शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
6
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
7
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
8
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
9
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
10
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
11
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
12
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
13
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
14
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
15
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
16
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
17
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
18
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
19
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
20
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO

बेचव भाजी व कच्ची पोळी लोकांच्या माथी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 05:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क एटापल्ली : येथील विलगीकरणातील असुविधा व जेवण याबाबत लोकांनी अनेकदा प्रशासनाकडे तक्रारी केल्या. थातुरमातूर व्यवस्था करून ...

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : येथील विलगीकरणातील असुविधा व जेवण याबाबत लोकांनी अनेकदा प्रशासनाकडे तक्रारी केल्या. थातुरमातूर व्यवस्था करून वेळ मारून नेण्याचे काम प्रशासनाने केले. मात्र ठोस उपाययोजना केल्या नाही. सध्या येथील विलगीकरण कक्षात लोकांना अर्धवट शिजलेली पोळी, बेचव भाजी, हलक्या प्रतीच्या तांदळाचा भात जेवणात दिला जात आहे. मात्र या प्रकाराकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे.एटापल्ली येथील विलगीकरण कक्षातील असुविधांबाबत अनेकदा नागरिकांनी आंदोलन केले. तसेच सोशल मीडियावर फोटो व व्हिडीओ व्हायरल करून लक्ष वेधले होते. दरम्यान आयटीआयमधील विलगीकरण कक्ष बदलून आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहात लोकांची व्यवस्था केली होती. तक्रारीनंतर जेवणात सुद्धा सुधारणा होईल, अशी अपेक्षा कक्षातील नागरिकांना होती. मात्र यात कुठल्याच प्रकारची सुधारणा झाली नाही. सध्या नागरिकांना हलक्या प्रतीच्या तांदळाचा भात अर्धवट शिजलेली पोळी, बेचव भाजी अशा प्रकारचे जेवण दिले जात आहे. मात्र नाईलाजास्तव काही नागरिक कक्षात मिळणारे जेवण घेत आहेत. तर अनेकजण स्वत:च्या घरून जेवणाचा डब्बा मागवत आहेत. योग्य जेवण द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. १६ जुलैला सायंकाळच्या सुमारास नागरिकांना अशाच प्रकारचे बेचव जेवण देण्यात आले, अशी तक्रार येथील नागरिकांनी केली. तसेच जेवणाच्या थाळीचे फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल सुद्धा केले.घरच्या डब्ब्यांमुळे कोरोनाचा धोकाएटापल्ली येथील विलगीकरण कक्षात लोकांना योग्य दर्जाचे जेवण मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे अनेकजण घरून जेवणाचे डब्बे मागवत आहेत. विलगीकरण कक्षातील व्यक्ती पॉझिटीव्ह आढळून आल्यास संपर्कात येणाºया लोकांनाही त्याचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे कक्षातच उत्कृष्ट जेवणासाठी निविदा काढावी, अशी मागणी नागरिकांनी तालुका प्रशासनाकडे केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या