शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

सिंचन विहिरींसाठी हजारावर प्रस्ताव, तुम्ही अर्ज केला का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 12:52 IST

कृषी विभागाची योजना : अनुसूचित जाती-जमातीचे शेतकरी लाभार्थी

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : अनुसूचित जाती, नवबौद्ध तसेच अनुसूचित जमाती संवर्गातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाच्या वतीने विविध योजना राबविल्या जात आहेत. अनुसूचित जातींसाठी असलेली यापैकीच एक योजना म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा उल्लेख करता येईल. तर अनुसूचित जमाती घटकासाठी बिरसा मुंडा योजना राबविली जात आहे. या दोन्ही योजनेंतर्गत जिल्ह्यात एकूण १ हजार १८९ अर्ज जिल्हा परिषदेला प्राप्त झाले. 

अनुसूचित जाती, जमाती संवर्गातील शेतकऱ्यांना शेती कसताना त्यांना ओलिताची सोय करून देण्यासाठी दोन्ही योजना राबविल्या जात आहेत. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सिंचन विहिरींचा लाभ दिला जातो. नवीन विहिरींच्या मंजुरीसह जुन्या विहिरींची दुरुस्ती, साहित्य खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाते.

काय आहे कृषी स्वावलंबन योजना? अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील शेतकऱ्यांना सिंचन विहिरीचा लाभ देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आहे.

कोणाला लाभ? डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा लाभ अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील शेतकऱ्यांना तर बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचा लाभ अनुसूचित जमातीला घेता येतो. त्यांचे वार्षिक उत्पन्न दीड लाखांच्या आत असावे.

जुनी विहीर दुरुस्तीसाठी ५० हजार अर्थसाहाय्य जुनी विहीर दुरुस्तीसाठी ५० हजार रुपये दिले जातात; परंतु शेतकरी जी विहीर दुरुस्त करत आहे ती विहीर खासगी असावी. योजनेच्या लाभातील नसावी, अशी अट आहे.

अर्ज कसा कराल? शासनाच्या महाडीबीटी पोर्टलला भेट देऊन या पोर्टलवरून ऑनलाइन अर्ज सादर करता येतो.

असे प्राप्त झाले अर्ज डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत ८७२ अर्ज तर बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत २६९ अर्ज जिल्हा परिषदेला प्राप्त झालेले आहेत. तसेच क्षेत्राबाहेरील योजनेअंतर्गत ४८ अर्ज प्राप्त झाले आहेत.

कशासाठी किती पैसे मिळतात?नवीन विहिरीसाठी २.५० लाख नवीन विहीर बांधकामासाठी शासनाकडून या योजनेंतर्गत २ लाख ५० हजार रुपयांचे अर्थसाहाय्य वितरित केले जाते.

मोटार पंपासाठी २० हजार मोटार पंप किंवा डिझेल इंजिनसाठी शेतकऱ्यांना २० हजार रुपयांचे अर्थसाहाय्य वितरित केले जाते. वीज जोडणीसाठी १० हजारांचे अर्थसाहाय्य दिले जाते.

पाइप खरेदीसाठी ३० हजार पाइप खरेदीसाठी शासनाकडून शेतकऱ्याला ३० हजार रुपयांचे अर्थसाहाय्य दिले जाते. प्राप्त अनुदानातून शेतकऱ्यांना पाइप खरेदी करता येते.

"सिंचन विहिरींच्या लाभासाठी शेतकऱ्यांकडून ऑनलाइन अर्ज प्राप्त झालेले आहेत. या अर्जाची छाननी झालेली नाही. छाननीनंतर लाभार्थी निश्चित केले जातील."- प्रदीप तुमसरे, कृषी विकास अधिकारी जि. प 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली