शहरं
Join us  
Trending Stories
1
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
2
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
3
अंधेरीतल्या परप्रांतीय युवकाची राज ठाकरेंना शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल, मनसे कार्यकर्ते संतापले
4
मुंबईत सरकारलाच मराठा आंदोलनात दंगल घडवायची आहे; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप
5
Pune Dog Attack Video: एकटं फिरायचं की नाही! अचानक 6-7 कुत्र्यांचा हल्ला; पिंपरीत कसा वाचला तरुण?
6
आशिया कप स्पर्धेवरुन संजय राऊतांनी पीएम मोदींना लिहिले पत्र; भारत- पाकिस्तान सामन्यावर विचारले प्रश्न
7
AC कोचच्या टॉयलेटमध्ये आढळला ५ वर्षीय मुलीचा मृतदेह; मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमधील खळबळजनक घटना
8
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला 'या' पाच चुका प्रत्येक गणेश भक्ताने टाळल्याच पाहिजेत!
9
कोकणवासीयांना गणपती पावला! मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस आता १६ कोचने धावणार, मागणी पूर्ण
10
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
11
अमेरिकन लोकांनाच फसवताहेत ट्रम्प! नियम बनवून आपलाच खजिना भरताहेत, ६ महिन्यांत केली ८६० कोटींची गुंतवणूक
12
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
13
मुंबईच्या रस्त्यावर नव्या लॅम्बोर्गिनीत दिसला रोहित शर्मा, किती आहे या Luxurious कारची किंमत? जाणून थक्क व्हाल!
14
Viral Video: 'ताल से ताल मिला' गाण्यावर शाळेतील सरांचा जबरदस्त डान्स, पाहून महिलाही झाल्या चकीत!
15
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
16
Pokerbaazi नं बंद केलं सर्व रियल मनी ऑनलाइन गेम्स; Nazara च्या शेअर्सची वाईट स्थिती
17
जुळ्या मुलांच्या जन्मानंतर अभिनेत्रीला पुन्हा होणार होते 'ट्विन्स', पण एकाचा झाला मृत्यू; भावुक पोस्ट
18
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
19
TikTok Ban: टिकटॉक खरंच भारतात पुन्हा सुरू होणार आहे का? केंद्र सरकारनेच दिलं उत्तर
20
Ganesh Chaturthi 2025: धर्मशास्त्रानुसार गणपती विसर्जनाचा योग्य दिवस कोणता? ते जाणून घ्या!

अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 23:27 IST

कोरची येथील मुख्य बाजार चौकाच्या परिसरात अनेक वाहने दिवसभर आवागमन करतात. मात्र रस्त्यालगतच्या दुकानदारांनी अतिक्रमण करून आपली दुकाने पुढे आणली आहेत.

ठळक मुद्देअरूंद रस्त्याने वाहतुकीची समस्या : दुकानदारांचे अतिक्रमण वाढल्याचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : कोरची येथील मुख्य बाजार चौकाच्या परिसरात अनेक वाहने दिवसभर आवागमन करतात. मात्र रस्त्यालगतच्या दुकानदारांनी अतिक्रमण करून आपली दुकाने पुढे आणली आहेत. परिणामी रस्ता अरूंद झाल्याने या परिसरात वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे येथील अतिक्रमण काढावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.कोरचीच्या बाजार चौकातून शासकीय आश्रमशाळा बोटेकसा व छत्तीसगडकडे जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात जड वाहने आवागमन करतात. मात्र रस्ते अरूंद असल्याने अनेकदा वाहतूक विस्कळीत होत असले. परिणामी नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. कोरची येथील आठवडी बाजार गुरूवारी असतो. आठवडी बाजाराच्या दिवशी तालुक्याच्या ग्रामीण भागातून हजारो लोक खरेदीसाठी येतात. तसेच कोरची येथे नगर पंचायत असल्याने कर्मचारीही मोठ्या प्रमाणात वास्तव्यास राहतात. दिवसेंदिवस लोकसंख्या वाढल्यामुळे कोरची शहरात वाहनांची संख्या वाढली आहे. मात्र रस्ते रूंद न झाल्याने वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न आणखीनच जटील झाला आहे.येथील अंतर्गत रस्त्यांचीही दुरवस्था झालेली आहे. काही ठिकाणच्या नाल्याही खचलेल्या आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने पाण्याचाही योग्य निचरा होण्यास अडचणी होतात. पाऊस आल्यानंतर रस्त्यावरून पाणी वाहते. स्थानिक प्रशासनाने येथील नाल्यांमध्ये नियमित फवारणी करावी, अशी मागणी होत आहे.बाजारासाठी अपुरी जागाबाजार भरविण्यासाठी जागा कमी पडत असल्याने लहान दुकानदार रस्त्यालगत आपली दुकाने लावतात. यामुळे रस्त अरूंद होऊन आवागमन करण्यास वाहनांना प्रचंड अडचण येते. आठवडी बाजाराच्या दिवशी कोरची येथील चौकातून विद्यार्थी व नागरिकांना योग्यरित्या आवागमनही करता येत नाही. त्यामुळे येथे नेहमी वाहतुकीची समस्या निर्माण होते. स्थानिक प्रशासनाने लक्ष घालून बाजारासाठी पर्यायी जागा उपलब्ध करावी, अथवा बायपास रस्त्याची व्यवस्था करावी. तसेच बाजाराच्या दिवशी वेगळया मार्गाने वाहतूक वळती करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.