शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर गडचिरोलीत २० वर्षांनंतर नक्षल सप्ताहात व्यापारपेठ राहणार खुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 14:41 IST

दहशत मोडीत : पोलिसांच्या आवाहनाला व्यापारी, नागरिकांचाही प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : नक्षलवाद्यांच्या हिंसक विचारसरणीविरोधात पोलिसांच्या सहकार्याने नागरिकांचा निर्धार बळावू लागला आहे. उत्तर गडचिरोलीतील व्यापाऱ्यांनी तब्बल दोन दशकांनंतर नक्षल सप्ताहात भीती झुगारून आपली दुकाने उघडली. २००६ मध्ये घडलेल्या हत्याकांडानंतर नक्षल सप्ताहात संपूर्ण व्यापारपेठ बंद ठेवली जात असे. मात्र, यंदा, २८ जुलैला पोलिसांच्या संरक्षणात व्यापाऱ्यांनी नक्षलींच्या दबावाला न जुमानता व्यवसाय सुरू ठेवत नवे साहस दाखविले.

हिंसक कारवायांची रणनीती निश्चित करून सुरक्षा यंत्रणांना आव्हान देण्यासाठी, तसेच मृत नक्षलवाद्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी नक्षली २८ जुलै ते ३ ऑगस्टदरम्यान सप्ताह पाळतात. २००६मध्ये याच कालावधीत उत्तर गडचिरोलीतील एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याची माओवाद्यांनी गोळ्या घालून निघृण हत्या केली होती. त्या घटनेनंतर नक्षल सप्ताहात स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परिणामी, नक्षल सप्ताहात व्यापारपेठ अनेक वर्षे याच काळात बंद ठेवली जात होती. मात्र, यंदा २८ जुलैला तब्बल २० वर्षांनंतर स्थानिक पोलिस प्रशासनाच्या पुढाकारामुळे आणि विश्वासार्हतेमुळे व्यापाऱ्यांनी पहिल्यांदाच नक्षल सप्ताहात दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला. 

नक्षलवादी बॅकफूटवरमागील वर्षीपासून नक्षल चळवळीतील प्रमुख जहाल नेते चकमकीत ठार झाले, अनेक माओवाद्यांनी आत्मसमर्पणसुद्धा केले. गडचिरोली पोलिसांच्या नक्षलविरोधी अभियानाला यश मिळत आहे. त्यामुळे सध्या नक्षलवादी बॅकफूटवर आहेत. उत्तर गडचिरोली नक्षलमुक्त झाल्याची घोषणा पोलिसांनी यापूर्वीच केलेली आहे.

नेमकी काय पार्श्वभूमी ?२००६ मध्ये कोरची शहरातील प्रतिष्ठित व्यापारी डॉ. प्यारेलाल अग्रवाल यांची दुकानात असताना दुपारी चार वाजण्याच्या सुमाराम नक्षल्यांनी बंदुकीने गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यानंतर २०१९ मध्ये कोरची शहरालगतच्या पकनापट्टी गावाजवळ रस्त्यालगत नक्षल्यांनी लावलेल्या बॅनरखाली भुसुरुंग स्फोट घडविला होता. बॅनर काढण्यास गेलेले कोरचीचे सहायक निरीक्षक अतुल तवाडे आणि एक हवालदार झालेल्या स्फोटात गंभीर जखमी झाले होते. यानंतर २०२३ मध्ये अतिदुर्गम नवेझरी गावातील एका व्यक्तीला पोलिसांच्या खबरी असल्याच्या संशयावरून नक्षल्यांनी रात्री हत्या केली होती. त्यामुळे नक्षल्यांच्या सप्ताहात व्यापारी दुकाने बंद ठेवत असत.

सुरक्षा यंत्रणांविरुद्ध कारवाया करण्यासाठी

  • नक्षली टीसीओसी (टॅक्टिकल काउंटर ऑफेन्सिव्ह कॅम्पेन) सप्ताहाचे आयोजन करतात. यंत्रणांना आव्हान देण्यासाठी हिंसक कारवाया करणे, अशी या सप्ताहामागची रणनीती असते.
  • जिल्ह्याच्या उत्तर दिशेवरील छत्तीसगड सीमेलगतच्या कोरची या आदिवासीबहुल तालुक्यात दरवर्षी नक्षल सप्ताहात दहशतीचे वातावरण असे.
  • यंदा मात्र २० वर्षापासूनची दहशत मोडीत काढण्यासाठी पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी पुढाकार घेतला. पोलिस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे यांनी नक्षल सप्ताहाच्या तीन दिवसांपूर्वी शहरातील व्यापाऱ्यांची सभा घेतली होती.
  • यात नक्षल सप्ताहात दुकाने व व्यापारपेठ सुरळीत सुरू ठेवावी, असे आवाहन करण्यात आले होते. पोलिसांच्या पुढाकाराने २८ रोजी सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी नक्षल्यांची दहशत नाकारत व्यापाऱ्यांनी उद्योग, व्यवसाय सुरळीत सुरू ठेवले. २० वर्षांनंतर पहिल्यांदाच नक्षल सप्ताहात नागरिकांची रेचलेच दिसून आली.

"कोरची येथील व्यापारी व नागरिकांनी दहशत झुगारत नवी सुरुवात केली आहे. त्यांना भयमुक्त वातावरण मिळावे यासाठी सुरक्षा जवान सतर्क आहेत. सीमावर्ती भागात अद्याप कोठेही नक्षल्यांचे पत्रक अथवा बॅनर, पोस्टर आढळलेले नाही. जिल्ह्यात अलर्ट जारी केला असून, सीमावर्ती भागात नक्षलविरोधी अभियान गतिमान केले आहे."- नीलोत्पल, पोलिस अधीक्षक, गडचिरोली.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली