शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराण्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
4
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
5
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
6
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
7
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
8
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
9
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
10
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
11
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
12
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
13
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
14
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
15
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
16
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
17
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
18
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
19
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
20
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा

तीन हजार हेक्टरवर वणवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 00:07 IST

यावर्षीच्या उन्हाळ्यात संपूर्ण जिल्ह्यात १ हजार ३४४ वणव्यांच्या घटनांची नोंद करण्यात आली असून यामध्ये सुमारे २ हजार ७३७ हेक्टर जंगल जळून खाक झाले आहे. मागील वर्षीच्या पावसाळ्यात पाऊस कमी झाला.

ठळक मुद्दे१ हजार ३४४ घटनांची नोंद : मागील वर्षीच्या तुलनेत आग लागण्याचे प्रमाण वाढले

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : यावर्षीच्या उन्हाळ्यात संपूर्ण जिल्ह्यात १ हजार ३४४ वणव्यांच्या घटनांची नोंद करण्यात आली असून यामध्ये सुमारे २ हजार ७३७ हेक्टर जंगल जळून खाक झाले आहे.मागील वर्षीच्या पावसाळ्यात पाऊस कमी झाला. त्याचबरोबर नोव्हेंबरनंतर पावसाने कायमची विश्रांती घेतली. त्यामुळे जंगलातील गवत पूर्णपणे सुकले आहे. थोडीशीही आग लागल्यास त्याचे वणव्यात रूपांतर होत आहे. त्यामुळे यावर्षी जंगलाला आगी लागण्याचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून येते.मोहफूल वेचण्यासाठी काही नागरिक मोहाच्या झाडाखाली आग लावतात. पुढे ही आग जंगलभर पसरते. तेंदूपत्ता चांगला यावा, यासाठीही आग लावली जाते. तर शेतातील धसकट जाळण्यासाठी लावलेली आग जंगलापर्यंत पोहोचून त्याचे वणव्यात रूपांतर होते. जंगलाने ये-जा करणारे नागरिक बिडी किंवा सिगारेट पिऊन ती रस्त्याच्या कडेला टाकतात. यामुळेही आग लागते. जंगलाला आगी लागण्याची प्रमुख कारणे आहेत.मागील वर्षी एकूण ९३७ वणवे लागले असल्याची नोंद वन विभागाकडे आहे. या आगींमुळे १ हजार ८१० हेक्टरवरील जंगल जळून खाक झाले. तर यावर्षी जंगलांना आगी लागण्याच्या प्रमाणामध्ये वाढ झाली असल्याचे दिसून येते. एप्रिलपर्यंत जंगलाला आग लागण्याच्या १ हजार ३४४ घटना घडल्या आहेत. यामध्ये २ हजार ३३७ हेक्टरवरील जंगल जळून खाक झाले.जंगलाला आग लागल्यानंतर ती आग कित्येक दूर पसरते. यामध्ये जीव, जंतू, पक्ष्यांचे घरटे, लहान पशु, सुकलेले लाकूड जळून खाक होतात. यामुळे जैवविविधतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे जंगलांना आगी लागू नये व लागलेली आग तत्काळ विझावी, यासाठी वन विभागातर्फे शर्तीचे प्रयत्न होत असले तरी आगींच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यात वन विभागाला अजूनपर्यंत पाहिजे तेवढे यश मिळाले नाही. वणव्यांमुळे जंगलातील नष्ट होणारी जैवविविधता टिकवून ठेवायची असेल तर वणवे न लागण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे. त्यादृष्टीने व्यापक प्रमाणात उपाययोजना कराव्या लागणार आहेत.वन विभागाच्या उपाययोजनाजंगलाला आग लागल्यास जैवविविधतेची मोठ्या प्रमाणात हानी होते. याची कल्पना वन विभागाला असल्याने जंगलाला आग लागू नये, यासाठी वन विभागाच्या मार्फत विशेष उपाययोजना केल्या जातात. यामध्ये फायर लाईन जाळण्याचे काम उन्हाळ्याच्या सुरूवातीला केले जाते. प्रत्येक रेंजमध्ये फिरते वाहन उपलब्ध करून दिले आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याकडे फायर ब्लोअर मशीन देण्यात आली आहे. त्याचबरोबर जंगलाला आग लागू नये, याबाबत मार्गदर्शनही केले जात आहे.सेटलाईटने वेळीच मिळते माहितीदिवसेंदिवस वन विभाग सुध्दा हायटेक होत चालला आहे. देशभरातील कुठेही जंगलाला लागलेल्या आगीची माहिती सॅटेलाईटद्वारे फॉरेस्ट सर्वे आॅफ इंडियाला मिळते. त्यानंतर ज्या क्षेत्रात आग लागली आहे. त्या क्षेत्रातील संबंधित अधिकाऱ्याला एसएमएसद्वारे वणव्याची माहिती दिली जाते. माहिती मिळताच संबंधित कर्मचारी घटनास्थळी पोहोचून आग विझविते. नासा ही आंतरराष्ट्रीय संस्था सुध्दा आगीच्या घटनांची माहिती व्हॉटस्अ‍ॅपद्वारे वन विभागाच्या अधिकाºयांना देते.

टॅग्स :fireआग