शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
11
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
12
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
13
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
14
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
15
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
16
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
17
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
18
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
19
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
20
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश

विद्यार्थिनींवर तिकिटांचा भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 23:56 IST

शाळा सुरू होऊन आता जवळपास १५ दिवसांचा कालावधी उलटत आला तरी बहुतांश विद्यार्थिनींच्या बस पासेस निघाल्या नाहीत. त्यामुळे तिकीटाचे पैसे देऊन त्यांना शाळेत यावे लागत आहे.

ठळक मुद्देमोफत प्रवासाची सवलत कुचकामी : शाळा प्रशासनाचा लेटलतीफपणा मुळावर

दिगांबर जवादे।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शाळा सुरू होऊन आता जवळपास १५ दिवसांचा कालावधी उलटत आला तरी बहुतांश विद्यार्थिनींच्या बस पासेस निघाल्या नाहीत. त्यामुळे तिकीटाचे पैसे देऊन त्यांना शाळेत यावे लागत आहे. काही गरीब विद्यार्थिनींकडे तिकीटाचे पैसे नसल्याने त्या शाळेत न येता घरीच राहत असल्याची गंभीर स्थिती आहे.विद्यार्थिनींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढावे, यासाठी राज्य शासनाच्या वतीने पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थिनींसाठी अहिल्याबाई होळकर मोफत प्रवास सवलत योजना राबविली जाते. गडचिरोली जिल्ह्यात मानव विकास मिशन अंतर्गत गडचिरोली आगाराला ४९, अहेरी आगाराला ४२ व ब्रह्मपुरी आगाराला १४ बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. आठवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थिनींना मानव विकास मिशन अंतर्गत मोफत पास दिले जातात. एवढेच नव्हे तर शिक्षण विभागाने ठरवून दिलेल्या मार्गाने मानव विकास मिशनच्या बसफेऱ्या चालवून विद्यार्थिनींची शाळा ते गावापर्यंत वाहतूक केली जाते. एकंदरीत गडचिरोली जिल्ह्यातील पाचवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाºया विद्यार्थिनींना मोफत प्रवास सवलतीचा लाभ घेता येतो. मात्र शाळेच्या लेटलतीफ धोरणाचा फटका विद्यार्थिनींना बसत आहे.गडचिरोली जिल्ह्यातील शाळा २६ जूनपासून सुरू होतात. पहिल्याच दिवसी विद्यार्थ्यांना गणवेश, पुस्तके यांचे वितरण केले जाते. त्यांच्या स्वागताच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्यामुळे विद्यार्थी पहिल्या दिवसापासून शाळेत यायला सुरुवात करतात. त्यामुळे संबंधित शाळा प्रशासनाने शाळा सुरू होण्याच्या काही दिवसाअगोदरच पासेस काढून ठेवणे आवश्यक आहे. जेणेकरून पहिल्या दिवसापासूनच विद्यार्थिनींना मोफत प्रवास सवलतीचा लाभ घेता येईल. यासाठी एसटी महामंडळ तयार असले तरी संबंधित शाळा प्रशासन शाळा सुरू झाल्याशिवाय पासेस काढण्याची तयारी सुरू करत नाही. शाळा सुरू झाल्यानंतर ८ ते १५ दिवसानंतर पासेस काढण्यासाठी अर्ज केले जातात. यावर्षी सुद्धा अनेक शाळांनी अजूनपर्यंत अर्जच केले नाहीत. त्यामुळे मागील १५ दिवसांपासून काही विद्यार्थिनी तिकीट काढून प्रवास करीत आहेत. सवलत असतानाही संबंधित शाळेच्या लेटलतिफ धोरणाचा फटका विद्यार्थिनींना बसत आहे. गरीब विद्यार्थिनी दरदिवशी प्रवासासाठी ४० ते ५० रूपये खर्च करू शकत नसल्याने त्या शाळेतच येत नसल्याचे दिसून येते.सहा महिन्यांची मिळणार पासमानव विकास मिशन व अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना मोफत प्रवास सवलतीचा लाभ संपूर्ण शैक्षणिक सत्र संपेपर्यंत द्यावाच लागतो. मागील वर्षीपर्यंत तीन महिन्यांची पास दिली जात होती. दर तीन महिन्याने पास देण्याऐवजी सहा महिने ते दहा महिन्यांपर्यंतची पास देण्याचे निर्देश एसटीच्या केंद्रीय कार्यालयाने दिले आहेत. त्यानुसार गडचिरोली विभागात सहा महिन्यांची पास दिली जाणार आहे. यामुळे एसटी प्रशासन व शाळा प्रशासनाचेही वेळ व श्रम वाचण्यास मदत होईल. पण हे काम लवकर सुरू करणे गरजेचे आहे.पहिल्याच दिवशी पुस्तकांसोबत पासही देणे शक्यशाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध व्हावी, यासाठी शाळा सुरू होण्यापूर्वीच शाळांपर्यंत पुस्तके उपलब्ध करून दिली जातात. त्याचप्रमाणे निश्चित विद्यार्थिनींची शाळा सुरू होण्याच्या दोन-चार दिवसांपूर्वी पास काढून शाळेच्या पहिल्या दिवशी पुस्तकांसोबतच पासही दिल्यास विद्यार्थिनींचा आनंद द्विगुणीत होईल. विद्यार्थिनी पहिल्या दिवसापासूनच शाळेत हजर राहील. एसटी विभाग शाळा सुरू होण्यापूर्वी पास देण्यास तयार आहे. हा प्रयोग किमान पुढील वर्षी एखाद्या शाळेने करून बघावा, अशी मागणी पालकांकडून होत आहे.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ