शहरं
Join us  
Trending Stories
1
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्याचे फोनावर फोन
2
जर एखाद्या देशाने 'न्यूक्लियर' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
3
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
4
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
5
दहशतवाद नाहीसा करणारच! पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ जण ठार
6
मोदी आदमपूरला जाताच, शाहबाज शरीफांनाही मोह आवरेना! पाकिस्तानी सैन्याच्या टँकवर चढले अन् म्हणाले...
7
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
8
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
9
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
10
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
11
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
12
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
13
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
14
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
15
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
16
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
17
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
18
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
19
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
20
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?

विसोरा परिसरातील तलाव तुडुंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 01:27 IST

देसाईगंज तालुक्यातील विसोरा, शंकरपूर, कसारी, डोंगरमेंढा भागात सोमवार व मंगळवारी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे या भागातील तलाव, बोड्या तुडूंब भरल्या आहेत. त्याआधी १५-२० दिवसांपासून गायब झालेल्या पावसाने संकटात आलेल्या धानपीकाला नवसंजीवनी दिली आहे.

ठळक मुद्देमुसळधार पावसाचा परिणाम : अंतिम टप्प्यात पिकांना होणार उपयोग

लोकमत न्यूज नेटवर्कविसोरा : देसाईगंज तालुक्यातील विसोरा, शंकरपूर, कसारी, डोंगरमेंढा भागात सोमवार व मंगळवारी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे या भागातील तलाव, बोड्या तुडूंब भरल्या आहेत. त्याआधी १५-२० दिवसांपासून गायब झालेल्या पावसाने संकटात आलेल्या धानपीकाला नवसंजीवनी दिली आहे.विसोरा, शंकरपूर, कसारी गावांसह परिसरात आलेल्या पावसाच्या दमदार सरींनी धानाला चांगलीच उभारी मिळाली आहे. एकाएकी डोळ्यांना न दिसणारा, खूपच बारीक रेषेसमान असा जोर नसलेला, जमीन सुद्धा ओली न करणारा पाऊस गेल्या आठवड्याभरापूर्वी सुरू होता.जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून गेलेला पाऊस काल-परवापर्यंत जोर धरून पडत नव्हता. त्यामुळे धानपिकाचे काय होणार? या विचारात शेतकरी गुंतून गेला होता. रोवणी होऊन आता महिनाभराचा कालावधी झालेला असल्याने वर्तमान स्थितीत जोरदार पावसाची गरज होती. हवा तसा जोरदार पाऊस पडल्याने धानाच्या वाढीवर अनुकूल प्रभाव पडणार हे निश्चित. तरी बहुतेक काही क्षेत्रातील धानपिकाला अळी लागली आहे. त्याचा थेट परिणाम उत्पन्नावर पडणार अशी माहिती आहे.जुलैच्या २० तारखेला गाढव वाहनावरील पुष्य नक्षत्रात आलेला पाऊस गाढवासमान आळशी होऊन चक्क गायब झाला आणि २ आॅगस्टला संपला. आॅगस्ट ३ तारखेला घोड्यावर बसून आलेला आश्लेषा नक्षत्र घोड्याच्या धावेसारखा सुसाट येणार अशी आशा असतांना अखेर संपण्याच्या एक दिवसापूर्वी मुसळधार कोसळला. १६ आॅगस्टला आश्लेषा नक्षत्र संपला.१७ आॅगस्टपासून उंदीर वाहनाचा मेघा नक्षत्र सुरू झाला आहे. महिनाभरापूर्वी रजेवर गेलेल्या पावसाने परिसरातील जलसाठे शंभर टक्के भरणार की नाही याबाबत शंका निर्माण केली होती. परंतु २० आॅगस्टला पाऊस दमदार बरसल्याने विसोरा, शंकरपूर, कसारी येथील तलाव, बोड्या, नाले, रस्त्याकडेला असलेले खड्डे यांमध्ये पाणीच पाणी भरले आहे. पुन्हा १५ दिवसांनंतर पावसाची गरज भासणार आहे. 

टॅग्स :Rainपाऊस