शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

बदली झालेल्या जि.प. कर्मचाऱ्यांना आता दुर्गम भागात जावे लागणार! ३१ मार्चपर्यंतचा अल्टिमेटम

By दिलीप दहेलकर | Updated: March 2, 2024 21:27 IST

भारमुक्त करण्याचे सीईओचे आदेश धडकले

दिलीप दहेलकर, गडचिराेली: शासनाच्या नियमानुसार जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने सर्वच विभागातील वर्ग ३ च्या कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया राबविण्यात आली. दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय व विनंती बदल्या करण्यात आल्या. मात्र, विविध अडचणी व कारण सांगून विभागप्रमुखांनी बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना भारमुक्त केले नाही. परिणामी बदली होऊनही अनेक कर्मचारी सुगम भागात दडून बसले आहेत. अशा कर्मचाऱ्यांना आता भारमुक्त करण्यात येत असून तसे सक्त आदेश जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काढले आहेत. बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत अडवून न ठेवता ३१ मार्च २०२४ पर्यंत संबंधित कार्यालयातून भारमुक्त करावे, असे जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आदेशात नमूद केले आहे.

काेराेना संकटाच्या काळात दाेन वर्षे बदली प्रक्रिया राबविण्यात आली नाही. कारण तशा शासनाच्या सूचना हाेत्या. काेराेनाचा काळ संपल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाच्या सन २०२२ आणि २०२३ या वर्षात कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. बदली झालेल्या ज्या कर्मचाऱ्यांना संबंधित विभाग प्रमुखांनी भारमुक्त केले, असे कर्मचारी बदलीच्या नवीन ठिकाणी रुजू झाले. मात्र, विविध कारणांमुळे बऱ्याचशा कर्मचाऱ्यांना भारमुक्त करण्यात आले नाही. परिणामी असे कर्मचारी अजूनही शहरी तसेच सुगम भागात सेवा देत आहेत. त्यामुळे दुर्गम भागातील कर्मचाऱ्यांची सुगम भागात बदली होऊनही रिलिव्हर न आल्याने त्यांना जुन्या आस्थापनेच्या ठिकाणी व कार्यालयात सेवा द्यावी लागत आहे. त्यामुळे कार्यालयातील ज्या कर्मचाऱ्यांची बदली झालेली आहे अशा कर्मचाऱ्यांना एक वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी जुन्या कार्यालयात ठेवू नये, असे आदेशात म्हटले आहे.

प्रशासकीय कामे खोळंबली

संदर्भीय शासन निर्णय दिनांक १५ मे २०१४ अन्वये जिल्हा परिषदेच्या गट- क व गट-ड मधील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे धोरण निश्चित करण्यात आलेले आहे. त्यानुसार गट-क मधील कर्मचाऱ्यांची सर्वसाधारण बदली प्रक्रिया दरवर्षी माहे मे मध्ये पार पाडण्यात येते. परंतु, सन २०२३ आणि त्यापूर्वी सर्वसाधारण बदली प्रकियेमध्ये बदली झालेल्या बऱ्याच कर्मचाऱ्यांना आजतागायत भारमुक्त करण्यात आलेले नाही. सर्वसाधारण बदल्यांमध्ये बदली झालेले कर्मचारी दिलेल्या पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू न झाल्यामुळे त्या कार्यालयातील प्रशासकीय कामे खोळंबलेली आहेत, असे जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.

खातेप्रमुखांवरही हाेणार कार्यवाही?

ज्या कर्मचाऱ्यांची बदली होऊन एक वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे, अशा कर्मचाऱ्यांकडील प्रभार इतर कर्मचाऱ्यांकडे सोपवून बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत अडवून न ठेवता ३१ मार्च २०२४ पर्यंत संबंधित कार्यालयातून भारमुक्त करावे. जे खातेप्रमुख / कार्यालयप्रमुख बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना ३१ मार्चपर्यंत भारमुक्त करणार नाही, त्यांच्या विरुद्ध उचित प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी फेब्रुवारी महिन्यात काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

कर्मचाऱ्यांची प्रशासकीय किंवा विनंती बदली झाली की, संबंधित कर्मचाऱ्यांना भारमुक्त करणे आवश्यक आहे. तशा सूचना सर्व विभागप्रमुखांना देण्यात आल्या आहेत. सीईओंचे नवे आदेश निघाल्यापासून अनेक खातेप्रमुखांनी कर्मचाऱ्यांना भारमुक्त करणे सुरू केले आहे. -शेखर शेलार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) जि.प. गडचिराेली.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली