शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

एटापल्ली तालुक्यात रेतीची तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 00:42 IST

तालुक्यात १५६ गावे आहेत. मात्र एकही रेतीघाटाचा लिलाव झाला नाही. परिणामी मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी सुरू असून यामुळे महसूल व वन विभागाचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान होत आहे. मात्र याकडे दोन्ही विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.

ठळक मुद्देएकही रेती घाट नाही : अनेक वर्षांपासून बुडत आहे शासनाचा महसूल

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : तालुक्यात १५६ गावे आहेत. मात्र एकही रेतीघाटाचा लिलाव झाला नाही. परिणामी मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी सुरू असून यामुळे महसूल व वन विभागाचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान होत आहे. मात्र याकडे दोन्ही विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.एटापल्ली तालुक्यातील ९० टक्के गाव जंगलाने व्यापली आहेत. या तालुक्यातील बहुतांश जमीन वन विभागाची असल्याने रेती घाट सुध्दा वन विभागाच्या अखत्यारित येतात. नदीमध्ये दरवर्षी रेती जमा होते. सदर रेतीचा लिलाव झाल्यास तालुक्यातील जनतेला अधिकृत रेती उपलब्ध होईल. मात्र तालुक्यात एकही रेती घाट अधिकृत नाही. दरवर्षी हजारो घरांचे बांधकाम केले जाते.आज प्रत्येक घर स्लॅबचे बांधण्याकडे नागरिकांचा ओढा आहे. यासाठी रेतीची गरज भासते. एकाही रेती घाटाचा लिलाव झाला नसतानाही नागरिकांना रेती उपलब्ध होत आहे. मात्र यासाठी दामदुप्पट किंमत द्यावी लागत आहे. रेतीचे ट्रॅक्टर पकडल्यास सदर ट्रॅक्टरवर एक लाख रूपयांचा दंड ठोठावला जातो. याचा गैरफायदा येथील रेती तस्करांकडून घेतला जात आहे. रेती आणणे धोक्याचे असल्याचे सांगून रेतीचे भाव वाढविले जात आहेत. सर्वच अवैध व्यवहार असल्याने यामध्ये कोणीही दखल घेण्यास तयार नाही.एटापल्ली तालुक्यात सुमारे १५६ गावे आहेत. या गावातील नागरिकांना अधिकृत रेती उपलब्ध करून देण्यासाठी रेती घाटांचा लिलाव होणे आवश्यक आहे. या माध्यमातून शासनाला महसूल उपलब्ध होईल. नागरिकांनाही वैध रेती मिळेल. मात्र अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने रेती घाटांचा लिलाव झाला नाही. परिणामी मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी सुरू आहे.एटापल्ली तालुक्यात वन विभागाचे शेकडो कर्मचारी व अधिकारी कार्यरत आहेत. मात्र त्यांच्याकडे कोणतीही कारवाई केली जात नाही. यावरून महसूल व वन विभागाचे या रेती तस्करीला समर्थन असल्याचे दिसून येत आहे. कोणतीही कारवाई होत नसल्याने दिवसेंदिवस रेती तस्करीचे प्रमाणही वाढत चालल्याचे दिसून येते आहे. याकडे वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :sandवाळू