शहरं
Join us  
Trending Stories
1
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
2
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
3
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
4
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
5
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
6
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
7
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
8
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
9
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
10
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
11
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
12
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
13
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
14
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
15
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
16
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
17
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
18
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
19
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
20
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     

फेब्रुवारीपासून धानाचे चुकारे थकले

By admin | Updated: July 29, 2015 01:48 IST

आदिवासी विकास महामंडळाला विक्री करण्यात आलेल्या धानाचे चुकारे फेब्रुवारी महिन्यापासून थकले आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे.

शेतकरी अडचणीत : सावकाराकडील कर्ज वाढलेमालेवाडा : आदिवासी विकास महामंडळाला विक्री करण्यात आलेल्या धानाचे चुकारे फेब्रुवारी महिन्यापासून थकले आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. आदिवासी विकास महामंडळ विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या मार्फत धान खरेदी करते. यावर्षी मालेवाडा व परिसरात धान खरेदी केंद्र स्थापन करण्यात आले होते. या केंद्रावर शेकडो शेतकऱ्यांनी लाखो रूपयांचे धान विकले. याबाबीला चार महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. परंतु अजूनपर्यंत शेतकऱ्यांना धानाचे चुकारे मिळाले नाही. शेतकरी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी ंसंस्थेच्या कार्यालयात जाऊन चुकाऱ्याबाबत विचारणा करीत आहेत. मात्र शासनाकडूनच पैसे उपलब्ध झाले नसल्याचे विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. नवीन खरीप हंगामात धानाची रोवणी करण्यासाठी हजारो रूपये खर्च येतो. धानाच्या विक्रीचा स्वत:चा पैसा मिळाला नाही. परिणामी शेतकऱ्यांना सावकारापुढे हात जोडून कर्ज काढावे लागत आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग हतबल झाल आहे. (वार्ताहर)