शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

तथागत भगवान गौतम बुध्दाचा धम्म घराघरांत पोहोचवा

By admin | Updated: March 14, 2016 01:24 IST

१४ आॅक्टोबर १९५६ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. या घटनेला आता ६० वर्ष पर्ण होत आहेत.

भदन्त श्रीपाद यांचे आवाहन : बौद्ध धम्म परिषद; डॉ. आंबेडकर यांचे विचार समजून घेण्याची गरजगडचिरोली : १४ आॅक्टोबर १९५६ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. या घटनेला आता ६० वर्ष पर्ण होत आहेत. तथागत गौतम बुद्धाचा धम्म हा भारतातून श्रीलंका, जापान, कोरिया, चीन आदी देशात पोहोचला. त्यामुळेच या देशाचा विकास झाला. मात्र भारतात सर्वदूर हा धम्म पोहोचला नाही. भारताला समृद्ध, सशक्त व प्रगतशील करण्यासाठी बौद्ध धम्म घराघरात पोहोचवा, असे आवाहन अमरावतीचे भदन्त श्रीपाद यांनी केले. स्थानिक संस्कृती सांस्कृतिक भवनात रविवारी आयोजित बौद्ध धम्म परिषदेत ते मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भदन्त सत्यानंद महाथेरो होते. उद्घाटक म्हणून नागपुरचे डॉ. राजाभाऊ टाकसाळे, स्वागताध्यक्ष म्हणून डॉ. विजय रामटेके उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून छत्तीसगडचे माजी मंत्री छबीलाल रात्रे, अ‍ॅड. शांताराम उंदीरवाडे, विनय बांबोळे, सिद्धार्थ ढोके, प्रा. डॉ. राजकुमार शेंडे, दिवाकर बारसागडे, संतोष रामटेके, माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. राम मेश्राम, मुनिश्वर बोरकर, प्रफुल रामटेके, चांगदास मसराम तसेच भदन्त कृपाशरण महाथेरो, भदन्त सुमनवन्नो महाथेरो, भदन्त कुरूणाबोधी महाथेरो, भदन्त अभय आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना भदन्त श्रीपाद म्हणाले, बौद्ध भिख्खू संघाच्या वतीने सन २०१७ मध्ये दिल्ली येथे बुद्धगया मुक्ती आंदोलन करण्यात येणार आहे. त्यासाठी बौद्ध समाज बांधवांनी आतापासूनच जागृत होऊन आपला विकास, संस्कार व संस्कृतीच्या या लढाईत पूर्ण ताकदीनिशी उतरावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार मुनिश्वर बोरकर यांनी केले. या बौद्ध धम्म परिषदेला बहुसंख्य बौद्ध बांधव उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)पंचशील तत्त्वानुसार आचरण करातथागत गौतम बुद्धाचा धम्म हा शांतीचा धम्म आहे. या धम्मातून मागासलेल्या लोकांचा विकास करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठा संघर्ष केला. त्यांच्या संघर्षामुळे बौद्ध समाज बांधवांची सध्या काही प्रमाणात प्रगती झाली आहे. मात्र तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानुसार काही बौद्ध समाजबांधव आचरण करताना दिसून येत नाही. केवळ गोष्टी करतात. मात्र त्यांचे आचरण पंचशील तत्त्वानुसार राहत नाही. बोलण्यापेक्षा पंचशील तत्त्वानुसार प्रत्यक्ष जीवनात चारित्र्य, शीलवान आचरण ठेवा, असे आवाहन चंद्रपुरचे भदन्त धम्मचक्र यांनी केले.