शहरं
Join us  
Trending Stories
1
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
2
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
3
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
4
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
5
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
6
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
7
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
8
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
9
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
10
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
11
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
12
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
13
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
14
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
15
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
16
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
17
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
18
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
19
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
20
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका

एटापल्ली तालुक्यात रेतीची तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 00:42 IST

तालुक्यात १५६ गावे आहेत. मात्र एकही रेतीघाटाचा लिलाव झाला नाही. परिणामी मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी सुरू असून यामुळे महसूल व वन विभागाचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान होत आहे. मात्र याकडे दोन्ही विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.

ठळक मुद्देएकही रेती घाट नाही : अनेक वर्षांपासून बुडत आहे शासनाचा महसूल

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : तालुक्यात १५६ गावे आहेत. मात्र एकही रेतीघाटाचा लिलाव झाला नाही. परिणामी मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी सुरू असून यामुळे महसूल व वन विभागाचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान होत आहे. मात्र याकडे दोन्ही विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.एटापल्ली तालुक्यातील ९० टक्के गाव जंगलाने व्यापली आहेत. या तालुक्यातील बहुतांश जमीन वन विभागाची असल्याने रेती घाट सुध्दा वन विभागाच्या अखत्यारित येतात. नदीमध्ये दरवर्षी रेती जमा होते. सदर रेतीचा लिलाव झाल्यास तालुक्यातील जनतेला अधिकृत रेती उपलब्ध होईल. मात्र तालुक्यात एकही रेती घाट अधिकृत नाही. दरवर्षी हजारो घरांचे बांधकाम केले जाते.आज प्रत्येक घर स्लॅबचे बांधण्याकडे नागरिकांचा ओढा आहे. यासाठी रेतीची गरज भासते. एकाही रेती घाटाचा लिलाव झाला नसतानाही नागरिकांना रेती उपलब्ध होत आहे. मात्र यासाठी दामदुप्पट किंमत द्यावी लागत आहे. रेतीचे ट्रॅक्टर पकडल्यास सदर ट्रॅक्टरवर एक लाख रूपयांचा दंड ठोठावला जातो. याचा गैरफायदा येथील रेती तस्करांकडून घेतला जात आहे. रेती आणणे धोक्याचे असल्याचे सांगून रेतीचे भाव वाढविले जात आहेत. सर्वच अवैध व्यवहार असल्याने यामध्ये कोणीही दखल घेण्यास तयार नाही.एटापल्ली तालुक्यात सुमारे १५६ गावे आहेत. या गावातील नागरिकांना अधिकृत रेती उपलब्ध करून देण्यासाठी रेती घाटांचा लिलाव होणे आवश्यक आहे. या माध्यमातून शासनाला महसूल उपलब्ध होईल. नागरिकांनाही वैध रेती मिळेल. मात्र अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने रेती घाटांचा लिलाव झाला नाही. परिणामी मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी सुरू आहे.एटापल्ली तालुक्यात वन विभागाचे शेकडो कर्मचारी व अधिकारी कार्यरत आहेत. मात्र त्यांच्याकडे कोणतीही कारवाई केली जात नाही. यावरून महसूल व वन विभागाचे या रेती तस्करीला समर्थन असल्याचे दिसून येत आहे. कोणतीही कारवाई होत नसल्याने दिवसेंदिवस रेती तस्करीचे प्रमाणही वाढत चालल्याचे दिसून येते आहे. याकडे वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :sandवाळू