शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

एकाच दिवशी तीन हजार मजूर परतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 05:00 IST

पहिल्या लॉकडाऊनचा कालावधी १४ एप्रिलला संपला. १४ एप्रिलनंतर लॉकडाऊन उठेल, अशी आशा मजूर वर्ग बाळगूण होते. त्यानंतर शासनाने ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविला. ३ मे नंतर तरी लॉकडाऊन उठविला जाईल, अशी आशा असताना केंद्र शासनाने पुन्हा १७ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविला आहे. दुसऱ्या राज्यात अडकून पडलेल्या मजुरांना परत आणले जाईल, असे शासनामार्फत सांगितले जात आहे.

ठळक मुद्देमिळेल त्या वाहनाचा घेतला आधार : सिरोंचा, आष्टी, व्याहाडमार्गे मजुरांचे लोंढे जिल्ह्यात करीत आहेत प्रवेश

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली/सिरोंचा/आष्टी : तेलंगणा राज्यात मिरची तोडण्यासाठी गेलेले मजूर मिळेल त्या साधनाने परत येत आहेत. रविवारी दिवसभरात जवळपास तीन हजार मजूर जिल्ह्यात परतले आहेत. चामोर्शी तालुक्यातील आष्टी, सिरोंचा, गडचिरोली तालुक्यातील वैनगंगा नदी पुलावरून सदर मजुरांनी जिल्ह्यात प्रवेश केला आहे.पहिल्या लॉकडाऊनचा कालावधी १४ एप्रिलला संपला. १४ एप्रिलनंतर लॉकडाऊन उठेल, अशी आशा मजूर वर्ग बाळगूण होते. त्यानंतर शासनाने ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविला. ३ मे नंतर तरी लॉकडाऊन उठविला जाईल, अशी आशा असताना केंद्र शासनाने पुन्हा १७ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविला आहे. दुसऱ्या राज्यात अडकून पडलेल्या मजुरांना परत आणले जाईल, असे शासनामार्फत सांगितले जात आहे. मात्र शासनामार्फत प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यास पुन्हा १५ दिवसांचा कालावधी लागू शकते. तोपर्यंत दुसऱ्या राज्यात थांबणे कठीण असल्याने मजूर वर्ग मिळेल त्या वाहनाने गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करीत आहेत.आष्टी, सिरोंचामार्गे सर्वाधिक मजूर गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करीत आहेत. तेलंगणात अडकलेले मजूर ट्रक भाड्याने करून येत आहेत. सदर ट्रक महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर अडविले जात असल्याने त्याच ठिकाणी मजुरांना सोडले जात आहे. बहुतांश मजूर राजुरा तालुक्यातील शिरपूर मार्गे चंद्रपूर जिल्ह्यात प्रवेश करीत आहेत. त्यानंतर सदर मजूर आष्टी मार्गे गडचिरोली जिल्ह्यात येत आहेत. रविवारी दिवसभरात आष्टी मार्गे जवळपास दोन हजार मजुरांनी जिल्ह्यात प्रवेश केला. मूल मार्गानेही काही ट्रक गडचिरोली जिल्ह्यात आले.सिरोंचामार्गे ६०० मजुरांचा प्रवेशगोदावरी नदीवरील पुलावरून रविवारी दिवसभरात जवळपास ६०० मजुरांनी जिल्ह्यात प्रवेश केला. सकाळपासूनच तेलंगणातून येणाºया मजुरांची रांग लागली होती. आरोग्य विभागाचे पथक पुलाजवळ तैनात करण्यात आले होते. महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्येक मजुराची नोंद घेतली. तर आरोग्य विभागाने मजुरांची आरोग्य तपासणी केली. त्यानंतर या मजुरांना ट्रक, टॅक्सीच्या सहाय्याने त्यांच्या गावाला पाठविण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील ३१ मजुरांचाही समावेश होता. या मजुरांना सिरोंचाहून खासगी बसची व्यवस्था करून देण्यात आली.सदर बस नागपूरपर्यंत सोडून देणार आहे. सिरोंचाचे पोलीस निरिक्षक अजय अहिरकर, उपनिरिक्षक विशाल जाधव, गजानन शिंदे आदींनी मजुरांच्या व्यवस्थेसाठी मदत केली. सिरोंचा येथील पत्रकार कौसर खान, प्यारेलाल उमरे, उज्वल तिवारी, नरेश धर्मपुरी यांनी मजुरांसाठी थंड पाणी उपलब्ध करून दिले.ट्रकचा आधार : तेलंगणा राज्यात जवळपास ११ हजार मजूर अडकले आहेत. शासनाने दिलेल्या परवानगीनंतर सदर मजूर आता गावाकडे परतत आहेत. शासनाने बस व ट्रेनची सुविधा देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र त्याला बराच उशीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मजूर स्वत: वाहन करून गावाकडे परत येत आहेत. ट्रकमध्ये जास्तीत जास्त मजूर बसत असल्याने कमी खर्चात प्रवास करणे शक्य होते. त्यामुळे मजूर ट्रकद्वारे प्रवास करीत आहेत. असाच एक ट्रक तेलंगणातील राज्यातून मजुरांना घेऊन गडचिरोलीत येथे पोहोचला.गाव समित्या मजुरांना करणार क्वॉरंटाईनकोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक गावात गाव समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये तलाठी, ग्रामसेवक, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, युवक, तंमूस अध्यक्ष यांचा समावेश आहे. दुसºया राज्यात गावात आलेल्या मजुरांना १४ दिवस क्वॉरंटाईन ठेवण्याची जबाबदारी सदर समितीकडे राहणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या