शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

मोहटोलात दुर्गा उत्सवाऐवजी अखंडटाळ उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 01:31 IST

तालुकास्थळापासून १० किमी अंतरावर असलेल्या मोहटोला गावात नवरात्र दरम्यान अखंडटाळ नाद या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. विशेष म्हणजे मागील ९० वर्षांपासून ही परंपरा गावकऱ्यांनी जोपासली आहे.

ठळक मुद्दे९० वर्षांची परंपरा कायम : टाळीसाठी गावातील नागरिकांचे पाळले गट

पुरूषोत्तम भागडकर।लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : तालुकास्थळापासून १० किमी अंतरावर असलेल्या मोहटोला गावात नवरात्र दरम्यान अखंडटाळ नाद या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. विशेष म्हणजे मागील ९० वर्षांपासून ही परंपरा गावकऱ्यांनी जोपासली आहे.मोहटोला येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार अंगिकारणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे तालुक्यात मोहटोला या गावाला गुरूदेवांचे गाव म्हणून ओळखल्या जाते. नवरात्रीच्या पावनपर्वावर शहरापासून खेड्यापर्यंत शारदा, दुर्गांची प्रतिष्ठापना केली जाते. डोळे दीपवून टाकणारी लाईटिंग व विविध देखावे यामुळे शारदा व दुर्गा उत्सवादरम्यान गाव खेड्यात गर्दी जमते. परंतु मोहटोला या गावात मात्र कोणत्याही देवीची प्रतिष्ठापना न करताना नवरात्रीदरम्यान ब्रह्मनाद टाळी सात दिवस सुरू राहते.गावातील हनुमान मंदिरात घटस्थापनेच्या दिवशी घटपूजा करून अखंडटाळीला सुरुवात होते. ती अखंडटाळी रात्रंदिवस सतत सुरू राहणार, यासाठी गावकºयांचे काही गट पाळण्यात आले आहेत. त्यांचे वेळापत्रक तयार करून संबंधित गटाला देण्यात आले आहेत. त्यानुसार प्रत्येक गटाला स्वयंस्पूर्तीने अखंडटाळीसाठी तीन तासांचा वेळ ठरवून दिलेला आहे. तो गट आपल्या वेळेला उपस्थित राहून सेवा देत आहे. अखंडनाद टाळीसाठी गावकºयांसोबतच जवळपासच्या परिसरातील डोंगरगाव (हलबी), चिखली, रिठ, नैनपूर, देसाईगंज, पिंपळगाव (हलबी), पोटगाव येथील भजन मंडळी सुद्धा उपस्थित राहून अखंडटाळ देत आहेत. बाहेर गावावरून आलेल्या भजन मंडळीचे गावकरी व मंदिर समितीतर्फे आदरातीथ्य करण्यात येते. दररोज सायंकाळच्या सुमारास गावातील आबालवृद्ध मंदिरात एकत्र येतात. त्यामुळे एकात्मतेचे दर्शन घडते. बुधवारी या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. सात दिवस अखंडटाळ, भजन राहत असल्याने गावात धार्मिक वातावरण निर्माण होण्यास मदत होत आहे.याबाबत इतर गावांमध्ये शंकरपटाचे आयोजन केले जायचे. त्यानिमित्त पाहुणे मंडळी एकत्र येऊन वधू-वर पाहणी केली जात होती. अखंडटाळ हा आमच्या गावातील वर्षभरातील सर्वात मोठा उत्सव आहे. यानिमित्त बाहेरगावची पाहुणे मंडळी, मुली, जावई व गावातील नोकरीवर असणारे युवक यानिमित्ताने गावात येतात. यानिमित्ताने वर्षाची किमान एकदातरी भेटीगाठी होतात. त्यामुळे स्नेहाचे संबंध कायम राहण्यास मदत होते. या उत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमाला विशेष महत्त्व आहे. ही परंपरा आमची नवीन पिढी पुढेही चालू ठेवले.-कैलास पारधी,सरपंच, मोहटोला

टॅग्स :Navratriनवरात्री