शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

अल्टीमेटम संपला, खड्डे कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 00:35 IST

गडचिरोली जिल्ह्यातील २० टक्के रस्त्यांवर अजुनही खड्डे कायम असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीवरून दिसून येते.

ठळक मुद्दे२७६ किमी मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य : १०७६ किमी रस्त्यांची बांधकाम विभागाने केली दुरूस्ती

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील २० टक्के रस्त्यांवर अजुनही खड्डे कायम असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीवरून दिसून येते.जिल्ह्यात १०४१.२१ किमीचे राज्य मार्ग आहेत. त्यापैकी ६८२.०३ किमी मार्गावर खड्डे पडले होते. बांधकाम विभागाने ५७९.७३ किमीवरील खड्डे बुजविले आहेत. खड्डे बुजविण्याचे प्रमाण ८५ टक्के आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील ८६१.१२ किमीच्या प्रमुख जिल्हा मार्गापैकी ६७१.१२ किमी मार्गावर खड्डे पडले होते. त्यातील ४९६.६२ किमी मार्गावरील खड्डे बुजविण्यात आले. जिल्हा मार्गावरील खड्डे बुजविण्याचे प्रमाण ७४ टक्के आहे. दोन्ही मार्गावरील खड्डे मिळून ८० टक्के खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण झाले आहे. दोन्ही मार्गाचे मिळून २० टक्के काम शिल्लक आहे. एकूण २७६.३६ किमी मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य कायम आहे.रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी राज्य शासनाने सुमारे २१ कोटी ६ लाख ६९ हजार रूपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यापैकी सार्वजनिक बांधकाम विभागाने ५ कोटी २६ लाख ७० हजार रूपये खड्डे बुजविण्यावर खर्च केले आहेत. राज्य शासनाने दिलेल्या आश्वासनानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाला निधीची कमतरता पडू दिली नाही. मात्र गडचिरोली जिल्ह्यात सुमारे १५ दिवस चाललेल्या नक्षल घटना व बंदमुळे कामाला गती मिळाली नाही. परिणामी बांधकाम विभागाला दिलेल्या अल्टीमेटममध्ये काम पूर्ण होऊ शकले नाही. ही बाब मान्य असली तरी पुढील १५ दिवसात खड्डेमुक्त रस्ते तयार करण्याचे आव्हान बांधकाम विभागासमोर आहे. अधिवेशनादरम्यान बांधकाम विभागाच्या खड्ड्यांचा आढावा घेतला गेला. कामाला गती मिळण्याची आशा आहे.नक्षल सप्ताहामुळे कामात अडचणगडचिरोली जिल्हा नक्षलदृष्ट्या संवेदनशील आहे. ७ ते १३ नोव्हेंबर व २ ते ८ डिसेंबर या कालावधीत नक्षल्यांनी बंदचे आवाहन केले होते. या कालावधीत नक्षल्यांकडून जाळपोळ करण्याच्या घटना घडत असल्याने कंत्राटदार या कालावधीत काम करण्यास तयार नव्हते. परिणामी १५ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील खड्डे बुजविण्याचे काम १०० टक्के पूर्ण होऊ शकले नाही, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रदीप खवले यांनी लोकमत प्रतिनिधीशी बोलताना दिली.राष्ट्रीय महामार्गावरही खड्डेगडचिरोली जिल्ह्यातून जाणाºया प्रमुख चार मार्गांना केंद्र शासनाने राष्ट्रीय महामार्ग म्हणून जाहीर केले आहे. त्यामुळे या महामार्गाच्या देखभाल व दुरूस्तीची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे आली आहे. मात्र याही विभागाचे मार्ग दुरूस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. नवीन मार्ग बांधण्यासाठी आणखी चार ते पाच वर्षांचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत या मार्गांची डागडुजी करणे आवश्यक आहे. धानोरा ते मुरूमगाव व पुढे छत्तीसगडपर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या मार्गावरून छत्तीसगड राज्यातून अवजड वाहनांची नेहमी वर्दळ राहते. सिरोंचा तालुक्यातील सिरोंचा-अंकिसा-आसरअल्ली या मुख्य मार्गाची सुध्दा मोठी दुरवस्था झाली आहे. या मार्गाची दुरूस्ती करणे आवश्यक आहे.