शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
5
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
6
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
7
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
8
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
9
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
10
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
11
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
12
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
13
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
14
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
15
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
16
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
17
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
18
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
19
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
20
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र

तथागत भगवान गौतम बुध्दाचा धम्म घराघरांत पोहोचवा

By admin | Updated: March 14, 2016 01:24 IST

१४ आॅक्टोबर १९५६ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. या घटनेला आता ६० वर्ष पर्ण होत आहेत.

भदन्त श्रीपाद यांचे आवाहन : बौद्ध धम्म परिषद; डॉ. आंबेडकर यांचे विचार समजून घेण्याची गरजगडचिरोली : १४ आॅक्टोबर १९५६ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. या घटनेला आता ६० वर्ष पर्ण होत आहेत. तथागत गौतम बुद्धाचा धम्म हा भारतातून श्रीलंका, जापान, कोरिया, चीन आदी देशात पोहोचला. त्यामुळेच या देशाचा विकास झाला. मात्र भारतात सर्वदूर हा धम्म पोहोचला नाही. भारताला समृद्ध, सशक्त व प्रगतशील करण्यासाठी बौद्ध धम्म घराघरात पोहोचवा, असे आवाहन अमरावतीचे भदन्त श्रीपाद यांनी केले. स्थानिक संस्कृती सांस्कृतिक भवनात रविवारी आयोजित बौद्ध धम्म परिषदेत ते मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भदन्त सत्यानंद महाथेरो होते. उद्घाटक म्हणून नागपुरचे डॉ. राजाभाऊ टाकसाळे, स्वागताध्यक्ष म्हणून डॉ. विजय रामटेके उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून छत्तीसगडचे माजी मंत्री छबीलाल रात्रे, अ‍ॅड. शांताराम उंदीरवाडे, विनय बांबोळे, सिद्धार्थ ढोके, प्रा. डॉ. राजकुमार शेंडे, दिवाकर बारसागडे, संतोष रामटेके, माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. राम मेश्राम, मुनिश्वर बोरकर, प्रफुल रामटेके, चांगदास मसराम तसेच भदन्त कृपाशरण महाथेरो, भदन्त सुमनवन्नो महाथेरो, भदन्त कुरूणाबोधी महाथेरो, भदन्त अभय आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना भदन्त श्रीपाद म्हणाले, बौद्ध भिख्खू संघाच्या वतीने सन २०१७ मध्ये दिल्ली येथे बुद्धगया मुक्ती आंदोलन करण्यात येणार आहे. त्यासाठी बौद्ध समाज बांधवांनी आतापासूनच जागृत होऊन आपला विकास, संस्कार व संस्कृतीच्या या लढाईत पूर्ण ताकदीनिशी उतरावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार मुनिश्वर बोरकर यांनी केले. या बौद्ध धम्म परिषदेला बहुसंख्य बौद्ध बांधव उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)पंचशील तत्त्वानुसार आचरण करातथागत गौतम बुद्धाचा धम्म हा शांतीचा धम्म आहे. या धम्मातून मागासलेल्या लोकांचा विकास करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठा संघर्ष केला. त्यांच्या संघर्षामुळे बौद्ध समाज बांधवांची सध्या काही प्रमाणात प्रगती झाली आहे. मात्र तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानुसार काही बौद्ध समाजबांधव आचरण करताना दिसून येत नाही. केवळ गोष्टी करतात. मात्र त्यांचे आचरण पंचशील तत्त्वानुसार राहत नाही. बोलण्यापेक्षा पंचशील तत्त्वानुसार प्रत्यक्ष जीवनात चारित्र्य, शीलवान आचरण ठेवा, असे आवाहन चंद्रपुरचे भदन्त धम्मचक्र यांनी केले.