनी भेट देऊन जाणली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : निसर्गाचा लहरीपणा, रोगांचा प्रादुर्भाव, धानाला असलेला कमी बाजाभाव यामुळे आजच्या घटकेला धानाची शेती परवडणारी नाही, अशी सर्वत्र शेतकऱ्यांची ओरड असतांनाच देसाईगंज तालुक्यातील नैनपूर येथील भाग्यश्री सेंद्रिय शेतकरी गटाच्या शेतकऱ्यांनी धान शेतीमध्येच मत्स्य शेतीचा नाविण्यपूर्ण प्रयोग केला आहे. यावर्षी एकरी चार लाखांचे उत्पन्न मिळणे त्यांना अपेक्षित आहे. त्यामुळे शेती परवडणारी नाही असे म्हणऱ्या शेतकऱ्यांच्या पुढे नवा आदर्श या शेतकऱ्यांनी उभा केला आहे. यासाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) गडचिरोली यांचे मार्गदर्शन लाभत आहे.नैनपूर येथे आत्मा अंतर्गत भाग्यश्री सेंद्रीय शेतकरी गट तयार करण्यात आला. या गटाने गटाअंतर्गत स्वत:साठी नियमावली तयार करुन सेंद्रिय शेतीची कास धरली आहे. या गटाचे अध्यक्ष गजेंद्र महादेव ठाकरे तर सचिव शंकर चेंडूजी भाजीपाले आहेत. याच गटातील अन्नाजी तुपट व गजेंद्र ठाकरे यांनी यावर्षी आपल्या प्रत्येकी अर्धा एकर शेतात सेंद्रिय धान शेतीत मत्स्य शेती करण्यास सुरूवात केली आहे. त्यांचा हा प्रयोग नाविण्यपूर्ण असून यासाठी आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. प्रकाश पवार यांच्या मार्गदर्शनात तालुका तंत्रव्यवस्थापक महेंद्र दोनाडकर व कृषी सहाय्यक कल्पना ठाकरे यांचे सहकार्य लाभत आहे. यासाठी शेतकऱ्यांना आत्माकडून ५० हजारांचे अनुदान प्राप्त झाले आहे.धान शेतीत मत्स्य शेती करण्यासाठी सदर शेतकऱ्यांनी आपल्या शेतात चौकोनी आकारात चारही बाजूला दीड मिटर खोल व तिन मिटर रुंद खड्डा तयार केला आहे.त्यात अर्धा एकर जागेतील खड्डा केलेल्या जागेमध्ये रोहु, कथला, शिप्रस जातीच्या माशांचे बिज सोडले आहे. उरलेल्या मध्यभागी असलेल्या खुल्या जागेत श्रीपध्तीने मकरंद जातीच्या धान पिकाची रोवणी केली आहे. धान पिकासाठी पूर्णत: सेंद्रिय खताचा वापर करीत आहेत. माशांना खाद्य म्हणून गोमुत्र, शेण, गुळ, वडाच्या झाडाखालील माती, बेसन, ताक यापासून तयार केलेल्या जिवांमृताचा वापर केला जात आहे. माशांच्या विष्ठेचा धान पिकासाठी उपयोग होत असल्याने धानाच्या वाढीस पोषक ठरत आहे. शेतात सोडलेले मासे ७ ते ८ महिन्यात एक किलो वजनाचे होऊन विक्री योग्य होतात. त्यापासून अर्धा एकर शेतीतून सदर शेतकºयांना आजच्या बाजार भावानुसार दोन लाख रुपये उत्पन्न प्राप्त होणे अपेक्षित आहे. तर धान पीक पूर्णत: सेंद्रिय व सुवासीक असल्याने त्यापासून २० हजार रूपयांचे उत्पन्न मिळणार आहे. एकंदरीत अर्धा एकर शेतीपासून सदर शेतकऱ्यांना दोन लाख विस हजारचे उत्पन्न अपेक्षित आहे.उत्पादन खर्च कमी व उत्पन्न जास्त यामुळे धान शेतीतून मत्स्य शेती हा नाविण्यपूर्ण प्रयोग शेतकऱ्यांना निश्चितच फायदेशीर ठरणारा आहे. सोबतच पुढे शेतावर माशांसाठी खड्डा करुन उपसा केलेल्या मातीपासून तयार झालेल्या पाळीवर शेवगा व आंब्यांच्या झाडांची लागवड करुन उत्पन्न वाढविण्याचा शेतकऱ्यांचा मानस आहे. सदर शेतकऱ्यांचा हा नाविण्यपूर्ण प्रयोग पाहण्याठी बाहेर जिल्ह्यातील शेतकरी येथे येत आहेत. आजपर्यंत भंडारा जिल्ह्यातील १२५ व गोंदीया जिल्ह्यातील १२० शेतकऱ्यांनी भेट देऊन या नाविण्यपूर्ण शेतीतील प्रयोगाची माहीती जाणून घेतली आहे.

शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीची कास धरणे काळाची गरज असून शेतीमध्ये पुरक उद्योग केल्याशिवाय शेतकऱ्यांचे उत्पादन वाढणार नाही. अशा प्रकारच्या मिश्र शेतीमुळे शेतकऱ्यांचे उत्पादन दुपटीने वाढण्यास मदत होईल. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट वाढविण्याचे आत्माचे उद्दिष्ट आहे.- महेंद्र दोनाडकर, तालुका तंत्रव्यवस्थापक देसाईगंजसेंद्रिय शेती कमी खर्चाची असून शेतकऱ्यांनी रासायनिक खताचा वापर न करता शेतीमध्ये धानपिका सोबत मत्स्य शेती सारखे नाविण्यपूर्ण प्रयोग केल्यास शेतकऱ्यांना शेती फायदेशीर ठरेल.- उमेशचंद्र तुपट, शेतकरी,भाग्यश्री सेंद्रिय शेती गट नैनपूर

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती