शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

मोहटोलात दुर्गा उत्सवाऐवजी अखंडटाळ उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 01:31 IST

तालुकास्थळापासून १० किमी अंतरावर असलेल्या मोहटोला गावात नवरात्र दरम्यान अखंडटाळ नाद या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. विशेष म्हणजे मागील ९० वर्षांपासून ही परंपरा गावकऱ्यांनी जोपासली आहे.

ठळक मुद्दे९० वर्षांची परंपरा कायम : टाळीसाठी गावातील नागरिकांचे पाळले गट

पुरूषोत्तम भागडकर।लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : तालुकास्थळापासून १० किमी अंतरावर असलेल्या मोहटोला गावात नवरात्र दरम्यान अखंडटाळ नाद या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. विशेष म्हणजे मागील ९० वर्षांपासून ही परंपरा गावकऱ्यांनी जोपासली आहे.मोहटोला येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार अंगिकारणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे तालुक्यात मोहटोला या गावाला गुरूदेवांचे गाव म्हणून ओळखल्या जाते. नवरात्रीच्या पावनपर्वावर शहरापासून खेड्यापर्यंत शारदा, दुर्गांची प्रतिष्ठापना केली जाते. डोळे दीपवून टाकणारी लाईटिंग व विविध देखावे यामुळे शारदा व दुर्गा उत्सवादरम्यान गाव खेड्यात गर्दी जमते. परंतु मोहटोला या गावात मात्र कोणत्याही देवीची प्रतिष्ठापना न करताना नवरात्रीदरम्यान ब्रह्मनाद टाळी सात दिवस सुरू राहते.गावातील हनुमान मंदिरात घटस्थापनेच्या दिवशी घटपूजा करून अखंडटाळीला सुरुवात होते. ती अखंडटाळी रात्रंदिवस सतत सुरू राहणार, यासाठी गावकºयांचे काही गट पाळण्यात आले आहेत. त्यांचे वेळापत्रक तयार करून संबंधित गटाला देण्यात आले आहेत. त्यानुसार प्रत्येक गटाला स्वयंस्पूर्तीने अखंडटाळीसाठी तीन तासांचा वेळ ठरवून दिलेला आहे. तो गट आपल्या वेळेला उपस्थित राहून सेवा देत आहे. अखंडनाद टाळीसाठी गावकºयांसोबतच जवळपासच्या परिसरातील डोंगरगाव (हलबी), चिखली, रिठ, नैनपूर, देसाईगंज, पिंपळगाव (हलबी), पोटगाव येथील भजन मंडळी सुद्धा उपस्थित राहून अखंडटाळ देत आहेत. बाहेर गावावरून आलेल्या भजन मंडळीचे गावकरी व मंदिर समितीतर्फे आदरातीथ्य करण्यात येते. दररोज सायंकाळच्या सुमारास गावातील आबालवृद्ध मंदिरात एकत्र येतात. त्यामुळे एकात्मतेचे दर्शन घडते. बुधवारी या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. सात दिवस अखंडटाळ, भजन राहत असल्याने गावात धार्मिक वातावरण निर्माण होण्यास मदत होत आहे.याबाबत इतर गावांमध्ये शंकरपटाचे आयोजन केले जायचे. त्यानिमित्त पाहुणे मंडळी एकत्र येऊन वधू-वर पाहणी केली जात होती. अखंडटाळ हा आमच्या गावातील वर्षभरातील सर्वात मोठा उत्सव आहे. यानिमित्त बाहेरगावची पाहुणे मंडळी, मुली, जावई व गावातील नोकरीवर असणारे युवक यानिमित्ताने गावात येतात. यानिमित्ताने वर्षाची किमान एकदातरी भेटीगाठी होतात. त्यामुळे स्नेहाचे संबंध कायम राहण्यास मदत होते. या उत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमाला विशेष महत्त्व आहे. ही परंपरा आमची नवीन पिढी पुढेही चालू ठेवले.-कैलास पारधी,सरपंच, मोहटोला

टॅग्स :Navratriनवरात्री