शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पुराचा हजारो हेक्टरवरील पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 06:00 IST

यावर्षी सातत्याने पूर येत असल्याने शेतकरी कमालीचे त्रस्त झाले आहेत. पुरामुळे दोन ते तीन वेळा रोवणी झालेले धानपीक वाहून गेले आहे. त्यामुळे लागवडीचा खर्च वाढला होता. अशातच पुन्हा चार दिवसांपूर्वी पूर आला. याही पुरात होत्याचे नव्हते झाले. कापूस, सोयाबिन पिकांमध्ये पाणी शिरल्याने ही पिके नष्ट झाली आहेत.

ठळक मुद्देशेत राहणार पडीक : नुकसानी एवढीच मदत देण्याची होत आहे मागणी; पंचनामे तत्काळ करा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सतत चार दिवस सुरू असलेल्या पावसामुळे हजारो हेक्टर शेतीमध्ये पाणी शिरल्याने याचा फटका पिकांना बसला आहे. दोन वेळा धानाची रोवणी केल्यानंतरही पुराने पीक वाहून गेल्यानंतर आता काही शेतकऱ्यांनी रोवणीच न करण्याचा निर्णय घेतला आहे.बुधवारपासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली. सतत शुक्रवारपर्यंत पाऊस सुरू होता. बहुतांश तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली. त्यामुळे नदी, नाले ओसंडून वाहत होते. अतिवृष्टीमुळे नदी, नाल्यांना पूर आला. पुराचे पाणी पिकांमध्ये शिरले. सतत तीन दिवस पीक बुडून असल्याने काही पिके कुजून नष्ट झाली आहेत. काही ठिकाणचे पीक वाहून गेले. यावर्षी सातत्याने पूर येत असल्याने शेतकरी कमालीचे त्रस्त झाले आहेत. पुरामुळे दोन ते तीन वेळा रोवणी झालेले धानपीक वाहून गेले आहे. त्यामुळे लागवडीचा खर्च वाढला होता. अशातच पुन्हा चार दिवसांपूर्वी पूर आला. याही पुरात होत्याचे नव्हते झाले. कापूस, सोयाबिन पिकांमध्ये पाणी शिरल्याने ही पिके नष्ट झाली आहेत. गुड्डीगुडम परिसरातील तिमरम निमलगुडम, झिमेला, नंदीगाव, मोसम, गोलाकर्जी, रायगट्टा या गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती. पुराचे पाणी शेतात शिरले. त्यामुळे पिके नष्ट झाली आहेत. नुकसानीचे पंचनामे केले जातात. मात्र अत्यंत कमी मदत संबंधित शेतकºयाला दिली जाते. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.पावसाळ्याच्या सुरूवातीपासून रोवण्यांना सुरूवात झाली होती. रोवणे नियमित वेळेत झाल्याने पीक चांगले येईल, अशी अपेक्षा शेतकरी वर्ग बाळगून होता. मात्र पावसाने शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे. पुराचा फटका बसलेली शेती आता पडीक राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.मेडिगड्डा धरणाचा अंकिसा परिसरातील शेतीला धोकाअंकिसा : सिरोंचा तालुक्यातील गोदावरी नदीवर तेलंगणा सरकारने मेडिगड्डा धरण बांधले आहे. अवेळी धरणाचे पाणी सोडले जाते. सदर पाणी शेतीमध्ये शिरत असल्याने शेतकºयांचे यावर्षी मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, या धरणाच्या पाण्याचा अंकिसा, आसरअल्ली परिसरातील शेतकºयांना कोणताच फायदा नाही. उलट नुकसान होत आहे. शासनाने अंकिसा परिसरातील नडिकुडा, कोतापल्ली, चिंतारवेला, अंकिसा, लक्ष्मीदेवी पेठा, गेर्रापेल्ली, बोराईगुडम, आसरअल्ली, सुंकरअली, टेकडा मोटला, गुमलकोंडा या गावांना धरणग्रस्त गावे घोषित करून जमिनीच्या मोबदल्यात दुसरी जमीन द्यावी, कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी द्यावी, अशी मागणी चंद्रशेखर पुलगम, समय्या तोरकर, सडवली गड्डुरी, सांबम सोमनपल्ली, दामोधर सपिडी, पापय्या पाले, धर्मय्या कोठारी, नारायण पाले, जयराम चौधरी यांनी केली आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती