शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

पुराचा हजारो हेक्टरवरील पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 06:00 IST

यावर्षी सातत्याने पूर येत असल्याने शेतकरी कमालीचे त्रस्त झाले आहेत. पुरामुळे दोन ते तीन वेळा रोवणी झालेले धानपीक वाहून गेले आहे. त्यामुळे लागवडीचा खर्च वाढला होता. अशातच पुन्हा चार दिवसांपूर्वी पूर आला. याही पुरात होत्याचे नव्हते झाले. कापूस, सोयाबिन पिकांमध्ये पाणी शिरल्याने ही पिके नष्ट झाली आहेत.

ठळक मुद्देशेत राहणार पडीक : नुकसानी एवढीच मदत देण्याची होत आहे मागणी; पंचनामे तत्काळ करा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सतत चार दिवस सुरू असलेल्या पावसामुळे हजारो हेक्टर शेतीमध्ये पाणी शिरल्याने याचा फटका पिकांना बसला आहे. दोन वेळा धानाची रोवणी केल्यानंतरही पुराने पीक वाहून गेल्यानंतर आता काही शेतकऱ्यांनी रोवणीच न करण्याचा निर्णय घेतला आहे.बुधवारपासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली. सतत शुक्रवारपर्यंत पाऊस सुरू होता. बहुतांश तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली. त्यामुळे नदी, नाले ओसंडून वाहत होते. अतिवृष्टीमुळे नदी, नाल्यांना पूर आला. पुराचे पाणी पिकांमध्ये शिरले. सतत तीन दिवस पीक बुडून असल्याने काही पिके कुजून नष्ट झाली आहेत. काही ठिकाणचे पीक वाहून गेले. यावर्षी सातत्याने पूर येत असल्याने शेतकरी कमालीचे त्रस्त झाले आहेत. पुरामुळे दोन ते तीन वेळा रोवणी झालेले धानपीक वाहून गेले आहे. त्यामुळे लागवडीचा खर्च वाढला होता. अशातच पुन्हा चार दिवसांपूर्वी पूर आला. याही पुरात होत्याचे नव्हते झाले. कापूस, सोयाबिन पिकांमध्ये पाणी शिरल्याने ही पिके नष्ट झाली आहेत. गुड्डीगुडम परिसरातील तिमरम निमलगुडम, झिमेला, नंदीगाव, मोसम, गोलाकर्जी, रायगट्टा या गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती. पुराचे पाणी शेतात शिरले. त्यामुळे पिके नष्ट झाली आहेत. नुकसानीचे पंचनामे केले जातात. मात्र अत्यंत कमी मदत संबंधित शेतकºयाला दिली जाते. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.पावसाळ्याच्या सुरूवातीपासून रोवण्यांना सुरूवात झाली होती. रोवणे नियमित वेळेत झाल्याने पीक चांगले येईल, अशी अपेक्षा शेतकरी वर्ग बाळगून होता. मात्र पावसाने शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे. पुराचा फटका बसलेली शेती आता पडीक राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.मेडिगड्डा धरणाचा अंकिसा परिसरातील शेतीला धोकाअंकिसा : सिरोंचा तालुक्यातील गोदावरी नदीवर तेलंगणा सरकारने मेडिगड्डा धरण बांधले आहे. अवेळी धरणाचे पाणी सोडले जाते. सदर पाणी शेतीमध्ये शिरत असल्याने शेतकºयांचे यावर्षी मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, या धरणाच्या पाण्याचा अंकिसा, आसरअल्ली परिसरातील शेतकºयांना कोणताच फायदा नाही. उलट नुकसान होत आहे. शासनाने अंकिसा परिसरातील नडिकुडा, कोतापल्ली, चिंतारवेला, अंकिसा, लक्ष्मीदेवी पेठा, गेर्रापेल्ली, बोराईगुडम, आसरअल्ली, सुंकरअली, टेकडा मोटला, गुमलकोंडा या गावांना धरणग्रस्त गावे घोषित करून जमिनीच्या मोबदल्यात दुसरी जमीन द्यावी, कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी द्यावी, अशी मागणी चंद्रशेखर पुलगम, समय्या तोरकर, सडवली गड्डुरी, सांबम सोमनपल्ली, दामोधर सपिडी, पापय्या पाले, धर्मय्या कोठारी, नारायण पाले, जयराम चौधरी यांनी केली आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती