शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
2
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी
3
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
4
लोकसभा : संसदेची सुरक्षा CRPF कडून CISF ने ताब्यात घेतली; कारण काय...
5
वयाच्या १५ व्या वर्षीच अक्षय कुमारच्या लेकाने सोडलंय घर, आरवच्या सवयी वाचून व्हाल शॉक!
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियामध्ये तेजी, नेस्ले घसरला
7
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
8
'निवडणूक आयोगाचे मोदींच्या घरगड्यासारखे काम'; उद्धव ठाकरेंच्या आरोपानंतर भाजपने दाखल केली तक्रार
9
इराणच्या राष्ट्रपतींचा अपघात झाला की घातपात? हेलिकॉप्टर अपघाताचे हे आहे रहस्य
10
मुंबईत मतदान केंद्रावर ठाकरे गटाच्या बूथ एजंटचा धक्कादायक मृत्यू; टॉयलेटमध्ये आढळला मृतावस्थेत
11
खवळलेल्या समुद्रातून २४ पर्यटकांची सुटका, दोन तास थरार, तटरक्षक दलाच्या शाैर्याचे सर्वत्र काैतुक
12
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
13
RBI गव्हर्नर की SBI प्रमुख; कोणाचं वेतन आहे जास्त, पाहा कोणाचं किती आहे शिक्षण?
14
विदेशी नोकरीच्या आमिषाने फसवणुकीचा धंदा जोरात, परराष्ट्र मंत्रालयाकडून सावधगिरीचा इशारा
15
विराेध असूनही रईसी यांनी इराणला नेले समृद्ध युरेनियमजवळ
16
आता औषधे संशयाच्या भोवऱ्यात; दर्जाबाबत शंका आल्याने भारतीय कंपन्यांची उत्पादने परत पाठविली
17
सर्व रिॲलिटी शोचा बाप! Bigg Boss Marathi 5 येतोय; काही वेळात दिसणार पहिली झलक
18
चेन्नईला बुडविले, तसेच टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कपमध्येही नाही बुडवले म्हणजे झाले, एवढ्या खराब फॉर्मात
19
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
20
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ

आठवडी बाजारात टमाटरचे भाव कडाडले

By admin | Published: June 26, 2017 1:03 AM

गेल्या १५ दिवसांपासून गडचिरोली जिल्हा मुख्यालयाच्या बाजारात जिल्हा बाहेरून तसेच जिल्ह्यातून होणारी भाजीपाल्याची आवक घटल्यामुळे

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : गेल्या १५ दिवसांपासून गडचिरोली जिल्हा मुख्यालयाच्या बाजारात जिल्हा बाहेरून तसेच जिल्ह्यातून होणारी भाजीपाल्याची आवक घटल्यामुळे भाजीपाल्यांचे भाव प्रचंड वधारले आहेत. विशेष म्हणजे २५ जून रोजी रविवारला गडचिरोली येथे भरलेल्या आठवडी बाजारात टमाटर ४० रूपये प्रतीकिलो दराने विकले जात होते. गेल्या सहा महिन्यातील हा सर्वाधिक भाव आहे. फुलकोबी २५ ते ३० रूपये किलो दराने तसेच कारले २५ ते ३० रूपये पाव या भावात विकले जात होते. हिरवी मिरची महाग झाली असून ६० रूपये किलो दराने विकली जात होती. वांगे ४० रूपये किलो, पत्ताकोबी ४० रूपये किलो, तोंडरी ३० रूपये किलो, बटाटे २० रूपये किलो दराने विकले जात होते. याशिवाय या आठवडी बाजारात पालकची भाजी व सांभाराचे भाव प्रचंड वाढले होते. गडचिरोली जिल्हा मुख्यालयाच्या बाजारात संपूर्ण तालुक्यातून व शहरातून मोठ्या संख्येने ग्राहक भाजीपाला खरेदीसाठी येतात. मात्र त्या तुलनेत भाजीपाल्याची अपेक्षित आवक रविवारच्या बाजारात न झाल्याने भाजीपाल्याचे दर प्रचंड वाढल्याचे दिसून आले. भाजीपाल्याचे भाव वाढल्याने सर्वसामान्य गृहिणींचे आर्थिक बजेट पूर्णत: कोलमडले. या बाजारात जांभळांची आवक प्रचंड वाढली होती. शिवाय रानभाज्याही विक्रीसाठी उपलब्ध होत्या.