शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
2
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
3
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
4
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
5
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
6
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
7
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
8
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
9
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
10
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
11
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
12
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
13
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
14
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
15
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
16
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
17
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
18
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
19
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
20
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं

आदिवासींनी हक्कांसाठी लढा द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 22:31 IST

जल, जंगल व जमिनीवर आदिवासींची मालकी आहे. मात्र, भांडवलवादी व्यवस्थेत या मालकी हक्कावरच गदा आणण्याचे प्रयत्न होत आहे. त्यामुळे समस्त आदिवासी, दलित व बहुजनांनी एकत्र येऊन जल, जंगल व जमिनीसाठीचा संघर्ष बुलंद करावा, .....

ठळक मुद्देआलकन्हार येथे चर्चासत्र : ४० ग्रामसभांमधील नागरिक उपस्थित

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जल, जंगल व जमिनीवर आदिवासींची मालकी आहे. मात्र, भांडवलवादी व्यवस्थेत या मालकी हक्कावरच गदा आणण्याचे प्रयत्न होत आहे. त्यामुळे समस्त आदिवासी, दलित व बहुजनांनी एकत्र येऊन जल, जंगल व जमिनीसाठीचा संघर्ष बुलंद करावा, असे आवाहन विविध वक्त्यांनी केले.धानोरा तालुक्यातील पेंढरी परिसरातील आलकन्हार येथे ग्रामसभा आणि झाडापापडा पारंपरिक इलाका गोटूल समितीच्या वतीने राष्ट्रीय पेसा दिनानिमित्त गुरुवारी चर्चासत्र आणि क्रीडा महोत्सवाचे आयोजन होते, यावेळी उद्घाटनाच्या वेळी वक्त्यांनी संघर्षांचा सूर आळवला. या चर्चासत्राला ४० ग्रामसभांमधील नागरिक १२ पारपंरिक इलाक्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.यावेळी झाडापापडा पारंपरिक इलाक्याचे मांझी तानूजी गावडे, आलकन्हारचे भूमिया राजू गावडे, काशिराम नरोटे, अलसू नरोटे, सोमजी करंगामी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. सुरुवातीला गोंडी निसर्ग धर्माच्या झेंड्याचे पूजन करण्यात आले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून जि.प.सदस्य सैनू गोटा, अँड. लालसू नोगोटी, श्रीनिवास दुल्लमवार, भामरागड पं.स.सभापती सुकराम मडावी, पं.स.सदस्य शीला गोटा, रोशनी पवार, जयश्री वेळदा, रामदास जराते, छत्तीसगडच्या किरंगल परगण्याचे गोविंद वालको, लक्ष्मीकांत बोगामी, बावसू पावे उपस्थित होते.गोविंद वालको यांनी पेसा कायद्याविषयी विस्तृत माहिती दिली. अ‍ॅड.लालसू नोगोटी व सैनू गोटा यांनी जल, जंगल व जमिनीवर मूळ निवासींचा अधिकार असून, त्यासाठी सर्वांनी संघर्ष करण्याची तयारी ठेवावी, असे आवाहन केले. खाणीमुळे निसर्गाला धोका असून, पर्यावरणाचा ºहास होतो. त्यामुळे आपला खाणींना विरोध असल्याचेही ते म्हणाले. जि.प.सदस्य श्रीनिवास दुलमवार यांनीही आदिवासी संस्कृती श्रेष्ठ असल्याचे सांगून पेसा कायद्याच्या अंमलबजावणीची मागणी केली. कार्यक्रमासाठी बारसाय दुगा, वसंत पोटावी, देवू नरोटे, देवसाय आतला, मसरु तुलावी आदींनी सहकार्य केले.पेसा कायदा आदिवासींच्या हिताचारामदास जराते यांनी काही लोक आदिवासींवर हिंदुत्व लादण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगून हा प्रयत्न हाणून पाडावा, असे आवाहन केले. पेसा कायद्यामुळे गावे समृद्ध होत आहेत. त्यामुळे नागरिकांनी ग्रामसभांच्या माध्यमातून गावाचा विकास करावा, असे आवाहन जराते यांनी केले. जयश्री वेळदा यांनी पेसा कायदा आदिवासींच्या हिताचा असून, प्रशासनाने या कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली.