शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

वृक्ष तपासणीचे मानधन रखडले

By admin | Updated: April 10, 2015 01:12 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत लागवड करण्यात आलेली वृक्ष जीवंत आहेत की नाही, ....

अरूण राजगिरे कोरेगाव/चोपमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत लागवड करण्यात आलेली वृक्ष जीवंत आहेत की नाही, याबाबतची तपासणी मोहीम आॅगस्ट महिन्यात राबविण्यात आली होती. या मोहिमेला आठ महिन्यांचा कालावधी उलटूनही अजूनपर्यंत मानधन मिळाले नाही. त्यामुळे विद्यार्थी व शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. ग्राम पंचायत व नागरिकांना प्रोत्साहित करण्यासाठी शासनाने शतकोटी वृक्षलागवड योजना सुरू केली. या योजनेंतर्गत रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून दरवर्षी झाडे लावण्यात येत आहेत. वृक्षलागवडीसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येत असले तरी लागवड झालेल्या वृक्षांपैकी नेमके किती वृक्ष जीवंत आहेत, याचा काहीही अंदाज नव्हता. काही ग्राम पंचायतींनी वृक्षांची लागवड न करताच अनुदान हडप केल्याच्या बाबी संपूर्ण राज्यात उघडकीस आल्या होत्या. अनुदानाचा दुरूपयोग टाळण्यासाठी शासनाने मागील वर्षी आॅगस्ट महिन्यात तपासणी मोहीम सुरू केली. या मोहिमेसाठी माध्यमिक विद्यालयातील हरितसेनेचे शिक्षक व इयत्ता नवव्या वर्गातील दोन विद्यार्थी यांचा समावेश होता. यासाठी शिक्षकांना प्रतिदिवस २०० रूपये व विद्यार्थ्यांना प्रतिदिवस १०० रूपये प्रमाणे मानधन देण्यात येणार होते. एका ग्राम पंचायतीची दोन ते तीन दिवस तपासणी करण्यात आली. विशेष म्हणजे शालेय कालावधी वगळून हे काम शाळा संपल्यावर व सुटीच्या दिवशी करण्यात आले. मात्र तपासणी होऊन नऊ महिन्यांचा कालावधी उलटूनही मानधन मिळाले नाही. त्यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.