शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
4
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
5
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
6
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
7
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
8
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
9
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
10
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
11
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
12
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
13
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
14
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
15
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
16
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
17
Man-Animal Conflict: "आमचं सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत", मुख्यमंत्री योगींचे पीडितांना आश्वासन
18
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
19
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
20
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो

यंदा महामंडळाची धान खरेदी १५ लाख क्विंटलवर जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 15:30 IST

दिवाळीनंतर हंगाम सुरू होणार : बोनसमुळे वाढला शेतकऱ्यांचा कल

लोकमत न्यूज नेटवर्क वैरागड : आदिवासी विकास महामंडळाच्या उपअभिकर्ता म्हणून आविका संस्थानी सन २०२३-२४ या खरीप हंगामात १३ लाख क्विंटल धानाची खरेदी केली होती. मागील वर्षातील धान पिकाला प्रतिकूल परिस्थिती असताना आदिवासी विकास महामंडळाने मोठ्या प्रमाणात हमीभावात धानाची खरेदी केली होती. या वर्षात धान पिकाला पोषक वातावरण, समाधानकारक पाऊस, रोगाचा प्रादुर्भाव कमी व सध्याची धान पिकाची स्थिती लक्षात घेता यंदा धानाची विक्रमी खरेदी होणार आहे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दिवाळी सण आटोपला की, १५ दिवसांनी आदिवासी विकास महामंडळ आविका संस्थांच्या मार्फतीने हमीभावाने धानाची खरेदी केली जाते. शासनाच्या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करून धान विकल्यास शेतकऱ्यांना मिळणारा बोनसही हेक्टरी बऱ्यापैकी मिळत असल्याने शेतकरी आपला उत्पादित धान हमीभाव खरेदी केंद्रावरच विकण्याला प्राधान्य देत आहेत. 

या वर्षात खरिपाच्या धानाची वेळीच उचल झाल्याने धान खरेदीसाठी पुरेशी जागादेखील उपलब्ध आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाने खरिपात खरेदी केलेल्या धानाच्या भरडाईचा आणि राईस मिलपर्यंतच्या वाहतुकीचा तिढा काही प्रमाणात सुटल्याने या खरीप हंगामातील धान खरेदीसाठी जागा उपलब्ध असल्याने धानाच्या मोठ्या खरेदीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. राज्याच्या निवडणुका तोंडावर असल्याने बोनस बऱ्यापैकी जाहीर होणार असल्याची शक्यता असल्याने या वर्षात महामंडळाकडून मोठ्या प्रमाणात धान खरेदी होण्याची शक्यता आहे. दिवाळीनंतर पंधरा दिवसांनी खरेदी केंद्र सुरू होणार असल्याने आदिवासी विकास महामंडळ व आविका संस्थाने तयारी चालविली आहे. 

"प्रतिकूल हवामानामुळे मागच्या वर्षात आरमोरी तालुक्यातील नऊ संस्थांच्या वतीने एक लाख ४३ हजार क्विंटल धानाची खरेदी झाली होती. या वर्षात खरेदीचा आकडा वाढणार असून, वरिष्ठ पातळीवर तयारी चालविली आहे." - एच. एन. सोनबावणे, उपप्रादेशिक व्यवस्थापक, आरमोरी

"मागील तीन ते चार वर्षापासून आदिवासी विकास महामंडळातून उपअभिकर्ता असलेल्या आविका संस्थांना कमिशन कमी मिळत आहे. खरेदी केलेल्या मालाची लवकर उचल होत नसल्याने घटीचे प्रमाण वाढते. त्यामुळे आविका संस्थांचाही विचार करण्यात यावा."- दिलीप कुमरे, व्यवस्थापक, आविका संस्था देलनवाडी.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली