शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

तथागत भगवान गौतम बुध्दाचा धम्म घराघरांत पोहोचवा

By admin | Updated: March 14, 2016 01:24 IST

१४ आॅक्टोबर १९५६ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. या घटनेला आता ६० वर्ष पर्ण होत आहेत.

भदन्त श्रीपाद यांचे आवाहन : बौद्ध धम्म परिषद; डॉ. आंबेडकर यांचे विचार समजून घेण्याची गरजगडचिरोली : १४ आॅक्टोबर १९५६ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. या घटनेला आता ६० वर्ष पर्ण होत आहेत. तथागत गौतम बुद्धाचा धम्म हा भारतातून श्रीलंका, जापान, कोरिया, चीन आदी देशात पोहोचला. त्यामुळेच या देशाचा विकास झाला. मात्र भारतात सर्वदूर हा धम्म पोहोचला नाही. भारताला समृद्ध, सशक्त व प्रगतशील करण्यासाठी बौद्ध धम्म घराघरात पोहोचवा, असे आवाहन अमरावतीचे भदन्त श्रीपाद यांनी केले. स्थानिक संस्कृती सांस्कृतिक भवनात रविवारी आयोजित बौद्ध धम्म परिषदेत ते मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भदन्त सत्यानंद महाथेरो होते. उद्घाटक म्हणून नागपुरचे डॉ. राजाभाऊ टाकसाळे, स्वागताध्यक्ष म्हणून डॉ. विजय रामटेके उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून छत्तीसगडचे माजी मंत्री छबीलाल रात्रे, अ‍ॅड. शांताराम उंदीरवाडे, विनय बांबोळे, सिद्धार्थ ढोके, प्रा. डॉ. राजकुमार शेंडे, दिवाकर बारसागडे, संतोष रामटेके, माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. राम मेश्राम, मुनिश्वर बोरकर, प्रफुल रामटेके, चांगदास मसराम तसेच भदन्त कृपाशरण महाथेरो, भदन्त सुमनवन्नो महाथेरो, भदन्त कुरूणाबोधी महाथेरो, भदन्त अभय आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना भदन्त श्रीपाद म्हणाले, बौद्ध भिख्खू संघाच्या वतीने सन २०१७ मध्ये दिल्ली येथे बुद्धगया मुक्ती आंदोलन करण्यात येणार आहे. त्यासाठी बौद्ध समाज बांधवांनी आतापासूनच जागृत होऊन आपला विकास, संस्कार व संस्कृतीच्या या लढाईत पूर्ण ताकदीनिशी उतरावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार मुनिश्वर बोरकर यांनी केले. या बौद्ध धम्म परिषदेला बहुसंख्य बौद्ध बांधव उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)पंचशील तत्त्वानुसार आचरण करातथागत गौतम बुद्धाचा धम्म हा शांतीचा धम्म आहे. या धम्मातून मागासलेल्या लोकांचा विकास करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठा संघर्ष केला. त्यांच्या संघर्षामुळे बौद्ध समाज बांधवांची सध्या काही प्रमाणात प्रगती झाली आहे. मात्र तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानुसार काही बौद्ध समाजबांधव आचरण करताना दिसून येत नाही. केवळ गोष्टी करतात. मात्र त्यांचे आचरण पंचशील तत्त्वानुसार राहत नाही. बोलण्यापेक्षा पंचशील तत्त्वानुसार प्रत्यक्ष जीवनात चारित्र्य, शीलवान आचरण ठेवा, असे आवाहन चंद्रपुरचे भदन्त धम्मचक्र यांनी केले.