शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

यंदा गडचिराेलीत अकरावीच्या साडेपाच हजार जागा शिल्लक राहणार; प्रवेश सहज मिळणार

By दिलीप दहेलकर | Updated: May 30, 2024 18:41 IST

दहावी उत्तीर्ण विद्यार्थी संख्येपेक्षा जागा अधिक, विज्ञान, कला, वाणिज्य, एमसीव्हीसी या चार शाखा मिळून जिल्ह्यात इयत्ता अकरावीच्या एकूण १७ हजार ९२० जागा आहेत

गडचिराेली : इयत्ता दहावीचा बाेर्डाचा निकाल २७ मे राेजी ऑनलाइन जाहीर झाला असून, गडचिराेली जिल्ह्यातील एकूण १३ हजार २७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गडचिराेली जिल्ह्यात इयत्ता अकरावीच्या १७ हजारांवर जागा आहेत. दहावी उत्तीर्ण विद्यार्थी संख्येपेक्षा अकरावी प्रवेशाच्या जागा अधिक असल्याने यंदा शैक्षणिक सत्र २०२४ - २५ मध्ये इयत्ता अकरावीच्या साडेपाच हजार जागा शिल्लक राहणार आहेत.

जिल्ह्यात खासगी अनुदानित, विनानुदानित, जिल्हा परिषद हायस्कूल, शासकीय व खासगी आश्रमशाळा, इंग्रजी माध्यमांच्या शाळा व इतर सर्व शाळा मिळून स्टेट बाेर्डला यंदा १४ हजार २५ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले हाेते. यापैकी १३ हजार २७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये ६ हजार ७३३ मुले तर ६ हजार ५४५ मुलींचा समावेश आहे. जिल्ह्याच्या शहरी भागात सीबीएसईच्या सात ते आठ माध्यमिक आश्रमशाळा आहेत. या शाळांमधून जवळपास एक हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सीबीएसईचे विद्यार्थी विज्ञान शाखेकडे अधिक वळतात, हा दरवर्षीचा अनुभव आहे. विज्ञान, कला, वाणिज्य, एमसीव्हीसी या चार शाखा मिळून जिल्ह्यात इयत्ता अकरावीच्या एकूण १७ हजार ९२० जागा आहेत.

चार हजार विद्यार्थी आयटीआय व पाॅलीला जाणारगडचिराेली जिल्हा मुख्यालयी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय आहे. येथे पाच ते सहा शाखा आहेत. याशिवाय बाराही तालुकास्तरावर शासकीय आयटीआय आहे. आयटीआयला जवळपास ३,६०० आणि ४०० विद्यार्थी शासकीय तंत्रनिकेतमध्ये प्रवेश घेतात.९,२७८ विद्यार्थी अकरावीला प्रवेश घेणार?दहावी उत्तीर्ण १३ हजार ३७४ विद्यार्थ्यांपैकी आयटीआय व पाॅलिटेक्निकचे प्रवेश वगळता उर्वरित ९ हजार २७८ विद्यार्थी यंदा जिल्हयात इयत्ता अकरावीला प्रवेश घेणार आहेत.

अशी हाेईल प्रवेश प्रक्रीया..माेठ्या शहरांमध्ये इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी स्पर्धा असते. त्यामुळे तेथे ऑनलाइन प्रक्रिया पार पाडली जाते. नागपूरात केंद्रीय पद्धतीने ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया हाेईल. उर्वरित चार जिल्ह्यात शासन नियमाप्रमाणे इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया पार पडणार आहे. येत्या शैक्षणिक सत्रात एकही विद्यार्थी इयत्ता अकरावीच्या प्रवेशापासून वंचित राहणार नाही, असे नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांनी सांगितले.गुणवत्ता नसलेल्या शाळांच्या वाढणार अडचणीनामांकित व गुणवत्तापूर्ण कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी व पालकांची गर्दी हाेत असते. अशा काॅलेजमध्ये दहावीच्या गुणवत्ता यादीनुसार अकरावीचे प्रवेश हाेत असतात. दहावी उत्तीर्ण विद्यार्थी संख्येपेक्षा अकरावी प्रवेशाच्या जागा अधिक असल्याने गुणवत्ता नसलेल्या तसेच नवीन, विनानुदानित शाळांची यंदा अडचण हाेणार आहे. 

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकाल