शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

एटापल्लीत आदिवासींचे उपोषण

By admin | Updated: October 27, 2015 01:38 IST

जनहितवादी युवा समिती व अहेरी जिल्हा कृती समिती एटापल्ली यांच्या नेतृत्वात एटापल्ली तालुक्यातील आदिवासी

एटापल्ली : जनहितवादी युवा समिती व अहेरी जिल्हा कृती समिती एटापल्ली यांच्या नेतृत्वात एटापल्ली तालुक्यातील आदिवासी महिलांनी विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर सोमवारपासून साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच राहील, असा इशारा देण्यात आला आहे. ग्रामसभेचे ठराव व इतर आवश्यक कृत्यांची पूर्तता करूनही प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे २००८ पासूनचे वनहक्क मंजूर करण्यात आले नाही. तिन्ही समित्यांमधील अधिकारी यांच्यात समन्वय घडवून आणणे आवश्यक आहे. यासाठी जनहितवादी युवा समितीच्या वतीने अनेकवेळा रस्ता रोखो, जेलभरो, धरणे आंदोलन, मोर्चे काढण्यात आले. मात्र आश्वासनांच्या पलीकडे प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नाही. सदर वनहक्क दावे तत्काळ निकाली काढावे. डुम्मे व तुमरगुंडा येथील वनहक्क दावेदारांच्या पात्र शेतींचे जीपएसने मोजणी करावी, वनहक्क प्रदान करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना शिटप्रमाणे सातबारा द्यावा, दावेदाराचे नाव इतर कॉलममध्ये न टाकता भूमीस्वामी भोगवटदारमध्ये त्याचा समावेश करावा, एटापल्ली शहराला रोज पाणीपुरवठा करण्यात यावा, बांडे नदीवर टँक बसवून पाईपलाईनने पाणीपुरवठा करावा, एटापल्ली येथे क्रिडांगणासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, व्यायामशाळा उपलब्ध करून द्यावी, जिल्हास्तरीय वैयक्तिक व सामूहिक वनहक्क दाव्यांवर त्वरित प्रक्रिया करून आंदोलनकर्त्यांना वनहक्क प्रदान करावे आदी मागण्यांसाठी सोमवारपासून साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. आंदोलनाचे नेतृत्व जनहितवादी युवा समिती एटापल्लीचे संयोजक सुरेश बारसागडे, अहेरी जिल्हा निर्माण समितीचे राजू गोटा करीत आहेत. याच मागण्यांसाठी यापूर्वीही अनेकवेळा आंदोलन करण्यात आले आहे. मात्र मागण्या पूर्ण झाल्या नाही. त्यामुळे आताचे आंदोलन मागण्या मान्य होईपर्यंत चालू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रशासनाचीही तारंबळ उडाली आहे. मागण्यांचे निवेदन तहसीलदार संपत खलाटे यांना देण्यात आले व त्यांच्यासोबत विविध मुद्यांवर सुरेश बारसागडे व शिष्टमंडळाने चर्चा केली. या चर्चेदरम्यान तालुकास्तरावरील समस्या तत्काळ सोडविल्या जातील व इतर मागण्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन दिले. (प्रतिनिधी)