शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
3
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
4
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
5
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
6
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
7
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
8
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
9
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
10
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
11
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
12
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
13
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
14
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
15
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
16
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
17
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
18
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
19
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
20
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय

तीन हजार हेक्टरवर वणवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 00:07 IST

यावर्षीच्या उन्हाळ्यात संपूर्ण जिल्ह्यात १ हजार ३४४ वणव्यांच्या घटनांची नोंद करण्यात आली असून यामध्ये सुमारे २ हजार ७३७ हेक्टर जंगल जळून खाक झाले आहे. मागील वर्षीच्या पावसाळ्यात पाऊस कमी झाला.

ठळक मुद्दे१ हजार ३४४ घटनांची नोंद : मागील वर्षीच्या तुलनेत आग लागण्याचे प्रमाण वाढले

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : यावर्षीच्या उन्हाळ्यात संपूर्ण जिल्ह्यात १ हजार ३४४ वणव्यांच्या घटनांची नोंद करण्यात आली असून यामध्ये सुमारे २ हजार ७३७ हेक्टर जंगल जळून खाक झाले आहे.मागील वर्षीच्या पावसाळ्यात पाऊस कमी झाला. त्याचबरोबर नोव्हेंबरनंतर पावसाने कायमची विश्रांती घेतली. त्यामुळे जंगलातील गवत पूर्णपणे सुकले आहे. थोडीशीही आग लागल्यास त्याचे वणव्यात रूपांतर होत आहे. त्यामुळे यावर्षी जंगलाला आगी लागण्याचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून येते.मोहफूल वेचण्यासाठी काही नागरिक मोहाच्या झाडाखाली आग लावतात. पुढे ही आग जंगलभर पसरते. तेंदूपत्ता चांगला यावा, यासाठीही आग लावली जाते. तर शेतातील धसकट जाळण्यासाठी लावलेली आग जंगलापर्यंत पोहोचून त्याचे वणव्यात रूपांतर होते. जंगलाने ये-जा करणारे नागरिक बिडी किंवा सिगारेट पिऊन ती रस्त्याच्या कडेला टाकतात. यामुळेही आग लागते. जंगलाला आगी लागण्याची प्रमुख कारणे आहेत.मागील वर्षी एकूण ९३७ वणवे लागले असल्याची नोंद वन विभागाकडे आहे. या आगींमुळे १ हजार ८१० हेक्टरवरील जंगल जळून खाक झाले. तर यावर्षी जंगलांना आगी लागण्याच्या प्रमाणामध्ये वाढ झाली असल्याचे दिसून येते. एप्रिलपर्यंत जंगलाला आग लागण्याच्या १ हजार ३४४ घटना घडल्या आहेत. यामध्ये २ हजार ३३७ हेक्टरवरील जंगल जळून खाक झाले.जंगलाला आग लागल्यानंतर ती आग कित्येक दूर पसरते. यामध्ये जीव, जंतू, पक्ष्यांचे घरटे, लहान पशु, सुकलेले लाकूड जळून खाक होतात. यामुळे जैवविविधतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे जंगलांना आगी लागू नये व लागलेली आग तत्काळ विझावी, यासाठी वन विभागातर्फे शर्तीचे प्रयत्न होत असले तरी आगींच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यात वन विभागाला अजूनपर्यंत पाहिजे तेवढे यश मिळाले नाही. वणव्यांमुळे जंगलातील नष्ट होणारी जैवविविधता टिकवून ठेवायची असेल तर वणवे न लागण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे. त्यादृष्टीने व्यापक प्रमाणात उपाययोजना कराव्या लागणार आहेत.वन विभागाच्या उपाययोजनाजंगलाला आग लागल्यास जैवविविधतेची मोठ्या प्रमाणात हानी होते. याची कल्पना वन विभागाला असल्याने जंगलाला आग लागू नये, यासाठी वन विभागाच्या मार्फत विशेष उपाययोजना केल्या जातात. यामध्ये फायर लाईन जाळण्याचे काम उन्हाळ्याच्या सुरूवातीला केले जाते. प्रत्येक रेंजमध्ये फिरते वाहन उपलब्ध करून दिले आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याकडे फायर ब्लोअर मशीन देण्यात आली आहे. त्याचबरोबर जंगलाला आग लागू नये, याबाबत मार्गदर्शनही केले जात आहे.सेटलाईटने वेळीच मिळते माहितीदिवसेंदिवस वन विभाग सुध्दा हायटेक होत चालला आहे. देशभरातील कुठेही जंगलाला लागलेल्या आगीची माहिती सॅटेलाईटद्वारे फॉरेस्ट सर्वे आॅफ इंडियाला मिळते. त्यानंतर ज्या क्षेत्रात आग लागली आहे. त्या क्षेत्रातील संबंधित अधिकाऱ्याला एसएमएसद्वारे वणव्याची माहिती दिली जाते. माहिती मिळताच संबंधित कर्मचारी घटनास्थळी पोहोचून आग विझविते. नासा ही आंतरराष्ट्रीय संस्था सुध्दा आगीच्या घटनांची माहिती व्हॉटस्अ‍ॅपद्वारे वन विभागाच्या अधिकाºयांना देते.

टॅग्स :fireआग