शहरं
Join us  
Trending Stories
1
'निवृत्त व्हा, कुठेही जा...तुम्हाला सोडणार नाही', राहुल गांधींचा थेट इशारा; कुणावर संतापले?
2
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
3
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
4
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
5
पंचायत निवडणुकीत उतरले सोशल मीडिया इन्फ्लुएंसर; लाखो फॉलोअर्स पण पडलेली मते एकदा पाहाच
6
जागतिक अस्थिरता असतानाही सोने-चांदी स्वस्त! गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी? भविष्यात काय होणार?
7
PNB Housing Finance ला मोठा झटका, वरिष्ठांच्या राजीनाम्यानंतर शेअर १६% नं आपटला; लागलं लोअर सर्किट
8
चोर तर चोर वर शिरजोर! दागिन्यांच्या दुकानातून अंगठी चोरली, पोलिसांनी पकडल्यावर गुंडगिरी
9
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
10
Pune Crime: कोयता काढला अन् सपासप वार करत सुटला; बारामती-इंदापूर धावत्या बसमध्ये प्रवाशावर हल्ला
11
Video: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी अवतरली मराठी सिनेसृष्टी, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना
12
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; IPBS ची १०,२७७ पदांवर मेगाभरती, महाराष्ट्रासाठी किती जागा?
13
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
14
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
15
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
16
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
17
अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली...
18
"मला कोंडून ठेवलं, पत्नीला दुखापत..."; आमदार चेतन आनंद यांचे एम्स कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप
19
जावई पहिल्यांदा सासरवाडीत आला, सासुने मस्त चिकनचा बेत आखला; विषबाधेमुळे दोघांचाही मृत्यू

ऐक्य हीच समाजाची ताकद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 22:16 IST

लोकसंख्येने मोठा असलेल्या चामोर्शी तालुक्यात तेली समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. विखुरलेल्या समाजाला ऐक्याचे व्यासपीठ लाभने गरजेचे आहे. यामुळे समाजाचे ऐक्य टिकून राहते. ऐक्य हिच समाजाची ताकद आहे.

ठळक मुद्देदिलीप तेली यांचे प्रतिपादन : चामोर्शीत संताजी जगनाडे महाराज जयंती कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : लोकसंख्येने मोठा असलेल्या चामोर्शी तालुक्यात तेली समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. विखुरलेल्या समाजाला ऐक्याचे व्यासपीठ लाभने गरजेचे आहे. यामुळे समाजाचे ऐक्य टिकून राहते. ऐक्य हिच समाजाची ताकद आहे. या ताकदीचा वापर जोपर्यंत करणार नाही, तोपर्यंत समाजाचा आपला समाज पुढे जाणार नाही, असे प्रतिपादन विचारवंत दिलीप तेली यांनी केले.संताजी स्नेही मंडळ चामोर्शीच्या वतीने ८ डिसेंबर रोजी संताजी जगनाडे महाराज जयंती दिनानिमित्त समाज प्रबोधन व किर्तनाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यीक संजय येरणे, किर्तनकार तुषार सूर्यवंशी उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर, गडचिरोली नगर परिषदेच्या नगराध्यक्ष योगीता पिपरे, पं.स. सभापती आनंद भांडेकर, जि.प. सदस्य प्रा. रमेश बारसागडे, प्रा. डॉ. राजेंद्र झाडे, डॉ. राम वासेकर, प्रा. घनश्याम नैताम, डॉ. रवी नैताम यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक प्रमोद पिपरे, प्रभाकर वासेकर, बंडूजी चिळंगे, रामभाऊ सातपुते, गजानन भांडेकर आदी उपस्थित होते.जयंतीनिमित्त चामोर्शी शहरातून सकाळी ९ वाजता बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी जवळपास दोन हजार दुचाकीस्वार रॅलीत सहभागी झाले होते. रॅलीचे दृश्य डोळ्याचे पारणे फिटणारे होते. कार्यक्रमादरम्यान प्रसिध्द विचारवंत संजय येरणे लिखीत ‘संताजी, यमुना, मेघनाथ साहा, ताई तेलीन’ यांचा कथाविचार या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले.किर्तनातून तुषार सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन करताना शैक्षणिक क्रांतीच्या माध्यमातूनच आपल्याला विकास साधता येईल. तसेच आई-वडिलांची सेवा हीच ईश्वरसेवा मानावी, असे मार्गदर्शन केले.प्रास्ताविक नगर परिषदेचे उपाध्यक्ष राहूल नैताम तर आभार गजानन बारसागडे यांनी मानले. मेळाव्याला जवळपास १० हजार समाज बांधव उपस्थित होते. यशस्वीतेसाठी लोमेश बुरांडे, दीपक सोमनकर, कालिदास बुरांडे, रघुनाथ भांडेकर, ऋषी वासेकर, संजय कुनघाडकर, देविदास दुधबळे, आशिष पिपरे, धनंजय कोठारे, दिलीप चलाख, दिलीप सोमनकर, श्रीकृष्ण नैताम, रमेश नैताम, गुरूदेव सातपुते, निशांत नैताम, नरेश सोमनकर, प्रविण नैताम, गजानन बारसागडे, कैलास बोबाटे, महेंद्र किरमे यांच्यासह संताजी स्नेही महिला मंडळाचे सदस्य व पदाधिकारी यांच्यासह तालुक्यातील तेली समाज बांधवांनी सहकार्य केले.दहावी व बारावीतील गुणवंतांचा सत्कारकार्यक्रमादरम्यान दहावी व बारावीतील गुणवंतांचा शाल, श्रीफळ व संताजीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये बारावीतील प्रशांत पिपरे, प्रफुल्ल चलाख, खुशबू घोंगडे, आशिष जुवारे, हेमंत बोबाटे, आशिष वासेकर, नागेश्वर नैताम, संतोषी संजय कुनघाडकर, दहावीतील दीपक दशरथ गव्हारे, नंदिनी रवीकांत दुधबळे, आदर्श डोमदेव सातपुते यांचा समावेश आहे.