शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

एनपीएस बंद करून जुनी पेन्शन द्या, कर्मचारी रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2021 05:00 IST

मागील १६ वर्षांच्या कालावधीत राज्यभरातील सुमारे १ हजार ६०० कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मात्र त्यांच्या कुटुंबाला डीसीपीएस व एनपीएस याेजनेंतर्गत काेणताही लाभ देण्यात आला नाही. मृतकाचे कुटुंब निवृत्ती वेतन,  ग्रॅज्र्युईटी आदी लाभापासून वंचित आहेत. इतरही काही अनुषंगिक लाभ अद्याप दिले गेलेले नाहीत.  एनपीएस पेन्शन योजना रद्द करून सर्वांना जुनी हक्काची पेन्शन योजना लागू करण्याची मागणी केली. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : महाराष्ट्र शासनाने राज्य कर्मचाऱ्यांना दिनांक १ नोव्हेंबर २००५ पासून परिभाषित अंशदान पेन्शन योजना (डीसीपीएस) लागू केली. सन २०१५ पासून या योजनेचे रूपांतर राष्ट्रीय पेन्शन योजनेत (एनपीएस) झाले. ही याेजना कर्मचाऱ्यांसाठी मारक असून ती बंद करून पूर्वी प्रमाणेच जुनी पेन्शन याेजना लागू करावी, या मागणीसाठी जिल्हाभरातील कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयासमाेर ठिय्या आंदाेलन केले. मागील १६ वर्षांच्या कालावधीत राज्यभरातील सुमारे १ हजार ६०० कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मात्र त्यांच्या कुटुंबाला डीसीपीएस व एनपीएस याेजनेंतर्गत काेणताही लाभ देण्यात आला नाही. मृतकाचे कुटुंब निवृत्ती वेतन,  ग्रॅज्र्युईटी आदी लाभापासून वंचित आहेत. इतरही काही अनुषंगिक लाभ अद्याप दिले गेलेले नाहीत.  एनपीएस पेन्शन योजना रद्द करून सर्वांना जुनी हक्काची पेन्शन योजना लागू करण्याची मागणी केली. जिल्हाधिकारी कार्यालयासमाेरचे आंदाेलन अखिल भारतिय राज्य कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले यांचे नेतृत्वात करण्यात आले. यावेळी जिल्हा महासंघाचे जिल्हाध्यक्ष रतन शेंडे, सरचिटणीस दुधराम रोहनकर, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील चडगुलवार, सरचिटणीस भास्कर मेश्राम, ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष कविश्वर बनपुरकर, सरचिटणीस दामोधर पटले, कोषाध्यक्ष खुशाल नेवारे, श्रीकृष्ण मंगर, जिल्हा परिषद लिपिक वर्गीय संघटनेचे सचिव फिरोज लांजेवार, कोषाध्यक्ष अखिल श्रीरामवार, नर्सेस संघटनेच्या अध्यक्ष निलू वानखेडे, आशा कोकोडे, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष लतिफ पठाण, सचिव किशोर सोनटक्के, जिल्हा परिषद चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष गजानन ठाकरे, सचिव राजू रेचनकर, जि.प.महिला कर्मचारी समितीचे अध्यक्ष कविता साळवे, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष गुरुदेव नवघडे, सरचिटणीस बापू मुनघाटे,पांडुरंग पेशने आदी उपस्थित हाेते. 

या आहेत प्रमुख मागण्या

अनेक राज्यांनी जुनी पेन्शन योजना सर्वांना लागू करण्याची शिफारस विधिमंडळाच्या ठरावासह केंद्र शासनाला सादर केली आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनानेसुद्धा अशा शिफारशीसह प्रस्ताव केंद्र शासनाकडे तत्काळ सादर करावा.एनपीएसधारक कर्मचाऱ्यांना सद्य:स्थितीत केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे अनुज्ञेय असलेले लाभ द्यावेत.शासनाकडून मिळणाऱ्या १४ टक्के अंशदान रकमेची वजावट आयकरासाठी एकूण वार्षिक उत्पन्नातून अनुज्ञेय करावी.१ नोव्हेंबर २००५ पूर्वी निवड झाल्या, परंतु उशिराने नियुक्ती आदेश मिळालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. 

चामोर्शी तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलनजुनी पेन्शन याेजना लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी चामार्शी तालुक्यातील कर्मचाऱ्यांनी चामोर्शी तहसील कार्यालय येथे ठिय्या आंदोलन केले. आंदाेलनात मंडळ अधिकारी तारेश फुलझेले, के. पी. शेरकी, डी. के. वाडके, किशोर येरगुडे, एस. पी. शेख, बी. झेड झुरे, वंदना पेशट्टीवार,. गौरव भांडेकर, विराज वासेकर, विलास निरगुळे, पुरण कुमरे, गणेश कुंभारे, विवेक नैताम, एस. ए. ठाकूर, निमेश तोडसाम, महेश मडावी, नागेश्वर रांपजी, रोहित भादेकर, व्ही. आर. वगरकर,  देवांगणा सहारे, लीना मेश्राम, महादेव झाडे, अमोल गेडाम, सावण कुळसंगे, कुणाल वानखेडे, अमोल मंगर, आनंद वाढई, चव्हाण, सुनील दुधबावरे, एम. ए. कोठारे, योगिता मडावी आदी उपस्थित हाेते.

 

टॅग्स :Pensionनिवृत्ती वेतन