शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

अल्टीमेटम संपला, खड्डे कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 00:35 IST

गडचिरोली जिल्ह्यातील २० टक्के रस्त्यांवर अजुनही खड्डे कायम असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीवरून दिसून येते.

ठळक मुद्दे२७६ किमी मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य : १०७६ किमी रस्त्यांची बांधकाम विभागाने केली दुरूस्ती

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील २० टक्के रस्त्यांवर अजुनही खड्डे कायम असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीवरून दिसून येते.जिल्ह्यात १०४१.२१ किमीचे राज्य मार्ग आहेत. त्यापैकी ६८२.०३ किमी मार्गावर खड्डे पडले होते. बांधकाम विभागाने ५७९.७३ किमीवरील खड्डे बुजविले आहेत. खड्डे बुजविण्याचे प्रमाण ८५ टक्के आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील ८६१.१२ किमीच्या प्रमुख जिल्हा मार्गापैकी ६७१.१२ किमी मार्गावर खड्डे पडले होते. त्यातील ४९६.६२ किमी मार्गावरील खड्डे बुजविण्यात आले. जिल्हा मार्गावरील खड्डे बुजविण्याचे प्रमाण ७४ टक्के आहे. दोन्ही मार्गावरील खड्डे मिळून ८० टक्के खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण झाले आहे. दोन्ही मार्गाचे मिळून २० टक्के काम शिल्लक आहे. एकूण २७६.३६ किमी मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य कायम आहे.रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी राज्य शासनाने सुमारे २१ कोटी ६ लाख ६९ हजार रूपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यापैकी सार्वजनिक बांधकाम विभागाने ५ कोटी २६ लाख ७० हजार रूपये खड्डे बुजविण्यावर खर्च केले आहेत. राज्य शासनाने दिलेल्या आश्वासनानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाला निधीची कमतरता पडू दिली नाही. मात्र गडचिरोली जिल्ह्यात सुमारे १५ दिवस चाललेल्या नक्षल घटना व बंदमुळे कामाला गती मिळाली नाही. परिणामी बांधकाम विभागाला दिलेल्या अल्टीमेटममध्ये काम पूर्ण होऊ शकले नाही. ही बाब मान्य असली तरी पुढील १५ दिवसात खड्डेमुक्त रस्ते तयार करण्याचे आव्हान बांधकाम विभागासमोर आहे. अधिवेशनादरम्यान बांधकाम विभागाच्या खड्ड्यांचा आढावा घेतला गेला. कामाला गती मिळण्याची आशा आहे.नक्षल सप्ताहामुळे कामात अडचणगडचिरोली जिल्हा नक्षलदृष्ट्या संवेदनशील आहे. ७ ते १३ नोव्हेंबर व २ ते ८ डिसेंबर या कालावधीत नक्षल्यांनी बंदचे आवाहन केले होते. या कालावधीत नक्षल्यांकडून जाळपोळ करण्याच्या घटना घडत असल्याने कंत्राटदार या कालावधीत काम करण्यास तयार नव्हते. परिणामी १५ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील खड्डे बुजविण्याचे काम १०० टक्के पूर्ण होऊ शकले नाही, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रदीप खवले यांनी लोकमत प्रतिनिधीशी बोलताना दिली.राष्ट्रीय महामार्गावरही खड्डेगडचिरोली जिल्ह्यातून जाणाºया प्रमुख चार मार्गांना केंद्र शासनाने राष्ट्रीय महामार्ग म्हणून जाहीर केले आहे. त्यामुळे या महामार्गाच्या देखभाल व दुरूस्तीची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे आली आहे. मात्र याही विभागाचे मार्ग दुरूस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. नवीन मार्ग बांधण्यासाठी आणखी चार ते पाच वर्षांचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत या मार्गांची डागडुजी करणे आवश्यक आहे. धानोरा ते मुरूमगाव व पुढे छत्तीसगडपर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या मार्गावरून छत्तीसगड राज्यातून अवजड वाहनांची नेहमी वर्दळ राहते. सिरोंचा तालुक्यातील सिरोंचा-अंकिसा-आसरअल्ली या मुख्य मार्गाची सुध्दा मोठी दुरवस्था झाली आहे. या मार्गाची दुरूस्ती करणे आवश्यक आहे.