शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

दिना धरणाचे पाणी सोडूनही शेवटची शेती तहानलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 22:39 IST

पुरेशा प्रमाणात पाऊस न पडल्यामुळे चामोर्शी तालुक्यातील शेतकरी अडचणीत आले आहे. बदलत्या वातावरणामुळे धानपिकावर अनेक रोगांनी आक्रमण केले आहे. पाण्याअभावी धानपीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

ठळक मुद्देकालव्यांची दुरवस्था : सिंचनासाठी पाणी पोहोचतच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : पुरेशा प्रमाणात पाऊस न पडल्यामुळे चामोर्शी तालुक्यातील शेतकरी अडचणीत आले आहे. बदलत्या वातावरणामुळे धानपिकावर अनेक रोगांनी आक्रमण केले आहे. पाण्याअभावी धानपीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.चामोर्शी परिसरातील शेतकऱ्यांसाठी जीवदायी ठरलेल्या दिना धरणाचे पाणी शेतीसाठी सोडण्याची मागणी केल्यानंतर या धरणाचे पाणी सोडण्यात आले. नहरामधून पाणी वाहत आहे. परंतु शेवटच्या शेतीपर्यंत पाणी पोहोचलेच नाही. दोटकुली, वाघोली, वेलतूर तुकूम, घारगाव, रामाळा या गावातील शेतीपर्यंत पाणी न मिळाल्याने गर्भावर आलेले धानपीक निस्तेज होत आहे. अनेक शेतकºयांचे धानपीक करपून जात आहेत. नहराच्या अर्ध्या भागापर्यंत पाणी वाहत असून समोरचा नहर कोरडाशुष्क पडला आहे. नहराची योग्यप्रकारे देखभाल न झाल्याने शेवटच्या शेतीपर्यंत कन्नमवार जलाशयाचे पाणी पोहोचत नाही. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. अनेक शेतकरी अधिकाºयांच्या नावाने शिमगा साजरा करीत आहेत. शेतकºयांचे धानपीक वाचविण्यासाठी पाटबंधारे विभागाने तत्काळ शेवटच्या शेतापर्यंत सिंचनाची सुविधा करावी, अशी मागणी भाजपचे महामंत्री राजेश्वर चुधरी यांनी केली आहे.