शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...
2
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
3
उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
4
सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत
5
Kuldeep Yadav: कुलदीप यादवच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद, घरच्या मैदानावर घेतल्या १५० विकेट्स!
6
Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम
7
कोण आहेत नागपूरचे सुपुत्र आयपीएस विजय साखरे ? मराठमोड्या अधिकाऱ्याकडे दिल्लीतील स्फोटप्रकरणी एनआयए पथकाचे नेतृत्व
8
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
9
पर्सनल लोन घेताय? केवळ व्याजदर नका पाहू! 'या' Hidden Charges मुळे कर्ज बनते डोकेदुखी!
10
अंता पोटनिवडणुकीत १५९ मतांमुळे भाजपाची लाज राखली; मात्र काँग्रेस उमेदवारानं मारली बाजी
11
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
12
Nitin Gilbile: कारमध्येच मित्राला घातल्या गोळ्या, नितीन गिलबिले हत्या प्रकरणात लोणावळ्यात एकाला अटक
13
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
15
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
16
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
17
Turmeric Coffee : हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
18
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
19
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
20
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
Daily Top 2Weekly Top 5

ऐक्य हीच समाजाची ताकद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 22:16 IST

लोकसंख्येने मोठा असलेल्या चामोर्शी तालुक्यात तेली समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. विखुरलेल्या समाजाला ऐक्याचे व्यासपीठ लाभने गरजेचे आहे. यामुळे समाजाचे ऐक्य टिकून राहते. ऐक्य हिच समाजाची ताकद आहे.

ठळक मुद्देदिलीप तेली यांचे प्रतिपादन : चामोर्शीत संताजी जगनाडे महाराज जयंती कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : लोकसंख्येने मोठा असलेल्या चामोर्शी तालुक्यात तेली समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. विखुरलेल्या समाजाला ऐक्याचे व्यासपीठ लाभने गरजेचे आहे. यामुळे समाजाचे ऐक्य टिकून राहते. ऐक्य हिच समाजाची ताकद आहे. या ताकदीचा वापर जोपर्यंत करणार नाही, तोपर्यंत समाजाचा आपला समाज पुढे जाणार नाही, असे प्रतिपादन विचारवंत दिलीप तेली यांनी केले.संताजी स्नेही मंडळ चामोर्शीच्या वतीने ८ डिसेंबर रोजी संताजी जगनाडे महाराज जयंती दिनानिमित्त समाज प्रबोधन व किर्तनाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यीक संजय येरणे, किर्तनकार तुषार सूर्यवंशी उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर, गडचिरोली नगर परिषदेच्या नगराध्यक्ष योगीता पिपरे, पं.स. सभापती आनंद भांडेकर, जि.प. सदस्य प्रा. रमेश बारसागडे, प्रा. डॉ. राजेंद्र झाडे, डॉ. राम वासेकर, प्रा. घनश्याम नैताम, डॉ. रवी नैताम यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक प्रमोद पिपरे, प्रभाकर वासेकर, बंडूजी चिळंगे, रामभाऊ सातपुते, गजानन भांडेकर आदी उपस्थित होते.जयंतीनिमित्त चामोर्शी शहरातून सकाळी ९ वाजता बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी जवळपास दोन हजार दुचाकीस्वार रॅलीत सहभागी झाले होते. रॅलीचे दृश्य डोळ्याचे पारणे फिटणारे होते. कार्यक्रमादरम्यान प्रसिध्द विचारवंत संजय येरणे लिखीत ‘संताजी, यमुना, मेघनाथ साहा, ताई तेलीन’ यांचा कथाविचार या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले.किर्तनातून तुषार सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन करताना शैक्षणिक क्रांतीच्या माध्यमातूनच आपल्याला विकास साधता येईल. तसेच आई-वडिलांची सेवा हीच ईश्वरसेवा मानावी, असे मार्गदर्शन केले.प्रास्ताविक नगर परिषदेचे उपाध्यक्ष राहूल नैताम तर आभार गजानन बारसागडे यांनी मानले. मेळाव्याला जवळपास १० हजार समाज बांधव उपस्थित होते. यशस्वीतेसाठी लोमेश बुरांडे, दीपक सोमनकर, कालिदास बुरांडे, रघुनाथ भांडेकर, ऋषी वासेकर, संजय कुनघाडकर, देविदास दुधबळे, आशिष पिपरे, धनंजय कोठारे, दिलीप चलाख, दिलीप सोमनकर, श्रीकृष्ण नैताम, रमेश नैताम, गुरूदेव सातपुते, निशांत नैताम, नरेश सोमनकर, प्रविण नैताम, गजानन बारसागडे, कैलास बोबाटे, महेंद्र किरमे यांच्यासह संताजी स्नेही महिला मंडळाचे सदस्य व पदाधिकारी यांच्यासह तालुक्यातील तेली समाज बांधवांनी सहकार्य केले.दहावी व बारावीतील गुणवंतांचा सत्कारकार्यक्रमादरम्यान दहावी व बारावीतील गुणवंतांचा शाल, श्रीफळ व संताजीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये बारावीतील प्रशांत पिपरे, प्रफुल्ल चलाख, खुशबू घोंगडे, आशिष जुवारे, हेमंत बोबाटे, आशिष वासेकर, नागेश्वर नैताम, संतोषी संजय कुनघाडकर, दहावीतील दीपक दशरथ गव्हारे, नंदिनी रवीकांत दुधबळे, आदर्श डोमदेव सातपुते यांचा समावेश आहे.