शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

राज्यघटनेमुळे आदिवासींचा विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 23:56 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आदिवासी समाजासाठी जे काम केले, त्याची परतफेड, उपकार आदिवासी समाज फेडू शकत नाही. आदिवासींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आंबेडकरांनी घटनेत तशी तरतूद करून ठेवली.

ठळक मुद्देमान्यवरांचा सूर । कोटगूल येथे बाबासाहेबांची जयंती साजरी

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आदिवासी समाजासाठी जे काम केले, त्याची परतफेड, उपकार आदिवासी समाज फेडू शकत नाही. आदिवासींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आंबेडकरांनी घटनेत तशी तरतूद करून ठेवली. त्यामुळेच आज हा समाज विविध प्रकारच्या योजनांचा लाभ घेत आहे. पण खेदाची बाब अशी की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आदिवासी समाज कार्यक्रमात येत नाही, अशी खंत सरपंच राजेश नैताम यांनी व्यक्त केली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंती निमित्ताने कोटगूल येथे गुरूवार १८ एप्रिलला कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतापसिंह गजभिये होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून नसिर जुमन शेख, डॉ.महेश कोपूलवार, जगदीश बद्रे, मुख्याध्यापक शालीकराम कराडे, मुख्य अतिथी म्हणून कोटगूलचे सरपंच राजेश नैताम, पत्रकला जनबंधू, सुदाराम सहारे, नकूल सहारे, लालचंद जनबंधू, पांडूरंग उंदीरवाडे उपस्थित होते. जगदीश बद्रे यांनी समाजात पसरलेल्या अंधश्रद्धा कशा दूर करता येईल, त्यामुळे समाज कसा गरीब झाला, हे सांगून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. डॉ. महेश कोपूलवार, नसिर शेख, शालीकराम कराडे, पत्रकला जनबंधू, सुदाराम सहारे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी होण्यासाठी अंताराम टेंभूर्णे, बिरसिंग उमरे, अनिल जनबंधू, कंथलाल टेंभूर्णे, चंद्रशेखर उमरे, राकेश राहुल, वीरेंद्र टेंभूर्णे, यशवंत नंदेश्वर व समाजबांधवांनी सहकार्य केले.अंधश्रद्धा समाजासाठी घातकचविज्ञानाने विविध क्षेत्रात प्रगती झाली. अनेक महापुरूषांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कार्य केले. तरी सुद्धा समाजात अंधश्रद्धा पाळली जाते. अंधश्रद्धा समाजासाठी घातक असून समाज विकसित होऊ शकत नाही. पारंपरिक अंधश्रद्धा व रितीरिवाजात तो गुरफटतो. त्याची आर्थिक प्रगतीही खुंटते. त्यामुळे नागरिकांनी अंधश्रद्धा पाळू नये. ती दूर करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असा सूर उपस्थित मान्यवरांनी कार्यक्रमादरम्यान काढला. तसेच बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर मार्गदर्शन केले.

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती