शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
5
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
6
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
7
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
8
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
9
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
10
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
11
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
12
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
13
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
14
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
15
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
16
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
17
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

आदिवासींच्या संस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे - डाॅ. प्रा. स्ट्रीमलेट डखार

By दिलीप दहेलकर | Updated: April 17, 2023 12:07 IST

विविध ठरावांनी आदिवासी महिला साहित्य संमेलनाचे वाजले सूप

गडचिराेली : पुरुषांच्या पाठिंब्याशिवाय महिलांची प्रगती शक्य नाही. महिलासाहित्य संमेलनात पुरुषांचा सहभाग व याेगदान जास्त आहे, हे काैतुकास्पद आहे. आदिवासी संस्कृतीमध्ये सामूहिक हित व एकतेची भावना आहे. ही संस्कृती जतन व संवर्धन करण्याची आवश्यकता आहे.

गडचिराेलीची आदिवासी संस्कृती मी मेघालयात नेणार, असे प्रतिपादन मेघालयच्या ज्येष्ठ साहित्यिका डाॅ. प्रा. स्ट्रीमलेट डखार यांनी केले.

येथे दाेन दिवसीय आदिवासी महिला पहिल्या साहित्य संमेलनाचे सूप रविवारी वाजले. समाराेपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून त्या बाेलत हाेत्या. यावेळी मंचावर उद्घाटक ज्येष्ठ साहित्यिका नजू गावित, माजी आमदार हिरामण वरखडे, पत्रकार राेहिदास राऊत, संयाेजिका कुसुम अलाम, अशाेक चाैधरी, निकाेलस, अंजुमन शेख, कुसुम राऊत आदी उपस्थित हाेते. प्रा. डखार पुढे म्हणाल्या, गडचिराेलीत झालेले हे पहिले आदिवासी साहित्य संमेलन विविध अंगांनी चांगले झाले. अशाप्रकारचे साहित्य संमेलन प्रत्येक जिल्ह्यात व राज्यात झाले पाहिजे तसेच आदिवासींच्या अभ्यासाचा विस्तार झाला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी अशाेक चाैधरी यांच्यासह इतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

संमेलनात पारित केलेले ठराव

सर्व आदिवासींच्या विकासाच्या दृष्टिकाेनातून विविध ठराव सर्वानुमते पारित करण्यात आले. यामध्ये गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी जनसमुदाय मोठ्या संख्येने असून, त्यांची स्वतंत्र जनगणना व्हावी व शासनाने स्वतंत्र जनगणना करावी, असा ठराव पारित करण्यात आला.

गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाला साहित्य, संशोधन, कला व सांस्कृतिक विद्यापीठ म्हणून दर्जा प्रदान करण्यात यावा आणि हे विद्यापीठ आदिवासी संशोधन केंद्र म्हणून संबोधले जावे.

गडचिरोली जिल्हा मुख्यालयात आदिवासी विधवा महिलांसाठी सर्व साेयीसुविधांयुक्त विरंगुळा व मनोरंजन केंद्र तथा कलाकौशल्य केंद्र शासनातर्फे निर्माण व्हावे.

गडचिरोलीत आदिवासी संग्रहालय निर्माण करावे यामध्ये विविध वस्तू, साहित्य, हस्तलिखिते, ग्रंथ, आदिवासींच्या इतिहासाचे संदर्भग्रंथ, परंपरागत वस्तू, वाद्यप्रकार, कलाप्रकारातील वस्तू आदी सुरळीत राहतील.

सुरजागड लोह खनिजाचे भांडवलदारांकडून हाेणारे नैसर्गिक साधनसंपत्तीचे शोषण व दोहन थांबविणे व आदिवासींच्या वन हक्काबाबत व त्यांच्या अधिकाराचे संवर्धन करणे.

पेसा कायद्यांतर्गत आदिवासींचे हक्क अबाधित राहावे. नैसर्गिक साधनसंपत्तीचे दोहन थांबविण्यासाठी अनुसूची ६ मध्ये सुधारणा अमेंडमेंट करणे व आदिवासी क्षेत्राला स्वतंत्र दर्जा देणे तथा गडचिरोली जिल्ह्याला विशेष दर्जा द्यावा, असाही ठराव पारित करण्यात आला.

टॅग्स :literatureसाहित्यWomenमहिला