शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
3
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
4
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
5
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
6
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
8
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
9
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
10
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
11
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
12
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
13
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
14
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
15
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
16
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
17
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
18
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
19
क्रिकेट चाहत्यांना धक्का! पुढील वर्षीचा टी२० वर्ल्ड कप मोबाईलवर दिसणार नाही? जिओस्टारने घेतली माघार
20
२०२५ च्या शेवटी भारतीय गुगलवर का सर्च करताहेत ५२०१३१४? अर्थ समजल्यावर तुम्हीही व्हाल हैराण
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्याच्या मृतदेहासाठी ‘कावडी’ची वेळ ; आदिवासींच्या नशिबी मरणानंतरही यातनाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 19:03 IST

Gadchiroli : पर्लकोटा पूल तीन वर्षांपासून रखडला, ११२ गावं दरवर्षी जगापासून तुटतात !

भामरागड : तोकड्या पायाभूत सुविधा, त्यात पूर, पाण्याची आपत्ती अशा दुहेरी संकटांचा सामना दुर्गम, अतिदुर्गम भागातील आदिवासींना पावसाळ्यात करावा लागतो. सरत्या आठवड्यात सलग चार दिवस पावसाने अक्षरशः झोडपून काढले. पर्लकोटा नदीला आलेल्या पुराने भामरागड तालुका मुख्यालयासह शेकडो गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला. दुर्दैवाने चार दिवसांत पाच जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. यातील कोयार गावच्या चिमुकल्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नेताना खाटेची कावड करावी लागली. जीवंतपणी हालअपेष्टा सोसणाऱ्या गरीब आदिवासींच्या नशिबी मरणानंतर अंतिम प्रवासातही यातनाच वाट्याला याव्यात ही मोठी शोकांतिका.

भामरागडमध्ये 'पर्लकोटा'वरील पूल होणार तरी कधी ?आल्लापल्ली - भामरागड - लाहेरी - बिनागुंडा -नारायणपूर राष्ट्रीय महामार्गावरील (१३० डी) भामरागडनजीकच्या पर्लकोटा नदीवरील पुलाचे काम तीन वर्षांपासून रखडले आहे. पावसात जुना पूल पाण्याखाली जातो व तालुक्यातील ११२ गावांचा संपर्क तुटतो.या पुलासाठी संपादित केलेल्या जागेचा वाद न्यायालयात सुरु आहे. हा वाद सोडवून आंतरराज्य महामार्गाचे काम पूर्ण होण्यासाठी प्रशासन पुढाकार कधी घेणार, हा प्रश्न आहे. अनेक वर्षापासून या भागातील नागरिकांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

पूरग्रस्तांना आर्थिक साहाय्य, पण परवड कधी थांबणार ?

  • पूरस्थितीत प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून आर्थिक मदत केली जाते. ही मदत संबंधितांना पोहोचविली म्हणजे जबाबदारी संपते का, हा खरा प्रश्न आहे.
  • वनकायद्यांच्या कचाट्यात, न्यायालयीन प्रकरणांत अडकलेले प्रकल्प, विकासकामे तातडीने व्हावीत, यासाठी प्रशासन काही हालचाली करणार आहे की नाही, प्रत्येक पावसाळ्यात स्थानिकांना आपला जीव गमवावा लागत असेल, तर शासनाने फक्त आर्थिक मदत करून थांबणे हा तोडगा ठरू शकत नाही. कायमस्वरूपी उपाययोजना आणि पायाभूत सुविधा उभारणे हेच या 'आपत्ती'ला खरे उत्तर आहे.
टॅग्स :GadchiroliगडचिरोलीTrible Development Schemeआदिवासी विकास योजना