शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

तंबाखू नियंत्रण कायद्याची जिल्ह्यात सर्रास पायमल्ली सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 23:41 IST

तंबाखूचे आरोग्यावर फार मोठे दुष्परिणाम होत असल्याने शासनाने तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीवर नियंत्रण ठेवून काही नियम आखून दिले आहे. यासाठी भारत सरकारने स्वतंत्र तंबाखू नियंत्रण कायदा (कोटपा) तयार केला आहे. मात्र या कायद्याची पायमल्ली होत असल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देशाळेच्या परिसरातच पानठेले : जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे औचित्य

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : तंबाखूचे आरोग्यावर फार मोठे दुष्परिणाम होत असल्याने शासनाने तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीवर नियंत्रण ठेवून काही नियम आखून दिले आहे. यासाठी भारत सरकारने स्वतंत्र तंबाखू नियंत्रण कायदा (कोटपा) तयार केला आहे. मात्र या कायद्याची पायमल्ली होत असल्याचे दिसून येते. अगदी प्रतिबंधीत तंबाखू व प्रतिबंधीत क्षेत्रातही तंबाखूची विक्री खुलेआम होत असताना प्रशासकीय यंत्रणा मात्र गप्प असल्याचे दिसून येते.भारत सरकारच्या २००३ च्या कोटपा कायद्यानुसार शैक्षणिक संस्थांच्या १०० मीटर परिघात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री हा दंडनिय गुन्हा मानला गेला आहे. शैक्षणिक संस्थांपासून १०० मीटर अंतरावर तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर प्रतिबंध घालावा, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. शासनाने त्याबाबतचा अनुपालन अहवाल मागितला होता. या अनुपालन अहवालात शाळा महाविद्यालयाच्या नियंत्रण अधिकाऱ्यांनी आमच्या शैक्षणिक संस्थेच्या १०० मीटर परिघात तंबाखूजन्य पदार्थाची विक्री होत नसल्याचे कळविले आहे. यु-डायस मधील रखाण्यात सर्वच शाळांनी तंबाखूमुक्त शाळा असल्याची माहिती भरली आहे. मात्र कोणत्याही गावात गेले तरी शाळेच्या संरक्षण भिंतीला लागून, तर काही ठिकाणी प्रवेशद्वाराला लागूनच तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याचे वास्तव दिसते.३१ मे हा जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून पाळला जातो.जागतिक पातळीवरून तंबाखूवर नियंत्रण आणण्यासाठी तंबाखूच्या दुष्परिणामांचा प्रचार, प्रसार करण्यासाठी तसेच ध्येय, धोरणांचा आढावा यानिमित्ताने घेतला जातो.तंबाखू सोडण्याच्या युक्त्यातंबाखूजन्य पदार्थ नजरेसमोर न ठेवता लपवून ठेवा. जे नजरेसमोर नसते, ते आठवत सुध्दा नाही. हा एक सोपा उपाय ठरू शकतो. तंबाखूजन्य पदार्थ लवकर मिळतील, अशा ठिकाणी ठेवू नका. ते दुसºया खोलीत किंवा तुम्ही नेहमी जात नाही, अशा कुलूपाच्या कपाटात ठेवा.तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्यांना टाळण्याचा प्रयत्न करा किंवा त्यांच्यापासून दूर राहा. तोंडात चॉकलेट, च्युइंगम, पेपरमिंट ठेवा व दीर्घ श्वास घेण्याचा सरावा करा. जेव्हा तल्लफ येईल, तेव्हा उभ्याने किंवा बसलेल्या अवस्थेत दीर्घ श्वास घ्या. एक पेला थंड पाणी प्या.व्यायामाने देखील तल्लफ घालवण्यास मदत होते. जेव्हा तंबाखू सेवनाची तल्लफ येईल तेव्हा तुमच्या मुलांबद्दल आणि त्यांच्या भविष्याबाबत विचार करा. तुमच्यावर तंबाखूमुळे होणाºया भयंकर रोगांचा विचार करा. सेवन थांबविण्याची एक तारीख ठरवा. मदतनिसाची मदत घ्या.तुमचे वेळापत्रक तंबाखूजन्य पदार्थ वगळून आखा. जेव्हा धुम्रपानाची तल्लफ येईल, तेव्हा काही तरी वेगळे करण्याचा प्रयत्न करा, दोन सिगारेटमध्ये विलंब करा. दीर्घ श्वास घ्या, पाणी प्या. स्वतासाठी सकारात्मक बोला. स्वत:ला पुरस्कृत करा.दररोज योग, चालणे, ध्यानधारणा, नृत्य, संगीत आदी तंत्र अवलंबा. सक्रीय राहा व पोषक आहार घ्या, असा सल्ला प्रकाश व्यसनमुक्ती केंद्र देसाईगंजचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश गभने यांनी दिला आहे.तंबाखूचे असे आहेत दुष्परिणामभारतात ८२ टक्के फुफ्फुसाच्या रोगांचे प्रमुख कारण धुम्रपान आहे. धुम्रपान करणाºयांना क्षयरोग सुध्दा होण्याचा धोका संभवतो. धुम्रपानामुळे रक्तदाब वाढून हृदयाकडे जाणारा रक्त पुरवठा कमी होतो. तंबाखू संपूर्ण शरीराच्या धमण्यांच्या पापुद्र्याचे नुकसान करते. धुम्रपानामुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते. भारतात तंबाखूमुळे दर आठ सेकंदाला एकाचा मृत्यू होतो. तंबाखूपासून दूर राहिल्यास जीवनकाळ २० वर्षाने वाढू शकते.

टॅग्स :Smokingधूम्रपान