शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

पाळणाघरांअभावी हजारो बालक अर्धपोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 00:52 IST

केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वांना अनुसरून राज्यातील ६ जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आलेली राजीव गांधी राष्ट्रीय पाळणाघर योजना गेल्या दीड वर्षांपासून ठप्प असल्यामुळे ही योजना जवळजवळ गुंडाळल्यात जमा आहे.

ठळक मुद्देकुपोषणाकडे वाटचाल : सहा जिल्ह्यातील योजना गुंडाळली?

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वांना अनुसरून राज्यातील ६ जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आलेली राजीव गांधी राष्ट्रीय पाळणाघर योजना गेल्या दीड वर्षांपासून ठप्प असल्यामुळे ही योजना जवळजवळ गुंडाळल्यात जमा आहे. यामुळे रोजगारासाठी घराबाहेर जाणाऱ्या महिलांच्या छोट्या मुलांची आबाळ होत असून त्यांना अर्धपोटी राहावे लागत आहे.राज्याच्या महिला व बालविकास विभागाने २०१२ मध्ये ही योजना सुरू केली होती. त्यानुसार राज्यातील ठाणे, नाशिक, नंदुरबार, अमरावती आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यात आधी ६०० पाळणाघरे सुरू करण्यात आली. त्यानंतर त्यांची संख्या १३४० वर पोहोचली होती. परंतू जानेवारी २०१७ मध्ये केंद्र सरकारने ही योजना सर्व राज्यांच्या समाजकल्याण बोर्डाकडे सोपविण्याचा निर्णय घेऊन आपले अंग काढले. परंतू महाराष्ट्रातील समाजकल्याण बोर्डने ती जबाबदारी घेतलीच नाही. परिणामी १३४० पाळणाघरांसाठी मिळणारे अनुदान ठप्प होऊन ही पाळणाघरे बंद पडली.गडचिरोली, अमरावती, नंदूरबार, ठाणे अशा आदिवासीबहुल क्षेत्रात महिलावर्ग बालकांना घरीच ठेऊन कामावर जातात. अशा ६ वर्षापर्यंतच्या बालकांचा दिवसभर सांभाळ करण्यासोबतच त्यांना प्राथमिक स्वरुपाचे शिक्षण आणि पोषण आहार देण्याचे काम या पाळणाघरांमधून केले जात होते. परंतू ते बंद झाल्यामुळे बालकांचे हाल होत आहे. यातून कुपोषण वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.प्रत्येक पाळणाघरावर एक शिक्षिका आणि एक सेविका अशी दोन पदे मंजूर होती. दीड वर्षांपासून हे २६८० कर्मचारी पाळणाघर पुन्हा सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आर्थिक हालअपेष्टा सहन करीत दिवस काढत आहेत.राजीव गांधींच्या नावामुळे नापसंती !तत्कालीन आघाडी सरकारच्या काळात सुरू झालेली ही पाळणाघर योजना मोलमजुरी करण्यासाठी जाणाºया महिलांच्या पाल्यांसाठी मोठी दिलासादायक होती. परंतू योजनेला माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे नाव असल्यामुळे तर ही योजना विद्यमान भाजपशासित केंद्र व राज्य सरकारने गुंडाळली नाही ना? अशी शंका उपस्थित केली जात आहे.महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्रालयाने ही योजना चालविण्यास असमर्थता दर्शवली आहे. मात्र राज्य शासनाच्या वेबसाईटवर अजूनही ही योजना सुरू असल्याचे दर्शविले आहे. त्यामुळे पाळणाघरांमध्ये काम करणारे कर्मचारी आणि संबंधित संस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.